शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

ईडी’च्या गैरवापराची मोदींकडूनच कबुली, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 15:45 IST

हिंदू राष्ट्राच्या नावाखाली देशाला एका रंगात बांधण्याचा भाजपचा प्रयत्न

गडहिंग्लज : राष्ट्रपतींच्या लोकसभेतील अभिभाषणाच्या उत्तरादाखल केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ईडी’मुळेच विरोधक एकत्र आल्याची टीका करून ‘ईडी’च्या गैरवापराची अप्रत्यक्षरित्या कबुलीच दिली आहे, असा आरोप प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी गुरुवारी (९) केला.एका घरगुती कार्यक्रमानिमित्त ते गडहिंग्लजला आले होते. दरम्यान, येथील शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गडहिंग्लज विभागाचे समन्वयक विद्याधर गुरबे यांची प्रमुख उपस्थिती होती.सावंत म्हणाले, सरकारची ताकद देऊन उद्योजक मित्राला वाचवणारे मोदी त्याच्या भ्रष्टाचाराबद्दल काहीच बोलायला तयार नाहीत. त्यामुळे तो भ्रष्टाचार सरकार पुरस्कृतच आहे. परंतु, देशातील विरोधकांचा आवाज दडपण्यासाठीच ‘ईडी’ सारख्या शासकीय यंत्रणेचा गैरवापर सुरू आहे.हिंदू राष्ट्राच्या नावाखाली देशाला एका रंगात बांधण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. परंतु, विविधता मानणारा हिंदू धर्म आणि मर्यादा पुरुषोत्तम रामाची शिकवणच त्यांना कळालेली नाही. त्यांचा विचारच मुळात हिंदू धर्माच्या विरोधी आहे. सर्वसमावेशकता हाच देशाचा आधार असून, तोच देशाला तारेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.सावंत म्हणाले..!

  • मुश्रीफांच्या घरावर छापा पडल्यानंतर ‘दिल्लीवाल्यांनी वचन पाळलं’ या सोमय्यांच्या विधानातून काय ध्वनीत होते? वारंवार छापे टाकून मुश्रीफांना नाहक त्रासच दिला जात आहे.
  • देशातील गंभीर परिस्थितीत एकजूट महत्त्वाची असताना, राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांमध्ये संघर्ष सुरू आहे. एक कार्यकर्ता म्हणून आपल्यालाही त्याचे दु:ख आहे. परंतु, ही पक्षांतर्गत बाब असून, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी याबाबत योग्य निर्णय घेईल.
  • सतेज पाटील यांच्या रूपाने उमदे नेतृत्व काँग्रेसला मिळाले आहे. त्यांची गुणवत्ता पक्षासमोर आहे. त्यामुळे माणिकराव ठाकरेंप्रमाणे त्यांच्या रूपाने मोठी जबाबदारी भविष्यात कोल्हापूरकडे नक्कीच येईल.

भाकड गाई त्यांच्या दारात बांधागोहत्या बंदीमुळे निर्माण झालेला भाकड गाईंचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन मोदींनी उत्तरप्रदेश व बिहारच्या निवडणुकीत दिले होते. परंतु, निवडणुकीनंतर त्यांना त्याचा विसर पडला आहे. त्यामुळे १४ फेब्रुवारीला ‘काऊ-डे’ साजरा करणाऱ्या भाजपवाल्यांनी वर्षभर ‘काऊ-डे’ साजरा करावा. स्मृती इराणींच्या हॉटेलमध्येही तो साजरा करावा. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या भाकड गाई भाजप नेत्यांच्या दारात बांधाव्यात, असा टोमणाही सावंत यांनी लगावला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNarendra Modiनरेंद्र मोदीSachin sawantसचिन सावंत