शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

खताचे लिंकिंग आढळल्यास कार्यक्षेत्रातील निरीक्षकांवर कारवाई : दादा भुसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 17:12 IST

रासायनिक खतांचे लिंकिंग होत असल्याच्या तक्रारी येत असून, असे प्रकार ज्या कार्यक्षेत्रात आढळतील, तेथील कृषी निरीक्षकावर थेट कारवाई केली जाईल, असा इशारा कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिला. शेतकऱ्यांना योग्य दरात खते, बियाणे मिळतात की नाही, हे तपासणीची जबाबदारी कृषी विभागाची असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड मान्य नसून, शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले.

ठळक मुद्देदादा भुसे यांचा कृषी आढावा बैठकीत इशारा शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांची गय नाही

कोल्हापूर : रासायनिक खतांचे लिंकिंग होत असल्याच्या तक्रारी येत असून, असे प्रकार ज्या कार्यक्षेत्रात आढळतील, तेथील कृषी निरीक्षकावर थेट कारवाई केली जाईल, असा इशारा कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिला. शेतकऱ्यांना योग्य दरात खते, बियाणे मिळतात की नाही, हे तपासणीची जबाबदारी कृषी विभागाची असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड मान्य नसून, शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले.मंत्री भुसे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी शासकीय विश्रामगृहात कृषी विभागाची आढावा बैठक झाली, त्यामध्ये ते बोलत होते. खरीप हंगामासाठी तीन हजार टन युरिया जादा येऊनही शेतकऱ्यांची ओरड संपली नाही. आता आपल्याकडे ९०० टन युरिया शिल्लक असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी सांगितले.

भुदरगड तालुक्यात युरिया उद्दिष्टाच्या तुलनेत ३५० टक्के आला, मात्र दुकानात नाही; मग तो गेला कोठे? विक्रेते जाणीवपूर्वक साठा करीत असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आमदार प्रकाश आबिटकर यांनी केली. खतावरील लिंकिंगबाबत राज्यस्तरीय आदेश काढावेत, अशी सूचना केली.

गेली चार वर्षे कोल्हापूर व सांगलीतील १७ हजार शेतीपंपांची वीजजोडणी प्रलंबित असल्याचा मुद्दा उपस्थित करीत ठिबकसाठी आपण आग्रही राहतो. मात्र त्याचे अनुदान वेळेत मिळत नसल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी सांगितले.

महापुरातील कर्जमाफीचा लाभ संयुक्त खातेदारांना मिळावा, त्याचबरोबर लाटवडे, भेंडवडे परिसरांत झालेल्या गारपिटीमुळे शेतीसह पोल्ट्री उद्योगाचे नुकसान झाले, त्याची भरपाई मिळावी, अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी केली. मिश्रखतास परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार राजेश पाटील यांनी केली. यावर काही संस्थांमुळे गालबोट लागले असले तरी चांगल्या संस्थांसाठी निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही भुसे यांनी दिली.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, रामेतीचे प्राचार्य उमेश पाटील, ह्यआत्माह्णच्या संचालक सुनंदा कुराडे, जिल्हा उपनिबंधक अमर शिंंदे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक राहुल माने, आदी उपस्थित होते. कृषी उपसंचालक भाग्यश्री पवार यांनी आभार मानले. 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रministerमंत्रीkolhapurकोल्हापूर