शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

आजऱ्यातील वनौषधी पार्कला अवकळा

By admin | Updated: December 4, 2014 23:34 IST

६५ लाखांचा चुराडा : देखरेखीसाठी कामगार वर्गच नसल्याने वर्षभरातच दुरवस्था

ज्योतिप्रसाद सावंत - आजरा --महाराष्ट्र शासनाच्या कृषी व पणन विभागातर्फे आजरा येथे सुमारे १८ एकर क्षेत्रांवर ६५ लाख रुपये खर्च करून उभा करण्यात आलेल्या औषधी, सुगंधी वनस्पती व जैवविविधता पार्कला उद्घाटनानंतर वर्षभरातच अवकळा आली असून, देखरेखीसाठी कामगार वर्गच नसल्याने या पार्कची दुरवस्था झाली आहे.३० डिसेंबर २०१३ रोजी तत्कालीन कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या पार्कमध्ये पुढील सेवा सुविधा पुरवण्याकरिता ५० लाख रुपयांचा निधीही मंत्री पाटील यांनी जाहीर केला होता. ८० लाख लिटर पाणी स्त्रोत असणारे आलिशान तळे येथे बांधण्यात आले आहे. सामूहिक शेततळे, रोप लागवड, नक्षन वन, चाफा वन, वनौषधी संग्रहालय, सुगंधी गवत लागवड, तेलताड लागवड, गुरे प्रतिबंधक चर, काजू प्रक्षेत्र, नैसर्गिक वायू, अशा बऱ्याच बाबींचा या पार्कमध्ये समावेश होता.वनौषधी पार्कच्या देखरेखीची जबाबदारी येथील कृषी विभागाच्या बीज गुणन केंद्रावर सोपविण्यात आली. मुळातच बीज गुणन केंद्राकडे अपुरा कर्मचारी वर्ग व त्यातच या वनौषधी पार्कची जबाबदारी, अशी विचित्र अवस्था या विभागाची झाली. सद्य:स्थितीत १८ एकर क्षेत्राच्या साफसफाई, पाणी घालणे, गवत काढणे, आदी कामांसाठी एकमेव कर्मचारी ठेवण्यात आला आहे. या कर्मचाऱ्याकडून वर्षभरात या क्षेत्रातले गवत काढणेही अशक्य आहे. इतर कामांचा प्रश्न वेगळाच. आता हळूहळू या पार्कची अवस्था विचित्र होऊ लागली आहे. पार्कमध्ये सर्वत्र गवताचे साम्राज्य आहे. वनौषधी वनस्पती गवतामधून दिसेनाशी झाल्या आहेत. तळ्याशेजारील देखरेख इमारतीचा दरवाजा तुटला आहे. नक्षत्रांचे अराध्य वृक्ष गायब झाले आहेत. दुर्मीळ अशा वनस्पती खऱ्या अर्थाने दुर्मीळ झाल्या आहेत. तेलताडीचा पत्ता नाही. स्वच्छता नाही, असाच हा प्रकार आहे.मंत्री आले... दणक्यात उद्घाटन झाले... आश्वासनांची खैरात झाली; परंतु, प्रत्यक्षात वनौषधी पार्कच्या नशिबात उद्घाटनानंतर वर्षभरातच अवकळा आली.पुढे चर्चाच नाही : संभाजी पाटीलया वनौषधी पार्कच्या देखरेखीची जबाबदारी येथील तालुका शेतकरी मंडळाकडे सोपविण्याची चर्चा झाली; पण पुढे अचानक चर्चा थांबल्याने इच्छा असूनही आपण काहीच करू शकत नाही, असे मंडळाचे अध्यक्ष संभाजी सावंत यांनी स्पष्ट केले.अधिकारी बदलले, दृष्टी बदललीतत्कालीन जिल्हा कृषी अधीक्षक उमेश पाटील यांच्या प्रयत्नातून या वनौषधी पार्कची उभारणी करण्यात आली.परंतु, त्यांच्यानंतर मात्र या पार्कला कोणीच गांभीर्याने न घेतल्याने पार्कची दुरवस्था झाली आहे.