शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ९६५ विकास संस्था तोट्यात

By admin | Updated: October 8, 2015 00:42 IST

४८ कोटींचा तोटा : पीक कर्जातील घटत्या नफ्याचा परिणाम; जिल्हा बँकेकडून कर्ज मिळण्यात अडचणी

राजाराम लोंढे - कोल्हापूर--पीक कर्जाचा कमी झालेला नफा, साखर कारखान्यांकडून वसुली न झाल्याने जिल्ह्यातील तब्बल ९६५ विकास सेवा संस्था आतबट्ट्यात आल्या आहेत. या संस्थांना संपलेल्या आर्थिक वर्षात ४८ कोटींचा तोटा झाला आहे. परिणामी सभासदांना लाभांश देता येत नाहीच, पण जिल्हा बँकेकडून कर्ज मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. जिल्ह्याच्या अर्थकारणाचे प्रमुख केंद्र म्हणून विकास सेवा संस्थांकडे पाहिले जाते. अलीकडील चार-पाच वर्षांत आर्थिक केंद्रे अडचणीत आली आहेत. पीक कर्जाचे वाटप करणे हा मुख्य उद्देश विकास संस्थांचा आहे, पण शासनाच्या धोरणांमुळे पीक कर्जातील नफा एकदम कमी झाला आहे. पीक कर्जामध्ये केवळ २ टक्के मार्जिन घेण्याचे आदेश शासनाचे आहेत. परिणामी संस्थांचे उत्पन्न व खर्च यामध्ये ताळमेळ बसत नाही. त्यात जिल्हा बँकेने २००९-१० पासून लाभांश दिला नसल्याने संस्था अधिक अडचणीत आल्या आहेत. जिल्ह्यातील १८३७ विकास संस्थांचे सुमारे १२५ कोटींचे शेअर्स भांडवल जिल्हा बँकेकडे आहे. त्यावर गेल्या पाच-सहा वर्षांत एक रुपयाही लाभांश मिळालेला नाही. सरासरी लाभांश १० टक्क्यांप्रमाणे प्रत्येक विकास संस्थेला एक ते दीड लाख रुपये मिळू शकते. तेही उत्पन्न बंद झाल्याने संस्थांचा ‘अंगापेक्षा बोंगा’च मोठा झाला आहे. साखर कारखान्यांच्या उलाढालीवरच विकास संस्थांचा ताळेबंद अवलंबून असतो. मात्र यंदा जानेवारीमध्ये तुटलेल्या उसाचे पैसे मिळालेले नाहीत. परिणामी त्यांची कर्ज खाती थकल्याने विकास संस्था अडचणीत आल्या आहेत. खर्चावर अंकुश हाच उपायशासनाचे धोरण, दिवसेंदिवस अडचणीत येणाऱ्या साखर कारखानदारीमुळे विकास संस्था चालविणे अवघड बनणार आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे वारेमाप खर्च करून संस्था टिकणार नाही. नोकर पगारासह व्यवस्थापन खर्चावर अंकुश राखणे हाच उपाय आहे. सक्षमीकरण योजनेचे पैसे कधी?अडचणीत सापडलेल्या विकास संस्थांना बाहेर काढण्यासाठी आघाडी सरकारने विकास संस्था सक्षमीकरण योजनेच्या माध्यमातून एकूण पीक कर्जाच्या १ टक्के पैसे देण्याचे मान्य केले आहे. त्यातून वर्षाला लहान संस्थेला कमीत कमी एक लाख रुपये मिळणार आहेत. त्यातील ५० कोटी रुपये राज्यासाठी मंजूर झाले आहेत, त्याचे वाटप झालेले नाही. विकास संस्थांचे उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसत नाही. यासाठी सरकारने पीक कर्जामधील मार्जिन १ टक्क्याने वाढवून दिले व जिल्हा बँकेने लाभांश दिला तर बऱ्यापैकी अडचणी कमी होऊ शकतात.- संभाजीराव चाबूक (जिल्हाध्यक्ष, गटसचिव संघटना) तोट्यात जाण्याची कारणेपीक कर्जाचे कमी झालेले मार्जिनजिल्हा बॅँकेकडून लाभांश नाहीउत्पन्नाचे स्रोत कमीसचिव वर्गणी व कर्मचारी पगारावरील खर्चतोट्यातील संस्थांचा परिणाम-सभासदांना लाभांश मिळणार नाहीस्वभांडवल धोक्यात येणारजिल्हा बॅँकेकडून कर्ज मिळण्यात अडचणीदृष्टिक्षेपात विकास संस्था- एकूण संस्था : १८३७ नफ्यातील : ८७२ (१८ कोटी ८१ लाख नफा) तोट्यातील : ९६५ (४८ कोटी ३ लाख तोटा)असा आहे ताळेबंद उत्पन्न : कर्ज वाटप, २ ते ४ टक्के व्याजदर, इमारत भाडेखर्च : सचिव पगार वर्गणी, बोनस, मानधन, संस्था कर्मचारी पगार, बोनस, संचालक भत्ते, सभा-समारंभ, आॅडिट फीसह शासकीय खर्च