शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रह्मोस एरोस्पेसच्या CEO ची नियुक्ती रद्द! 'कॅट'चा ऐतिहासिक निकाल; डॉ. जयतीर्थ जोशींना पदावरून हटवण्याचे आदेश
2
मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
3
मृत्यूशय्येवर होत्या, तरीही कालच दाखल केला उमेदवारी अर्ज! खालिदा झियांच्या मृत्यूने बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे मनसुबे धुळीस मिळाले
4
ATM कमी झाले, बँकेच्या शाखा वाढल्या; बचत खात्यांमध्ये मोठी वाढ, जमा रक्कम ३.३ लाख कोटींच्या पार
5
Video : मुंबईतील बस अपघाताचा व्हिडीओ आला समोर; भांडुपमध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांना बसने चिरडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थकाला 'बांगलादेशी' सोडून घेऊन गेले, आसाम पोलिसांवर हल्ला; १० जणांना अटक
7
मनसे सोडल्यावर प्रकाश महाजन पहिल्यांदाच राज ठाकरेंवर थेट बोलले; म्हणाले, “विठ्ठलानेच...”
8
"मला तो सीन करायचा नव्हता पण, रणवीरने...", 'धुरंधर'मधल्या 'त्या' कामुक सीनबाबत अभिनेत्याचा मोठा खुलासा
9
९०% लोकांना माहीतच नाही iPhoneची 'ही' जादू! स्क्रीनला हात न लावता सेकंदात करता येते काम
10
Stock Market Today: मंथली एक्सपायरीवर निराशाजनक सुरुवात; Sensex १२० अंकांनी घसरला, Nifty मध्ये ४० अंकांची घसरण
11
बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
12
पोर्टफोलिओमध्ये करा 'हे' ५ बदल! संरक्षण आणि आयटी शेअर्समध्ये मोठी संधी; पाहा नवीन टार्गेट प्राईस
13
'ती' गेल्याचं ऐकलं अन प्रियकरानेही प्राण सोडले! हॉस्पिटलमधून पळाला अन् काही तासांतच…
14
Silver Price: २०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?
15
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
16
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
17
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
18
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
19
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
20
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
Daily Top 2Weekly Top 5

पन्हाळ गडावरील शिवजयंती उत्सवारून परतताना दुचाकीला अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू

By उद्धव गोडसे | Updated: February 19, 2023 14:15 IST

या अपघातात संतोष आणि अक्षय यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर काही नागरिकांनी कदम दाम्पत्यासह नीलेश संकपाळ या तिघांना गंभीर अवस्थेत उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले.

कोल्हापूर : पन्हाळ गडावरील शिवजयंतीचा उत्साह अनुभवण्यासाठी गेलेल्या तीन मित्रांचा परतताना रजपूतवाडीजवळ अपघात झाला. दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोघे जागीच ठार झाले, तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली.

संतोष बाळासाहेब पाटील (वय ३४, रा. साळुंखे मळा, कदमवाडी, कोल्हापूर) आणि अक्षय सुरेश पाडळकर (वय २४, रा. भोसलेवाडी, हनुमान मंदिराजवळ, कोल्हापूर) अशी मृतांची नावे आहेत. नीलेश रवींद्र संकपाळ (वय ३४, रा. कदमवाडी, विठ्ठल मंदिराजवळ, कोल्हापूर), जयदीप जनार्दन कदम (वय ४५) आणि सुवर्णा जयदीप कदम (वय ४०, दोघेही रा. लक्ष्मी कॉलनी, टेंबलाईवाडी, कोल्हापूर) या जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनास्थळ आणि करवीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष पाटील, अक्षय पाडळकर आणि नीलेश संकपाळ हे तिघे मित्र पन्हाळ्यावरील शिवजयंतीचे वातावरण पाहण्यासाठी शनिवारी (दि. १८) रात्री उशिरा एकाच दुचाकीवरून पन्हाळ्याला गेले होते. रविवारी सकाळी ते परत येत होते. दरम्यान, रविवारी सकाळी टेंबलाईवाडीतील कदम दाम्पत्य जोतिबा डोंगरावर खेट्यासाठी त्यांच्या दुचाकीवरून निघाले होते. रजपूतवाडीच्या हद्दीत सई हॉटेलजवळ दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. 

या अपघातात संतोष आणि अक्षय यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर काही नागरिकांनी कदम दाम्पत्यासह नीलेश संकपाळ या तिघांना गंभीर अवस्थेत उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. प्रथमोपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवले.

मृत संतोष पाटील याच्या पश्चात ८० वर्षांची आजी आणि विवाहित बहीण आहे. १५ वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचा, तर १७ वर्षांपूर्वी त्याच्या आईचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी दोनवेळा झालेल्या अपघातातून संतोष बचावला होता. मृत अक्षय याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. संतोष, अक्षय आणि नीलेश हे तिघेही चांगले मित्र होते. ते गोकुळ शिरगाव एमआयडीसीत एकाच कंपनीत कामाला होते. अपघातात दोन उमदे तरुण दगावल्यामुळे कदमवाडी आणि भोसलेवाडी परिसरावर शोककळा पसरली आहे. मृतांच्या नातेवाईकांनी सीपीआरच्या अपघात विभागासमोर गर्दी केली होती. अपघाताची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली.

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूरShivjayantiशिवजयंती