शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

Kolhapur: पिसाळलेल्या कोल्ह्याचा सात शेतकऱ्यांवर हल्ला, ऊसतोड मजुरांनी भीतीने शेताकडे फिरविली पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2024 17:45 IST

गणेशवाडी : कृष्णा नदीपलीकडे औरवाड, गौरवाड, कवठेगुलंद या गावांमध्ये पिसाळलेला कोल्हा धुमाकूळ घालत असून, त्याने गेल्या चार दिवसांत या ...

गणेशवाडी : कृष्णा नदीपलीकडे औरवाड, गौरवाड, कवठेगुलंद या गावांमध्ये पिसाळलेला कोल्हा धुमाकूळ घालत असून, त्याने गेल्या चार दिवसांत या परिसरातील सात शेतकऱ्यांचा चावा घेऊन त्यांना गंभीर जखमी केले आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने या कोल्ह्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.औरवाड, गौरवाड परिसरात ऊस तोडणी सुरू असून शेतकरीवर्ग या कामात व्यस्त आहे. अशा परिस्थितीत या परिसरामध्ये गेल्या चार दिवसांपासून पिसाळलेला कोल्हा धुमाकूळ घालत असून, त्याने सात शेतकऱ्यांना चावा घेऊन गंभीर जखमी केले आहे. या शेतकऱ्यांना सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.औरवाड येथील अशोक मंगसुळे व अमर जगताप या शेतकऱ्यांचा या कोल्ह्याने चावा घेतला असून, गौरवाड व कवठेगुलंद येथील अन्य पाच शेतकऱ्यांचा चावा घेऊन गंभीर जखमी केले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी त्याचा पाठलाग करून त्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला असता तो तिथून प्रसार झाला असलातरी या परिसरामध्ये त्याचा अजून वावर असल्याने शेतकरीवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ऊस तोडणी करण्यासाठी ऊस मजूरही शेतात जाण्यास यामुळे तयार नाहीत. यामुळे शेतकऱ्यांची ऊस तोडणी खोळंबली असून, शेतकऱ्यांबरोबर ऊसतोड मजुरांमध्येही या पिसाळलेल्या कोल्ह्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वीही काही महिन्यांपूर्वी बिबट्यासदृश्य प्राण्याचे दर्शन झाल्याची घटना या परिसरात घडली होती. यानंतर आता पिसाळलेल्या कोल्ह्याने येथे धुमाकूळ घातल्यामुळे वनविभागाने या पिसाळलेल्या कोल्ह्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरforest departmentवनविभाग