शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
5
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
6
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
7
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
8
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
9
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
10
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
11
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
12
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
13
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
14
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
15
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
16
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
17
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
18
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
19
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
20
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी

पंचगंगा प्रदूषित करणाऱ्या गावांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2020 17:19 IST

कोल्हापूर : पंचगंगा प्रदूषणासंबंधी जबाबदार असणाऱ्या ग्रामपंचायतींनी १० फेब्रुवारी २०२०पर्यंत सांडपाणी व्यवस्थापनाचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे दिले नाहीत, तर अशा ग्रामपंचायतींवर ...

ठळक मुद्देपंचगंगा प्रदूषित करणाऱ्या गावांवर कारवाईअमन मित्तल यांचा इशारा, पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी बैठक

कोल्हापूर : पंचगंगा प्रदूषणासंबंधी जबाबदार असणाऱ्या ग्रामपंचायतींनी १० फेब्रुवारी २०२०पर्यंत सांडपाणी व्यवस्थापनाचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे दिले नाहीत, तर अशा ग्रामपंचायतींवर कारवाई करण्याचा इशारा कोल्हापूरजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी दिला.पंचगंगेच्या काठावरील ३९ गावांच्या सरपंच, ग्रामसेवकांच्या आढावा बैठकीचे  जिल्हा परिषदेत आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला.या बैठकीसाठी खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील, सभापती पद्माराणी पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. पी. शिवदास, सदस्य राहुल आवाडे, विजय भोजे, राजवर्धन निंबाळकर, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव उपस्थित होते.मित्तल म्हणाले, देशातील प्रदूषित नद्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने कडक भूमिका घेतली असून, याबाबत आता हयगय चालणार नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये या कामांना प्राधान्य देण्याची गरज आहे.प्रकाश आवाडे म्हणाले, सध्या इचलकरंजीचा मैला विनाप्रक्रिया थेट नदीत मिसळत आहे. यड्राव येथील औद्योगिक वसाहतीच्या सांडपाण्यावरही प्रक्रिया होत नाही. या सगळ्यांसाठी नेमकी उपाययोजना करण्याची गरज आहे.बजरंग पाटील म्हणाले, पंचगंगा प्रदूषणमुक्ती ही सर्वांची जबाबदारी असून, यामध्ये येणाºया अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा परिषद सर्व ती मदत करील. सतीश पाटील म्हणाले, जिल्ह्यातील इतर नद्यांची पंचगंगेसारखी परिस्थिती होणार नाही, यासाठी सर्वच गावांनी खबरदारी घ्यावी.उदय गायकवाड म्हणाले, पंचगंगा नदीचा प्रवाह वाहता ठेवण्यासाठी बंधाºयातून जे पाणी सोडले जाते, ते खालून सोडणे आवश्यक आहे. त्यामुळे नदीपात्रामध्ये मैलामिश्रित गाळ साचणार नाही, जलपर्णीची वाढ होणार नाही.पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कार्यवाही करण्यासाठी जिल्हा तसेच तालुका स्तरांवर लोकप्रतिनिधी व अधिकारी तसेच सरपंच व ग्रामसेवक यांची उपसमिती नियुक्त केली जाणार आहे. या बैठकीसाठी करवीर, शिरोळ व हातकणंगले या तालुक्यांतील गटविकास अधिकारी, उपअभियंता, उपविभाग ग्रामीण पाणीपुरवठा, विस्तार अधिकारी, गट समन्वयक, ३९ गावांतील सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते....तर तुम्हांला, मला तुरुंगात जावे लागेलदेशातील प्रमुख नद्यांच्या प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने गांभीर्याने काही आदेश दिले आहेत. याबाबतही वेळेत कार्यवाही न झाल्यास माझ्यासह तुम्हांलाही तुरुंगात जावे लागेल. ज्या ग्रामपंचायती सांडपाणी व्यवस्थापनासाठी १० टक्के राखीव निधी ठेवणार आहेत, त्यांना तेवढाच निधी केंद्र शासन देणार आहे. त्यामुळे हा निधी ठेवा. याबाबत ग्रामपंचायतींच्या आलेल्या प्रस्तावांना २८ फेब्रुवारीपर्यंत तांत्रिक मंजुरी दिली नाही तर पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनाही नोटिसा काढणार असल्याचे अमन मित्तल यांनी यावेळी सांगितले.

 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदwater pollutionजल प्रदूषणkolhapurकोल्हापूर