शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

Kolhapur: पिसाळलेल्या कोल्ह्याचा सात शेतकऱ्यांवर हल्ला, ऊसतोड मजुरांनी भीतीने शेताकडे फिरविली पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2024 17:45 IST

गणेशवाडी : कृष्णा नदीपलीकडे औरवाड, गौरवाड, कवठेगुलंद या गावांमध्ये पिसाळलेला कोल्हा धुमाकूळ घालत असून, त्याने गेल्या चार दिवसांत या ...

गणेशवाडी : कृष्णा नदीपलीकडे औरवाड, गौरवाड, कवठेगुलंद या गावांमध्ये पिसाळलेला कोल्हा धुमाकूळ घालत असून, त्याने गेल्या चार दिवसांत या परिसरातील सात शेतकऱ्यांचा चावा घेऊन त्यांना गंभीर जखमी केले आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने या कोल्ह्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.औरवाड, गौरवाड परिसरात ऊस तोडणी सुरू असून शेतकरीवर्ग या कामात व्यस्त आहे. अशा परिस्थितीत या परिसरामध्ये गेल्या चार दिवसांपासून पिसाळलेला कोल्हा धुमाकूळ घालत असून, त्याने सात शेतकऱ्यांना चावा घेऊन गंभीर जखमी केले आहे. या शेतकऱ्यांना सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.औरवाड येथील अशोक मंगसुळे व अमर जगताप या शेतकऱ्यांचा या कोल्ह्याने चावा घेतला असून, गौरवाड व कवठेगुलंद येथील अन्य पाच शेतकऱ्यांचा चावा घेऊन गंभीर जखमी केले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी त्याचा पाठलाग करून त्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला असता तो तिथून प्रसार झाला असलातरी या परिसरामध्ये त्याचा अजून वावर असल्याने शेतकरीवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ऊस तोडणी करण्यासाठी ऊस मजूरही शेतात जाण्यास यामुळे तयार नाहीत. यामुळे शेतकऱ्यांची ऊस तोडणी खोळंबली असून, शेतकऱ्यांबरोबर ऊसतोड मजुरांमध्येही या पिसाळलेल्या कोल्ह्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वीही काही महिन्यांपूर्वी बिबट्यासदृश्य प्राण्याचे दर्शन झाल्याची घटना या परिसरात घडली होती. यानंतर आता पिसाळलेल्या कोल्ह्याने येथे धुमाकूळ घातल्यामुळे वनविभागाने या पिसाळलेल्या कोल्ह्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरforest departmentवनविभाग