शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

जिल्ह्यात द्राक्षे, बेदाण्याचे ९८० कोटींचे नुकसान

By admin | Updated: March 17, 2015 00:10 IST

सुभाष आर्वे : कर्जाची वसुली थांबविण्याची मागणी

सांगली : मार्च महिन्यात सलग तीनवेळा झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ४० ते ४५ हजार एकर क्षेत्रातील द्राक्षबागांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. बेदाणाही भिजल्यामुळे काळा पडल्याने शेतकऱ्यांना जवळपास ९८० कोटींचा फटका बसला आहे. या शेतकऱ्यांना शासनाने ठोस आर्थिक मदत करण्याची गरज आहे. तसेच पीक कर्ज आणि मध्यम मुदत कर्जाची वसुली बँकांनी तातडीने थांबवावी, अशी मागणी द्राक्ष बागाईतदार संघाचे उपाध्यक्ष सुभाष आर्वे, मानद सचिव नितीन देवल यांनी आज (सोमवारी) पत्रकार परिषदेत केली.ते पुढे म्हणाले की, दि. १ ते १४ मार्च या दोन आठवड्यांच्या कालावधित जिल्ह्यात तीनवेळा वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला आहे. बहुतांशी पाऊस हा तासगाव, मिरज, पलूस, कडेगाव, वाळवा, खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळ, जत या द्राक्षपट्ट्यातच झाला आहे. जिल्ह्यात एकूण एक लाख एकर द्राक्षबागेचे क्षेत्र आहे. यापैकी ४० टक्के क्षेत्रातील द्राक्षबागांमधील पिके शेतकऱ्यांनी काढली होती. २५ टक्के बागांची द्राक्षे निर्यात झाली आहेत. उर्वरित ६० टक्के द्राक्षे बागांमध्येच आहेत. द्राक्षघडामध्ये पाणी साचून राहिल्यामुळे मणी तडकू लागले आहेत. यामुळे ही द्राक्षे खरेदी करण्यास व्यापारी तयार नाहीत. बागेमध्ये द्राक्षमण्यांचा सडा पडला आहे. ४० ते ४५ हजार एकरातील द्राक्षबागांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांचे एकरी दोन लाख नुकसान गृहित धरल्यास केवळ द्राक्षांचेच आठशे कोटींचे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रात एक लाख ५० हजार टन बेदाणा तयार होतो. त्यापैकी सांगली जिल्ह्यात ७० टक्के म्हणजे एक लाख टन बेदाणा तयार होता. या बेदण्यापैकी ५० टक्के बेदाणा काळा पडला असून, या शेतकऱ्यांना प्रति किलो शंभर रूपयांचा फटका बसणार आहे. याचेही जवळपास १८० कोटी रूपयांचे नुकसान होणार असून, शेतकऱ्यांना शासनाने ठोस मदत देण्याची गरज आहे. सर्व कर्जांचे बिनव्याजी समान सात हप्त्यामध्ये पुनर्वसन करण्यात यावे, पुढील वर्षासाठी नियमित कर्जपुरवठा करण्याचीही मागणी आर्वे, देवल यांनी केली. (प्रतिनिधी)धोरण बदलावेकाढणीपश्चात द्राक्षे वाळवून बेदाणा तयार करण्यासाठी प्रक्रियेमध्ये असतात. यावेळी पाऊस झाल्यास जास्त आर्द्रतेमुळे बेदाण्याचा दर्जा खालावून मोठे नुकसान होते. शासकीय धोरणानुसार द्राक्षे वाळवून बेदाणे करावयाच्या शेडवरील नुकसानीचे पंचनामे करता येऊ शकत नाहीत, असे अधिकारी सांगत आहेत. द्राक्षे सांगली जिल्ह्यात तयार होत असून, बेदाणा सोलापूर जिल्ह्यातील जुनोनी परिसरात तयार होतो. याचेही पंचनामे सोलापूर जिल्ह्यातील अधिकारी करीत नाहीत. शासनाचे हे धोरण चुकीचे असून, ते बदलावे आणि पंचनामे करावेत, अशी मागणी आर्वे यांनी केली.अनुदानित प्लॅस्टिकची मागणीमहाराष्ट्रात ३ लाख एकर द्राक्षबागांचे क्षेत्र आहे. यापैकी गेल्यावर्षी दोन लाख मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात करून एक हजार ६०० कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले आहे. तसेच द्राक्ष निर्यातीसाठी भरपूर वाव आहे. द्राक्षबागांमुळे राज्यात आठ लाख मजुरांना रोजगारही मिळाला आहे. या द्राक्षबागा वाचविण्यासाठी शासनानेही पुढाकार घेण्याची गरज आहे. गेल्या तीन वर्षात नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्षबागायतदारांचे फार मोठे नुकसान होत आहे. नैसर्गिक नुकसान टाळण्यासाठी ‘संरक्षित द्राक्षशेती’ या नव्या तंत्राचा अवलंब जगात केला जात आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रातही अवलंब करण्यासाठी प्लॅस्टिक अच्छादनासाठी ५० टक्के अनुदानावर प्लॅस्टिक कागद द्यावा, अशी मागणी आर्वे यांनी केली.