शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
देशातील मुस्लिमांना दाबले जाते, म्हणून पहलगाम हल्ला झाला; रॉबर्ड वाड्रांचे धक्कादायक वक्तव्य
5
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
6
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
7
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
9
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
10
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
11
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
15
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
16
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
17
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
18
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
19
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
20
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!

कोल्हापूरच्या समृध्दीत भर, श्रीमंतीत पुण्यानंतर नंबर..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2021 14:36 IST

नीती आयोगाच्या निर्देशांकानुसार गरिबीमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा क्रमांक राज्यात २९ वा लागतो. येथील १० टक्के जनता गरिबी रेषेच्या खाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राजाराम लोंढेकोल्हापूर : समृध्द शेती, रुजलेली सहकार चळवळ, अर्थकारणाची नाडी बनलेला साखर व दूध व्यवसाय आणि सतत नाविन्याची कास धरणारा उद्योग या घटकांनी कोल्हापूरला श्रीमंत बनवले असल्याचे अत्यंत दिलासादायक चित्र पुन्हा अधोरेखित झाले आहे. नीती आयोगाने जाहीर केलेल्या गरिबी निर्देशांकामध्ये ही माहिती पुढे आली असून ती कोल्हापूरचे महाराष्ट्राच्या आर्थिक नकाशावरील स्थान दर्शवणारी आहे. जिल्हा अन्नधान्याकडून समृध्द असल्याने येथे कुपोषणाचे प्रमाण लोकसंख्येच्या तुलनेत १.८२ टक्के आहे. पिण्याचे पाणी, वीज, पक्की घरे यांसह शैक्षणिक सुविधांच्या पातळीवर जिल्हा आघाडीवर राहिला आहे.विभागात पुण्यानंतर कोल्हापूरच श्रीमंतनीती आयोगाच्या निर्देशांकानुसार गरिबीमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा क्रमांक राज्यात २९ वा लागतो. येथील १० टक्के जनता गरिबी रेषेच्या खाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. आपल्या शेजारील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सातारा जिल्ह्यातील गरिबीचे प्रमाण कोल्हापूरपेक्षा अधिक आहे. पुणे विभागात कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यांचा समावेश आहे. पुणे शहर व जिल्ह्यात ५.२९ टक्केच जनता गरिबी रेषेच्या खाली आहे. राज्याच्या तुलनेत गरिबीचे प्रमाण एकदम कमी असणाऱ्या जिल्ह्यात पुणे तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर पुणे विभागात पुण्यानंतर कोल्हापूरचा क्रमांक लागतो....यामुळे सुधारला आर्थिक स्तरकोल्हापूर जिल्ह्यातील ७० टक्क्याहून अधिक जमीन ही सिंचनाखाली असल्याने नगदी पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यातही शेतीला दूध व्यवसायाची जोड मिळाल्याने येथे बहुतांश कुटुंबे आपोआप सधन झाली आहेत. त्यामुळेच जिल्ह्याचा आर्थिक स्तर उंचावल्याने राज्याच्या तुलनेत गरिबीचे प्रमाण कमी दिसत आहे.

राज्यात गरिबीमध्ये टॉप टेन जिल्हे असे -

  • जिल्हा             गरिबीची टक्केवारी 
  • नंदुरबार           ५२.१२
  • धुळे                 ३३.२३
  • जालना            २९.४१
  • हिंगोली            २८.०५
  • नांदेड              २७.४८
  • यवतमाळ        २३.५४
  • परभणी            २३.३९
  • बीड                 २२.६६
  • वाशिम             २२.५३
  • गडचिरोली       २०. ५८

जिल्ह्यातील वस्तुस्थिती टक्केवारीमध्ये :

  • कुपोषणाचे प्रमाण - १.८२
  • माता-अर्भक मृत्यू - १८.४५
  • इंधन साधने - ४९.१२
  • बँकेत खाती नाहीत - १३.८२
  • पक्की घरे - ४८.६१
  • शौचालय - ३८.०९
  • अद्याप विजेच्या प्रतीक्षेत - १.४८
  • पिण्याचे पाणी - ७.८३
  • शाळाबाह्य विद्यार्थी - ३.९४

 

कोल्हापूर उद्योग आणि कृषी क्षेत्रात इतरांच्या तुलनेत पुढे आहे. दोन औद्योगिक वसाहती व त्यातील फौंड्रीमुळे रोजगार माेठ्या प्रमाणात आहे. इचलकरंजी तर रोजगार देणारे शहर बनले आहे. याचा एकत्रित परिणाम कोल्हापूरचा आर्थिक स्तर उंचावण्यास कारणीभूत आहे. त्यामुळे भविष्यात जिल्ह्यातील गरिबीचे प्रमाण १० टक्क्यापेक्षाही कमी होऊ शकते. - प्रा. सुभाष कोंबडे, अर्थशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPuneपुणे