शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

‘आजरा घनसाळ’ला गुणवत्तेची राष्ट्रीय मोहर

By admin | Updated: April 3, 2016 03:50 IST

जी. आय. मानांकन : भातासाठी राज्यात प्रथमच, तर देशात आठवे मानांकन; विक्रीसाठी शेतकऱ्यांना घ्यावा लागणार परवाना

प्रकाश मुंज, कोल्हापूर भारत सरकारच्या भौगोलिक उपदर्शन रजिस्ट्रीच्यावतीने ३१ मार्च २०१६ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील ‘घनसाळ’ या भाताला मानांकित केले आहे. भातासाठी मिळालेले हे मानांकन महाराष्ट्रासाठी पहिलेच, तर देशात आठवे असून, यामुळे आता आजरा घनसाळ भात गुणवत्तेच्या जोरावर देशासोबत जागतिक पातळीवरही पोहोचणार आहे. यानिमित्त या सुवासिक भाताविषयी घेतलेला आढावा. ‘घन’ म्हणजे सुवास किंवा गंध आणि ‘साळ’ म्हणजे भात. घनसाळ भात लहान मुले, गरोदर स्त्रिया तसेच सतत आजारी असणाऱ्या लोकांना कॅल्शियमयुक्त असा सुगंधी, पौष्टिक, दर्जेदार व सात्त्विक आहे. या भातामध्ये स्निग्ध पदार्थांचे तसेच खनिज पदार्थ, कॅरोटीन यांचे प्रमाण अतिशय कमी असते; परंतु तांदळाच्या टरफलामध्ये ‘बी’ जीवनसत्त्वाचे प्रमाण भरपूर असते. भात पॉलिश करून टरफलामधून उरणारा कोंडा कोंबड्यांचे खाद्य म्हणून उपयोगात आणला जातो. घनसाळ भाताचे पीक उंच असल्यामुळे मळणीनंतर जनावरांसाठी उपयोगी पिंजार जास्त प्रमाणात मिळते. या दुहेरी उपयोगामुळे शेतकऱ्यांना याचा खूप फायदा होतो. याचबरोबर भाताच्या तुसाचा उपयोग वीट भाजण्यासाठी करतात. तूस जाळल्यानंतर मिळणाऱ्या काळपट राखेचा उपयोग जमिनीचा सामू सुधारण्यासाठी होतो. घनसाळ भाताचे उत्पादन जरी कमी असले तरी घनसाळला मिळणाऱ्या वाढीव दरामुळे शेतकऱ्यांना उत्पादन कमी पण भाव अधिक मिळतो. घनसाळ भाताचे रोप उंच असले तरी मिळणारे तांदूळ लहान आकाराचे व सुगंधी असतात. त्यामुळे किडींच्या प्रादुर्भावापासून वाचण्यास जास्त उपयोग होतो. शेतकऱ्यांच्या अपेक्षा घनसाळ भाताच्या उत्पादनासंदर्भात कृषी विद्यापीठ, कृषी अधिकारी, जिल्हा परिषद व विविध स्तरांतून मार्गदर्शन, प्रोत्साहन व विपणनासंदर्भात आधुनिक तंत्राच्या सहायाने शेती करण्याविषयी मार्गदर्शन व बाजारपेठेविषयी माहिती मिळावी. घनसाळ उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने विशेष अनुदान दिले पाहिजे. तसेच बँकांकडून पुरेसा कर्जपुरवठा मिळेल हे पाहिले पाहिजे. उत्पादन व विक्रीसाठी ‘तांदूळ महोत्सवाचे’ शासन पातळीवर आयोजन करणे गरजेचे आहे. १ ते ५ किलोमध्ये पॅकिंग उपलब्ध करणे जेणे करून लोकांना खरेदी करणे सोपे जाते. याचबरोबर आजरा घनसाळपासून बिस्किटस्, केक, इडली, उत्ताप्पा व इतर खाद्यपदार्थ बनविण्याची गरज आहे. अन्य मानांकित वस्तू नागपुरची संत्री, कोल्हापूरचा गूळ, वरळीचे पेंटिंग, नाशिकची द्राक्षे व वैली वाईन, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, पुणेरी पगडी, सोलापूरची चादर व टेरी टॉवेल, लासलगावचा कांदा, मंगळवेड्याची ज्वारी, वेंर्गुेलेचा काजू, नवापूरची तूरडाळ, सिंधुदुर्ग व रत्नागिरीचा कोकमसह राज्यातील पैटनी साडी व फेब्रिक्स. देशातील मानांकित वाण १. केरळचे नवरा भात २. केरळचे पोक्कली भात ३. केरळचे वायनाद जिराकसला भात ४. केरळचे गंधकसला भात ५. उत्तर प्रदेशचा कलन्माक भात ६. केरळचे कै पाड भात ७. उत्तर भारतातील बासमती ८. महाराष्ट्राचा आजरा घनसाळ भात आजरा घनसाळ भाताला जी. आय. चे मानांकन मिळाल्यामुळे याचे उत्पादन घेण्यापूर्वी आता चेन्नईतील जी. आय. कार्यालयातून शेतकऱ्यांना परवाना घ्यावा लागणार आहे. जे घेणार नाहीत त्यांना भात विकता येणार नाही. तसेच भेसळीवर नियंत्रण राहणार आहे. भेसळ होत असलेल्या ठिकाणी छापे टाकून असे प्रकार उघडकीस आणण्याची जबाबदारी मंडळावर आहे. - संभाजी सावंत, अध्यक्ष आजरा तालुका शेतकरी विकास मंडळ उत्पादन प्रक्रिया, पॅकिंग व पोषक मूल्य यांचे ब्रँडिग करून विदेशातील ‘अन्न व औषध’च्या कसोटींना आजरा घनसाळला उतरावे लागणार आहे. आजरा शेतकरी मंडळाने या भाताचे स्वतंत्र संकेतस्थळ सुरू केले पाहिजे. - प्राचार्य डॉ. एन. व्ही शहा, ‘घनसाळ’चे तज्ज्ञ, गगनबावडा घनसाळची कार्यक्षम मार्केटिंग व्यवस्था निर्माण करून हा तांदूळ ग्राहकांना उपलब्ध करून दिला पाहिजे. शहरांत व मॉल्स्मध्ये याचे प्रदर्शन व विक्री नियमित करावी म्हणजे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. - डॉ. रामदास बोलके, संशोधक विद्यार्थी, विद्यापीठ. मानांकनामुळे पारंपरिक शेतकऱ्यांत व्यावसायिक दृष्टी निर्माण होऊन उसापेक्षा अधिक दर पदरात पाडून घेण्यात तो अगे्रसर राहील. परवान्यासाठी चेन्नईतील जी. आय. कार्यालयात अर्ज करावे लागतील. याची फी कमी नसल्यास परवान्याला विरोध करू. - संभाजी इंदल, शेतकरी, आजरा.