शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
4
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
5
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
6
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
7
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
8
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
9
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
10
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
11
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
12
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
13
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
14
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
15
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
16
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
17
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
18
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन
19
चोरांवर मोर! दरोडेखोरांनाच घातला गंडा, ७५ लाखांच्या दागिन्यांचे १ लाखच दिले, त्यानंतर घडलं असं काही...
20
एक्सपायर झाल्यानंतर 'ही' १७ औषथे कचऱ्यात टाकण्याऐवजी टॉयलेटमध्ये फ्लश करा, कारण काय?

रंकाळा विकासाचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ कागदावरच

By admin | Updated: December 27, 2014 00:19 IST

नेते, प्रशासनाची बघ्याची भूमिका : तत्काळ काम सुरू होणे गरजेचे

कोल्हापूर : रंकाळ्यासाठी १०० कोटींचा निधी द्या, अशी मागणी वर्षभरापूर्वी शासनाकडे करून महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी बघ्याच्या भूमिकेत आहेत. कामे पूर्ण न करताच पहिल्या टप्प्यातील खर्चाचा हिशेबाचा ताळेबंद मात्र प्रशासनाने तयार केला आहे. रंकाळ्याच्या ढासळणाऱ्या संरक्षक भिंती, खराब रस्त्यांमुळे पसरलेले धुळीचे साम्राज्य, नावालाच असलेले बगीचे, कागदावरचाच नौकाविहार, दररोज मिसळणाऱ्या दहा एमएलडी मैलामिश्रित सांडपाण्यामुळे काळे-निळे होणारे पाणी, आदी समस्यांनी रंकाळ्याला घेरले आहे. मात्र, रंकाळ्याची समस्यांच्या गर्तेतून सोडवणूक कधी होणार, या प्रश्नाचे उत्तर कोणाक डेच नाही.केंदाळ समूळ नष्ट करण्यासाठी १५ लाख रुपये खर्च करून विव्हिल किडे सोडण्यात आले; पण ते कमी झाली नाही. आता पुन्हा केंदाळाचे दुखणे वर तोंड काढत आहे. बोट खरेदी करण्याकरिता ४५ लाखांची तरतूद केली; पण गेल्या तीन वर्षांत अद्याप ती खरेदी केली नाही. यापूर्वी आणलेल्या बोटी चोरीला गेल्या, असे सांगून प्रशासन हात वर करीत आहे. ठेकेदाराची अनामत रक्कम जप्त करण्यापलीकडे प्रशासनाची मजल गेलेली नाही. इराणी खणीचा गाळ काढून ते पाणी पाईपमध्ये सोडल्याने गाळ अडकून ड्रेनेज लाईनची क्षमता कमी झाल्याची चर्चा आहे. मिसळणाऱ्या सांडपाण्यामुळे रंकाळ्याच्या पाण्याचा रंग बदलू लागला आहे. अतिरिक्त झालेले पाणी बाहेर जाण्यासाठी असणारे व्हॉल्व्ह पुन्हा सुरू करून रंकाळ्यातील संपूर्ण पाणी उपसून गाळ काढण्याची गरज आहे. तटबंदीचे वयोमान संपल्याने तिच्या संपूर्ण मजबुतीकरणाची गरज आहे. नैसर्गिक पुनर्भरणासाठी नाशिकच्या धरण सुरक्षा संस्थेच्या तज्ज्ञांची मदत घेऊन तत्काळ निधीची उपलब्धता करून काम सुरु करणे गरजेचे आहे. रंकाळ्यात मिसळणारे सांडपाणी बंद करणे गरजेचे आहे. येत्या २४ तासांत हे मिसळणारे पाणी बंद झाले तरी रंकाळ्याचे नैसर्गिक पुनर्भरण होण्यास दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. नैसर्गिक पुनर्भरण झाल्याखेरीज रंकाळ्याचे दुखणे कमी होणार नाही. प्रशासकीय उदासीनताच रंकाळ्याच्या मुळावर उठली आहे. - उदय गायकवाड(पर्यावरण अभ्यासक)केंद्राला १०४ कोटींचा आराखडा सादर : धनंजय महाडिककोल्हापूरचे वैभव असलेल्या रंकाळा तलावाचा १०४ कोटी रुपयांचा विकास आराखडा केंद्राला सादर केला आहे. त्यासाठी पाठपुरावाही सुरू आहे, असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केले. रंकाळा संवर्धन व संरक्षण समिती व रंकाळा प्रेमींच्यावतीने आज, शुक्रवारी सायंकाळी रंकाळा तलाव पदपथ उद्यान येथे आयोजित ‘रंकाळा दिवस’ या कार्यक्रमात ते बोलत होते. रंकाळा उद्यान येथे झालेल्या या कार्यक्रमात रंकाळा येथे झाडांची लागवड व संवर्धन व स्वच्छता मोहिमेत योगदान देणाऱ्या श्रीकांत कदम, सुभाष हराळे, गुंडोपंत जितकर, अजित मोरे, जमीर मुजावर, भीमराव तिरमारे यांचा रोप देऊन खासदार महाडिक यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सायंकाळी सुनील सुतार, सुरेश शुक्ल यांंचा ‘स्वरनिनाद’ निर्मित ‘शब्दसुरांच्या झुल्यावर’ हा गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. राजेंद्र पाटील यांनी स्वागत, तर चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी संजय शिंदे, अभय देशपांडे, पृथ्वीराज पाटील, रवींद्र वडगावकर, अजित राऊत, अनिल काकडे, विनायक भोसले, अ‍ॅड. अजित चव्हाण, जगदीश रांगोळे, सागर नालंग, रवी तांबट, पवन जमादार, सुधीर भांबुरे, विकास जाधव, आदी उपस्थित होते.