शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

विमानतळ प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घ्या : जिल्हा प्रशासनाला निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 16:47 IST

उजळाईवाडी येथील कोल्हापूरविमानतळावर विस्तारीकरणाच्या कामामध्ये उपलब्ध होणाऱ्या नोकऱ्यांमध्ये प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सामावून घ्यावे, तसेच या ठिकाणी होणाऱ्या व्यापारी संकुलातील ठेके प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनाच द्यावेत, यासह विविध मागण्यांचे निवेदन गुरुवारी उजळाईवाडी कोल्हापूर विमानतळ भूसंपादन विरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली.

ठळक मुद्देविमानतळ प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घ्या : जिल्हा प्रशासनाला निवेदनउजळाईवाडी कोल्हापूर विमानतळ भूसंपादन विरोधी कृती समितीची मागणी

कोल्हापूर : उजळाईवाडी येथील कोल्हापूरविमानतळावर विस्तारीकरणाच्या कामामध्ये उपलब्ध होणाऱ्या नोकऱ्यांमध्ये प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सामावून घ्यावे, तसेच या ठिकाणी होणाऱ्या व्यापारी संकुलातील ठेके प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनाच द्यावेत, यासह विविध मागण्यांचे निवेदन गुरुवारी उजळाईवाडी कोल्हापूर विमानतळ भूसंपादन विरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली.याबाबतचे निवेदन अध्यक्ष नारायण पोवार व निमंत्रक राजू माने यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसिलदार शितल मुळे-भामरे यांना दिले. निवेदनात म्हंटले आहे की, उजळाईवाडी येथील विमानतळासाठी राबविलेल्या भूसंपादन प्रक्रियेला २००६ ते २०१० असा चार वर्षे स्थानिक रहिवाशांनी विरोध केला होता. या संघर्षानंतर तत्कालिन मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्यासोबत अनेक बैठका झाल्या. तत्कालिन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी तडजोडीसाठी उद्योग भवन येथे बैठक घेतली.

यावेळी माजी आरोग्य मंत्री कै. दिग्विजय खानविलकर, आमदार सतेज पाटील, कृती समितीचे अध्यक्ष नारायण पोवार, निमंत्रक राजू माने उपस्थित होते. यावेळी पुढील मागण्या एकमताने मंजूर करण्यात आला.

यामध्ये प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना ‘विमानतळ प्रकल्पग्रस्त’ म्हणून दाखला मिळावा, विमानतळ विस्तारीकरणामध्ये प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना प्राधान्याने नोकरीत सामावून घ्यावे, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना शासनातर्फे विमानतळ प्रवेशासाठी ओळखपत्र मिळावे व शेतकऱ्यांना कोल्हापूर ते मुंबई येण्या जाण्याचा मोफत प्रवास सुविधा देण्याची मान्य केले होते; त्याची कार्यवाही करावी, विस्तारीकरणातील तयार होणाऱ्या व्यापारी संकुलातील ठेके प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनाच द्यावेत, संपादित केलेली जमिन ७ वर्षात पूर्ण विस्तारित करण्याचे ठरूनही अद्याप ९५ टक्के जमिनींचा विकास झालेला नाही.

यामुळे महत्वाच्या अटींचा शर्तभंग झाला असून प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल. शिष्टमंडळात के. वाय. पाटील, दीपक जाधव, गुरुप्रसाद माने, सर्जेराव पाटील, शशिकांत पाटील, रुपेश घडशी, भानुदास वाघमारे आदींचा समावेश होता.

 

 

टॅग्स :Airportविमानतळkolhapurकोल्हापूर