शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

विमानतळ प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घ्या : जिल्हा प्रशासनाला निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 16:47 IST

उजळाईवाडी येथील कोल्हापूरविमानतळावर विस्तारीकरणाच्या कामामध्ये उपलब्ध होणाऱ्या नोकऱ्यांमध्ये प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सामावून घ्यावे, तसेच या ठिकाणी होणाऱ्या व्यापारी संकुलातील ठेके प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनाच द्यावेत, यासह विविध मागण्यांचे निवेदन गुरुवारी उजळाईवाडी कोल्हापूर विमानतळ भूसंपादन विरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली.

ठळक मुद्देविमानतळ प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घ्या : जिल्हा प्रशासनाला निवेदनउजळाईवाडी कोल्हापूर विमानतळ भूसंपादन विरोधी कृती समितीची मागणी

कोल्हापूर : उजळाईवाडी येथील कोल्हापूरविमानतळावर विस्तारीकरणाच्या कामामध्ये उपलब्ध होणाऱ्या नोकऱ्यांमध्ये प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सामावून घ्यावे, तसेच या ठिकाणी होणाऱ्या व्यापारी संकुलातील ठेके प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनाच द्यावेत, यासह विविध मागण्यांचे निवेदन गुरुवारी उजळाईवाडी कोल्हापूर विमानतळ भूसंपादन विरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली.याबाबतचे निवेदन अध्यक्ष नारायण पोवार व निमंत्रक राजू माने यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसिलदार शितल मुळे-भामरे यांना दिले. निवेदनात म्हंटले आहे की, उजळाईवाडी येथील विमानतळासाठी राबविलेल्या भूसंपादन प्रक्रियेला २००६ ते २०१० असा चार वर्षे स्थानिक रहिवाशांनी विरोध केला होता. या संघर्षानंतर तत्कालिन मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्यासोबत अनेक बैठका झाल्या. तत्कालिन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी तडजोडीसाठी उद्योग भवन येथे बैठक घेतली.

यावेळी माजी आरोग्य मंत्री कै. दिग्विजय खानविलकर, आमदार सतेज पाटील, कृती समितीचे अध्यक्ष नारायण पोवार, निमंत्रक राजू माने उपस्थित होते. यावेळी पुढील मागण्या एकमताने मंजूर करण्यात आला.

यामध्ये प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना ‘विमानतळ प्रकल्पग्रस्त’ म्हणून दाखला मिळावा, विमानतळ विस्तारीकरणामध्ये प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना प्राधान्याने नोकरीत सामावून घ्यावे, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना शासनातर्फे विमानतळ प्रवेशासाठी ओळखपत्र मिळावे व शेतकऱ्यांना कोल्हापूर ते मुंबई येण्या जाण्याचा मोफत प्रवास सुविधा देण्याची मान्य केले होते; त्याची कार्यवाही करावी, विस्तारीकरणातील तयार होणाऱ्या व्यापारी संकुलातील ठेके प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनाच द्यावेत, संपादित केलेली जमिन ७ वर्षात पूर्ण विस्तारित करण्याचे ठरूनही अद्याप ९५ टक्के जमिनींचा विकास झालेला नाही.

यामुळे महत्वाच्या अटींचा शर्तभंग झाला असून प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल. शिष्टमंडळात के. वाय. पाटील, दीपक जाधव, गुरुप्रसाद माने, सर्जेराव पाटील, शशिकांत पाटील, रुपेश घडशी, भानुदास वाघमारे आदींचा समावेश होता.

 

 

टॅग्स :Airportविमानतळkolhapurकोल्हापूर