शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

Kolhapur- सहापदरी महामार्गाचा विचका : धोकादायक खोदकाम, खड्डे, अपूर्ण काम; सूचना फलकांचा अभाव

By संदीप आडनाईक | Updated: June 19, 2024 12:31 IST

सातारा-कोल्हापूर-कागल या राज्यमार्ग क्रमांक ४ च्या सहापदरीकरणाचे काम सुरू 

संदीप आडनाईककोल्हापूर : रोज किमान ९० हजार वाहनांची वर्दळ असणाऱ्या स्वप्निल स्वर्णिम चतुर्भुज परियोजनेतील सातारा-कोल्हापूर-कागल या राज्यमार्ग क्रमांक ४ च्या सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. परंतु, ठिकठिकाणी धोकादायक खोदकाम, महामार्गाला लागून असलेले खड्डे, बाजूपट्ट्यांवरचे अपूर्ण काम, वळण रस्ते, उपमार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यांना नसलेले फलक, सांडपाणी तसेच पावसाचे साचलेले दुर्गंधीयुक्त पाणी, उघड्या सळ्या यामुळे अपघाताला निमंत्रण देणारा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा हा प्रकल्प म्हणजे असून अडचण, नसून खोळंबा ठरत आहे.कर्नाटकच्या हद्दीतील कागल तालुक्यातील कोगनोळी गावापासून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवरील घुणकी येथील वारणा नदीवरच्या पुलापर्यंतच्या या पुणे ते बंगळुरू या राष्ट्रीय (जुना नंबर-एन.एच.४) महामार्गावरील कामाची पाहणी लोकमतच्या प्रतिनिधीने सोमवारी केली. ४५ किलोमीटरच्या या प्रवासासाठी पाऊण तास लागण्याची अपेक्षा असताना दीड तास लागला. या प्रवासात वाहनधारकांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते याची प्रचिती आली. सहापदरीकरणाचे बंगळुरूपासून कागलपर्यंतचे बहुतांशी काम पूर्ण झाले आहे. परंतु, कागलपासून वारणा नदीवरील पुलापर्यंतच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी कचऱ्याचे आणि सांडपाण्याचे साम्राज्य आहे. तेथे शेवाळ निर्माण झाल्याने दुर्गंधी येते ती वेगळीच.काम पूर्ण तरी मध्यभागी दाेन फूट उंचवटेउजळाईवाडी जवळ बाजूपट्ट्याचे समतलीकरण सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्ता पूर्ण आहे, मात्र उंचवट्यामुळे दोन भाग झाले आहेत. तेथील दोन फूट उंच उंचवटा तसाच आहे. संपूर्ण महामार्गावर सुमारे १३ ते १४ ठिकाणी वळण रस्ते आहेत. मात्र, अनेक ठिकाणी मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्यावर धोकादायक पद्धतीने चुकीच्या दिशेने वाहनांना जावे लागते. गोकूळ शिरगावच्या रस्त्यावर पाइपलाइनचे तोंड उघडेच आहे. पाणी साठल्यास येथे उतार समजून येत नसल्याने अपघाताची शक्यता आहे. लक्ष्मी टेकडीजवळ पाइपलाइनवर धोकादायक पद्धतीने सळया दिसतात.फलकांचा अभाव...अनेक ठिकाणी जेसीबीने दगड फोडण्याचे काम सुरू आहे. तेथे फलकच नाहीत. तावडे हॉटेल परिसरात कोल्हापूरकडे वळण्यासाठीही फलक नाही, त्यामुळे बाहेरचे प्रवासी गोंधळून जातात. तावडे हॉटेलपासून सांगली फाट्याजवळ महामार्गावर ठळक अक्षरात वळण रस्त्याचा फलक नाही. सांगलीकडे वळायचे त्या पुलाखाली अवैध वाहतूक करणारी वाहने थांबून आहेत. शिरोली एमआयडीसीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील बोगदा तर अस्वच्छतेचे आगार बनलेले आहे. बोगद्यात ठिकठिकाणी माती आणि दगडांचे खच पडलेले आहेत.

समतलीकरण न केल्याने उंचवटे अपघाताला कारणीभूतसादळे-मादळे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याजवळील वळण रस्ता धोकादायक आहे. येथे अनेक वाहने चुकीच्या दिशेने येतात. मंगरायाचीवाडी येथील वळण रस्त्याच्या बाजूला जोडलेल्या दोन रस्त्यांच्या मध्यभागातील चरी बुजविलेल्याच नाहीत. अनेक ठिकाणांचे समतलीकरण न केल्याने उंचवटे अपघाताला कारणीभूत ठरतात. एकूण वाहनधारकांना या मार्गावर सुलभ प्रवास करता येत नाही.अनेक ठिकाणी वाहतूक पोलिसांची अडवणूकमहामार्गावर बाहेरून येणाऱ्या तसेच जिल्ह्यातील प्रवाशांच्या वाहनांना वाहतूक पोलिस अडवणूक करताना आढळले. कागलच्या लक्ष्मी टेकडी परिसरात तसेच टोपजवळ या पोलिसांमुळेच वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्ग