शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांचा अपघाती मृत्यु, सव्वा कोटी भरपाईचे आदेश; विमा न उतरविणे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आले अंगलट

By समीर देशपांडे | Updated: January 17, 2023 19:07 IST

जिल्हा परिषदेकडील सर्व वाहने आणि त्यांच्या चालकांचा विमा उतरवण्याचा मुद्दा गांभीर्याने पुढे आला

समीर देशपांडेकोल्हापूर : आरोग्य विभागाच्या रुग्णवाहिका आणि चालकांचा विमा न उतरविणे कोल्हापूरजिल्हा परिषदेच्या अंगलट आले आहे. २०१५ साली झालेल्या अपघातात ठार झालेल्या डॉक्टरांच्या कुटुंबीयांना सुमारे एक कोटी ३२ लाख रुपयांची भरपाई द्यावी, असा आदेश बेळगाव जिल्हा न्यायालयाने दिला आहे. या अपघातात एकूण चौघांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे जिल्हा परिषदेकडील सर्व वाहने आणि त्यांच्या चालकांचा विमा उतरवण्याचा मुद्दा गांभीर्याने पुढे आला आहे.चंदगड तालुक्यातील हेरे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. शंकर परशराम जंगले (मूळ रा. अहमदनगर) १५ आक्टोबर २०१५ रोजी सहकारी कर्मचाऱ्यांसह तिलारी भागात लसीकरणासाठी गेले होते. आरोग्य सेवक अर्जुन पाटील हे लवकरच निवृत्त होणार असल्याने सर्व मिळून संध्याकाळी परतताना तिलारीच्या सर्च पाॅईंटला गेले. या ठिकाणी चालक खाली उतरले असता आरोग्य सेवक शामराव संकपाळ यांनी गाडी चालवण्यास येत नसताना गाडी सुरू केली. या गडबडीत गाडी ग्रीलला धडकून दरीत कोसळली आणि त्यात चौघेजण ठार झाले. डॉ. जंगले यांच्यासह शामराव आनंदराव संकपाळ (रा. शिंगणापूर, ता. करवीर), अर्जुन भाऊराव पाटील (वय ५८, रा. कौलगे, ता. गडहिग्ंलज), कविता सदानंद देसाई (रा. चंदगड) यांचा मृतांत समावेश होता.यानंतर डॉ. जंगले यांचे वडील शंकर जंगले यांनी जिल्हा न्यायालय बेळगाव येथे नुकसान भरपाईचा दावा केला होता. याचा ५ फेब्रुवारी २०२१ रोजी निकाल होऊन संबंधितांना ९० लाख ७३ हजार ८८० रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश देण्यात आला. तसेच २०१६ पासून निकाल लागेपर्यंतच्या कालावधीचे ६ टक्क्याने ३२ लाख रुपये व्याज देण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

जिल्हा परिषदेची कोंडीहे पैसे देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने नकार दिला आहे. इतके पैसे देण्यासाठी जिल्हा परिषदेकडे निधीही नाही. शासनाकडे मागणी केल्यानंतर १९९५ च्या शासन आदेशाचा संदर्भ देत एकदा गाडी दिली की विमा, दुरुस्ती सर्व जबाबदारी त्या त्या संस्थेची असल्याचे सांगून त्यांनी हात झटकले आहेत. कर्नाटकच्या उच्च न्यायालयात जरी अपील दाखल करावयाचे असले, तरी नुकसानभरपाईच्या ५० टक्के म्हणजे किमान ४५ लाख रुपये भरण्याची गरज असल्याने आता त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. एकाला जर नुकसान भरपाई दिली, तर अन्य तिघांच्याही वारसांना ती द्यावी लागणार आहे.

निर्णय घेण्याची गरजअशा पद्धतीने कधीही कसाही अपघात होऊ शकतो. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्व वाहनांसह चालकांचा विमा उतरवण्याचा धाेरणात्मक निर्णय जिल्हा परिषदेला घ्यावा लागणार आहे. आरोग्य खात्याची वाहने आणि चालक यांचा विमा उतरवण्यासाठी वर्षाला १० लाख रुपयांची गरज असते. मात्र, तो न उतरवल्याने येथे कोट्यवधीची नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषदdoctorडॉक्टर