शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
2
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
3
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
4
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
5
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
7
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
8
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
9
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
10
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
11
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
12
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
13
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
14
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव
15
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
16
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
18
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
19
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
20
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?

डिजिटल, इलेक्ट्रॉनिक पुरावे आता न्यायालयात ग्राह्य धरणार

By उद्धव गोडसे | Updated: July 2, 2024 16:26 IST

दस्तऐवज व्याख्येत समावेश, कायद्यांचे देशीकरण करण्यावर भर

उद्धव गोडसेकोल्हापूर : केंद्र सरकारने बदललेल्या फौजदारी कायद्यांनुसार आता न्यायालयात डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. भारतीय साक्ष कायद्यातील दस्तऐवज व्याख्येत नवीन पुराव्यांचा समावेश केला आहे. गुन्हे गतीने निकाली काढण्यासाठी याचा फायदा होईल, असा विश्वास कायदेतज्ज्ञांनी व्यक्त केला.गुन्हेगारांना दंड देणे हा भारतीय दंड संहितेचा उद्देश होता. त्याऐवजी पीडितांना न्याय देणे हा भारतीय न्याय संहितेचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे न्याय संहितेमध्ये गुन्ह्याचा तपास, संशयितांवरील आरोपपत्र वेळेत दाखल होऊन खटला गतीने निकालात निघावा, यासाठी कालमर्यादांना महत्त्व दिले आहे.न्यायालयात पुरावे सादर करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता यावा, यातून खटल्याचे कामकाज गतीने व्हावे आणि पीडितांना वेळेत न्याय मिळावा यासाठी इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. ई-मेल, पोर्टल, वेब पेज, स्मार्ट फोनवरील दस्तऐवज पुरावे मानले जातील. मोबाइलवरील व्हिडिओ रेकॉर्डिंगदेखील डॉक्युमेंटरी पुरावा म्हणून सादर करता येणार आहे. खटल्यांचे कामकाज गतिमान होण्यासाठी हे बदल उपयुक्त ठरणार आहेत.

 जुन्या व नवीन कायद्यातील कलमेजुना कायदा कलमे - नवीन कायदा कलमेभारतीय दंड संहिता - ५११ - भारतीय न्याय संहिता - ३५८फौजदारी प्रक्रिया संहिता - ४८४ - भारतीय नागरी सुरक्षा - ५३१भारतीय पुरावा कायदा - १६७ - भारतीय साक्ष कायदा - १७०

पुरातन संज्ञा हटवल्याकायद्यांचे देशीकरण करताना केंद्र सरकारने पुरातन संज्ञा हटवण्यास प्राधान्य दिले. ब्रिटिशांचा संसद प्रांतीय कायदा, कॉमनवेल्थ प्रीव्ही कौन्सिल, क्विन्स प्रिंटर अशा वसाहतवादी संज्ञा काढून टाकल्या आहेत. वकील, प्लीडर, बॅरिस्टर या शब्दांची जागा आता ॲडव्होकेट या शब्दाने घेतली आहे.अनावश्यक कलमे हटवलीभारतीय दंड संहितेमध्ये ५११ कलमांचा समावेश होता. त्याऐवजी भारतीय न्याय संहितेमध्ये केवळ ३५८ कलमांचा समावेश आहे. नव्या कायद्यात समान गुन्ह्यांशी संबंधित असलेल्या कलमांचे एकत्रीकरण करण्यात आले. विविध प्रकारच्या चोरीच्या कलमांचा समावेश आता केवळ ४१० ते ४१४ अशा पाच कलमांमध्येच करण्यात आला आहे. नागरी सुरक्षा आणि साक्ष कायद्यात मात्र कलमांची संख्या वाढवली आहे.

काही गुन्ह्यांमधील शिक्षेच्या तरतुदीत असलेली असंदिग्धता काढून स्पष्टता आणण्याचा प्रयत्न केला आहे. कलमांची व्याख्या आणि शिक्षा यात सुसूत्रता आणली. हे बदल स्वागतार्ह आहेत. - ॲड. शिवाजीराव राणे - ज्येष्ठ वकील

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCourtन्यायालयCrime Newsगुन्हेगारी