शहरं
Join us  
Trending Stories
1
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
2
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
3
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
4
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
5
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
6
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
7
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
8
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
9
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
10
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
11
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
12
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
13
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
14
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
15
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
16
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
17
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
18
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
19
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
20
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...

Gram Panchayat Election: कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्याच दिवशी एकूण २५७ अर्ज दाखल, 'या' तालुक्यात एकही अर्ज नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 15:59 IST

सर्वाधिक ग्रामपंचायती राधानगरी तालुक्यातील ६६ असल्याने तेथील स्थानिक नेत्यांच्या प्रतिष्ठा पणास लागल्या आहेत.

कोल्हापूर : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून, सोमवारी पहिल्याच दिवशी सरपंचपदासाठी तब्बल ११९ अर्ज तर सदस्यपदांसाठी १३८ अर्ज दाखल झाले. गगनबावडा तालुक्यात सरपंच व सदस्यपदासाठी एकही अर्ज दाखल झालेला नाही. शुक्रवार (दि. २ डिसेंबर) पर्यंत अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे.जिल्ह्यातील ४७४ ग्रामपंचायतींसाठी रणधुमाळी सुरू झाली आहे. गावगाड्यातील राजकारणाने गती घेतली असून त्यामुळे तालुक्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची व्यवस्था केली आहे. सर्वाधिक ग्रामपंचायती राधानगरी तालुक्यातील ६६ असल्याने तेथील स्थानिक नेत्यांच्या प्रतिष्ठा पणास लागल्या आहेत. सोमवारी पहिल्या दिवशी जिल्ह्यातून ११९ उमेदवारांनी तेवढेच म्हणजे ११९ अर्ज दाखल केले आहेत. सदस्यपदासाठी १३८ अर्ज दाखल केले असून आज, मंगळवारपासून अर्जांचा ओघ वाढणार आहे.

बिनविरोधसाठी जोडण्या....अनेक गावात ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्यासाठी यंत्रणा सक्रिय झाली आहे. जेवढ्या जागा तेवढेच अर्ज कसे दाखल होतील, यासाठी स्थानिक नेत्यांचे प्रयत्न सुरु आहेत. काही ठिकाणी अर्ज भरल्यानंतर माघारीपर्यंत बिनविरोधसाठी प्रयत्न होणार आहेत.

इच्छुकांची संख्या पाहता दमछाक होणारपहिल्याच दिवशी आलेल्या अर्जांची संख्या पाहता इच्छुकांची संख्या वाढणार हे निश्चित आहे. त्यामुळे पॅनेल बांधणी करताना स्थानिक नेत्यांची पुरती दमछाक होणार आहे.

तालुकानिहाय असे अर्ज दाखल -

तालुका             ग्रामपंचायती सरपंचपद सदस्यपद
शाहूवाडी ४९ १४०५
पन्हाळा ५००८ २९
हातकणंगले३९१२ १७
शिरोळ १७ ०६०४
करवीर५३ २० २७
गगनबावडा २१ ० 
राधानगरी ६६१८१८
कागल२६०७०४
भुदरगड४३ १४ १०
आजरा३६०९१५
गडहिंग्लज ३४१००७
चंदगड४००१०२
टॅग्स :kolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक