शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅपेसह सहा आसनी रिक्षांवर कारवाईचा बडगा ; परवाना ग्रामीण चा अन् व्यवसाय शहरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 14:41 IST

कोल्हापूर शहरात ग्रामीण प्रवासी वाहतुक करण्याचा परवाना असताना अवैध वाहतुक करणाºया अ‍ॅपेसह सहा आसनी रिक्षांवर आजपासून कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. त्यामुळे वाहतुक कोंडी

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात ग्रामीण प्रवासी वाहतुक करण्याचा परवाना असताना अवैध वाहतुक करणाºया अ‍ॅपेसह सहा आसनी रिक्षांवर आजपासून कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. त्यामुळे वाहतुक कोंडी व अवैध प्रवासी वाहतुक यावर अंकुश येणार आहे.

प्रादेशिक परिवहन प्राधिकरणने सहा आसनी व अ‍ॅपे रिक्षांना नमुद केलेला मुळ तालुका व त्या लगतचे अन्य दोन तालुकांमध्ये आपले वाहन प्रवासी वाहतुक करण्यास परवानगी देते. मात्र, त्या ऐवजी अशी वाहने चक्क शहरातून प्रवासी वाहतुक करताना दिसत आहेत. त्यामुळे शहरातील वाहतुकीचे नियंत्रण बिघडण्यात झाले आहे. ही वाहने तासन्तास एकाच ठिकाणी प्रवाशी गोळा करण्यासाठी थांबून राहतात. त्यामुळे के.एम.टी. व अन्य वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.

अशा अवैद्य थांब्यांमुळे एकूणच शहरातील वाहतुक नियंत्रणाचा बोजवारा उडाला आहे. ही बाब ध्यानी घेवून शहर वाहतुक शाखेने आज, गुरूवारपासून अशा ग्रामीण परवाना असलेल्या रिक्षांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. अशा अ‍ॅपेसह सहा आसनी रिक्षाचालकांवर कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल शहर वाहतुक शाखेतर्फे कडक कारवाई केली जाणार आहे. विशेषत: लुगडी ओळ, महाराणा प्रताप चौक, शिवाजी चौक, टाऊन हॉल मध्यवर्ती बसस्थानक, रंकाळा बसस्थानक, जनता बझार चौक, संभाजीनगर, दसरा चौक, दाभोळकर कॉर्नर, शारदा कॅफे चौक, अशा महत्वाच्या चौकात ही वाहने तासन्तास वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने उभी असतात. अशा वाहनांवर यापुर्वी न्यायालयात खटले भरण्यात आले होते. त्याप्रमाणे गुरूवारपासून कारवाई केली जाणार आहे.

लक्ष्मीपुरी धान्य बाजारातील अवजड मालवाहतुक करणाºया वाहनांकरीता ठराविक वेळेतच माल उतरवण्यासाठी मुभा देण्यात येणार आहे. त्या दृष्टीने येत्या आठ दिवसांत पुन्हा अशी सुचना काढली जाणार आहे. त्यामुुळेही काही प्रमाणात वाहतुक कोँडीला आळा बसणार ाहे. जिल्ह्यात तीनचाकी व सहा आसनी रिक्षा १६ हजार ९७६ , तर ग्रामीण प्रवासी वाहतुक करणारी २ हजार १४५ इतकी वाहने आहेत.

 

ग्रामीण परवाना असणाºया अ‍ॅपेसह सहा आसनी रिक्षाचालकांनी शहरातील वाहतुकीवर ताण येईल असे कृत्य करू नये. असे वाहन शहरात विना परवाना आल्यास त्याच्यावर कारवाई निश्चित केली जाईल. त्यामुळे परवाना ज्या क्षेत्रापुरता मर्यादित आहे, त्याच ठिकाणी आपण व्यवसाय करावा. यासह अवजड वाहतुकीबाबत कठोर कारवाई केली जाईल.अनिल गुजर , पोलीस निरीक्षक

 

प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ज्या नियमावलीनूसार अशा वाहनांना परवाना वितरीत करते.त्याप्रमाणे त्या वाहनमालकांनी त्याच क्षेत्रात प्रवासी वाहतुक करावी. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल.   डॉ. एस.टी.अल्वारिस , उपप्रादेशिक परिवहन अधिकारी , कोल्हापूर

 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसkolhapurकोल्हापूर