शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

जनतेची निवड योग्य असल्याची पोचपावती : धनंजय महाडिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 01:13 IST

खासदार म्हणून कोल्हापूरच्या जनतेने मला निवडले. सलग तिसºयांदा ‘संसदरत्न’ पुरस्कार मिळाल्याने जनतेची ही निवड योग्य असल्याची पोचपावती मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देतिसऱ्यांदा ‘संसदरत्न’ पुरस्कार, एकूण २७८६ प्रश्न संसदेत केले उपस्थित

कोल्हापूर : खासदार म्हणून कोल्हापूरच्या जनतेने मला निवडले. सलग तिसºयांदा ‘संसदरत्न’ पुरस्कार मिळाल्याने जनतेची ही निवड योग्य असल्याची पोचपावती मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली.चेन्नई येथे ‘संसदरत्न’ पुरस्कार स्वीकारून कोल्हापुरात आल्यानंतर महाडिक यांनी आपल्या या भावना ‘लोकमत’जवळ व्यक्त केल्या. साडेचार वर्षांच्या कामगिरीचा यावेळी त्यांनी आढावा घेतला.

दिल्लीतील सुरुवातीचे दिवस सांगताना महाडिक म्हणाले, माझ्यासारख्या युवकावर कोल्हापूरच्या जनतेने विश्वास टाकला; त्यामुळे तो सार्थ करण्याचा निर्धार मी केला होता. देशभरातून येणाºया उच्चशिक्षित आणि अनेक वर्षे संसदेत काम केलेल्या मान्यवरांमध्ये स्वत:ला सिद्ध करणे, हे आव्हानात्मक होते; परंतु ज्या जनतेने मला दिल्लीत पाठविले, त्यांची निवड योग्य होती हे दाखविण्याच्या भूमिकेतून तिसºया दिवशी मी संसदेच्या ग्रंथालयात गेलो. याचे ग्रंथपालांना आश्चर्यही वाटले. यानंतर मी आदर्श संसदपटू राहिलेले मधु दंडवते, अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यपद्धती विषयीची पुस्तके वाचली.

प्रश्न विचारण्याच्या पद्धती, प्रश्नांची मांडणी, त्याच्या उत्तरावर पुन्हा चर्चा, शून्य प्रहरातील प्रश्न, तारांकित, अतारांकित प्रश्न या सगळ्यांची माहिती घेतली. मग राष्ट्रीय प्रश्न, महाराष्ट्राचे प्रश्न आणि कोल्हापूरचे प्रश्न अशी विभागणी करून त्यानुसार नियोजन केले. यासाठी तीनजणांची एक चांगली टीम तयार केली.

जे प्रश्न आम्ही पाठवितो, त्यातून लॉटरी पद्धतीतून प्रश्न निवडले जातात. अधिवेशनाच्या आधी १५ दिवस प्रश्न विचारावे लागतात. २५0 प्रश्न एका अधिवेशनासाठी पाठविले, की त्यातून ३0/४0 प्रश्न अधिवेशनामध्ये लागायचे; पण मला सर्वच प्रश्नांची तयारी करावी लागत असे.या पद्धतीने पहिल्या वर्षी ७५0, दुसºया वर्षी ९00 आणि तिसºया वर्षी ११३६ प्रश्न उपस्थित केले. प्रत्येक बिलावर पक्षाची भूमिका मांडण्याची, देशाच्या अर्थसंकल्पावर, रेल्वे संकल्पावर बोलण्याची संधी नेते शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी दिली.

वैभववाडी रेल्वेमार्ग, महिलांच्या रेल्वे डब्यात सीसीटीव्ही लावणे, पुणे कोल्हापूर रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, कोल्हापूर स्टेशनवरील सुधारणा, विमानसेवा, पासपोर्टची सुविधा आणि बी. एस. एन. एल.चे सर्वाधिक उभारण्यात आलेले १३१ थ्रीजी टॉवर अशी अनेक कामे मार्गी लावली.संसदेत विचारले गेलेले प्रश्न, संसदेतील उपस्थिती, चर्चेत घेतलेला सहभाग या सर्वांचा एक आढावा घेऊन ‘संसदरत्न’ पुरस्कार दिला जातो. सलग तिसºया वर्षी हा पुरस्कार मला मिळाल्याने मी घेतलेल्या कष्टाचे चीज झाल्याची भावना आहेच.रस्ते, गटर्ससाठी निधी एवढेच काम नाहीखासदाराचे काम केवळ रस्ते आणि गटर्ससाठी निधी देणे इतकेच नसून, देशाच्या कारभाराची धोरणे ठरवण्याची जबाबदारी त्याच्यावर येते. सर्वसामान्य नागरिकांशी संबंधित आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक सुविधा या सर्व बाबतीत खासदाराने कार्यरत राहून त्यांचे जीवनमान कसे उंचावले जाईल, याची काळजी त्याने घ्यावयाची असते. याच भूमिकेतून मी संसदेत कार्यरत आहे.

टॅग्स :Dhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकkolhapurकोल्हापूर