शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

Kolhapur: शासन दारी..९४ लाखांचा मांडव भारी, कार्यक्रमासाठी सुमारे साडेतीन कोटींचा खर्च

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: July 11, 2023 11:45 IST

शासनाच्या तिजोरीतून मोठा खर्च केला जात असल्याची विरोधी पक्षांची तक्रार होती

इंदुमती गणेशकोल्हापूर : शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचा भव्यदिव्य मांडवाचा खर्च ९४ लाखांवर तर लाभार्थींना कार्यक्रमस्थळी ने-आण करणाऱ्या एसटी बससाठी २ कोटी १४ लाख असे जवळपास ३ कोटींची बिले जिल्हा प्रशासनाकडे आली आहेत. लाभार्थींच्या जेवणाचा खर्च नेते व सामाजिक संस्थांनी केला आहे. अल्पोपाहार, योजनेची प्रचार-प्रसिद्धी यासह अन्य यंत्रणांची बिले काढण्याचे काम अजून सुरू असले तरी शासन आपल्या दारी येण्यासाठी सुमारे साडेतीन कोटी खर्च होण्याची शक्यता आहे.शासन आपल्या दारी उपक्रमाचा कोल्हापुरात १२ जूनला तपोवन मैदानावर दिमाखदार सोहळा झाला. यासाठी शासनाच्या तिजोरीतून मोठा खर्च केला जात असल्याची विरोधी पक्षांची तक्रार होती. या खर्चाबद्दल लोकांत कमालीची उत्सुकता असल्याने लोकमतने जिल्हा प्रशासनाकडून त्याची माहिती मिळवली. या कार्यक्रमासाठी कणेरी मठावरील लोकोत्सवासाठी घालण्यात आलेल्या मांडवाप्रमाणेच भव्य मांडव उभारण्यात आला होता, ही जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होती. मांडव, व्यासपीठ, खुर्च्या आणि विद्युत व्यवस्था यांचे मिळून विभागाने जिल्हा नियोजन समितीला ९८ लाखांचे बिल दिले आहे.

जर्मन हँगर पद्धतीचा मांडवजर्मन हँगर पद्धतीचा हा ३ लाख चौरस फुटांचा मांडव कॉलम फ्री म्हणजेच मध्ये एकही खांब न रोवता उभारण्यात आला होता. पाऊस झालाच तर मांडवाला गळती लागू नये, यासाठी वॉटरप्रूफ करण्यात आला होता. मांडव अग्निरोधक होता. विद्युत व्यवस्था, ठिकठिकाणी फॅनची सोय होती. तो घालण्यासाठी व काढण्यासाठी प्रत्येकी आठ दिवस यंत्रणा राबत होती.

नियोजनकडून ९६ लाखांना मान्यताशासनाने या कार्यक्रमासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या ०.२ टक्के निधी वापराला मान्यता दिली होती. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीने ४८० कोटींवर ९६.६३ लाखांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. दरम्यान, परिवहन महामंडळाकडून २ कोटी १४ लाखांचे बिल आले आहे, त्यापैकी ७० लाख रुपये सत्ताधारी आमदारांनी दिलेल्या निधीतून भागविण्यात येणार आहेत. उर्वरित बिल कसे द्यायचे यावर अजून शासनाकडून मार्गदर्शन आलेले नाही.

आमदारांकडून प्रत्येकी २० लाखसत्ताधारी पक्षातील आमदार विनय कोरे, प्रकाश आबिटकर, प्रकाश आवाडे आणि राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी प्रत्येकी २० लाख रुपये आमदार निधीतून दिले आहेत. विरोधी पक्षाच्या आमदारांनादेखील शक्य तितकी रक्कम द्यावी, असे मागणीचे पत्र पाठवण्यात आले आहे. पण अजून त्यांच्याकड़ून प्रतिसाद आलेला नाही.

मान्यतेनंतर निघणार बिले..लाभार्थींच्या जेवणाचा खर्च राजकीय नेत्यांनी व सामाजिक संस्थांनी केला आहे, त्यावर शासनाचा एकही पैसा खर्च झालेला नाही. सरकारी पैशांद्वारे भरलेल्या सर्व वस्तूंचे युनिट दर देखील प्रचलित बाजार दरांपेक्षा कमी आहेत. याशिवाय प्रचार, प्रसिद्धी, यंत्रणेतील इतर खर्च व त्यांची बिले काढण्याचे काम अजून प्रशासनाकडून सुरू आहे. जिल्हा नियोजन विभागाकडून पुनर्नियोजनाच्या निधीअंतर्गत अर्थ विभागाकडून मान्यता घेऊन बिले अदा केली जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरEknath Shindeएकनाथ शिंदे