शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

‘धनगर आरक्षणा’ साठी ८ सप्टेंबरचा ‘अल्टिमेटम’, कोल्हापुरात धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 18:13 IST

धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणीचा निर्णय सरकारने ८ सप्टेंबरपर्यंत घ्यावा, असा ‘अल्टिमेटम’ समस्त धनगर समाजातर्फे सोमवारी सरकारला देण्यात आला. याबाबतचा निर्णय होईपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात रास्ता रोको, चक्का जाम, तहसीलदारांना निवेदन या पद्धतीने आंदोलन सुरू ठेवू, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

ठळक मुद्देसमस्त धनगर समाजातर्फे सरकारला इशारा : सरकारचा वेळकाढूपणा : रानगे ‘यळकोट यळकोट...जय मल्हार’ च्या घोषणांनी परिसर दणाणला

कोल्हापूर : धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणीचा निर्णय सरकारने ८ सप्टेंबरपर्यंत घ्यावा, असा ‘अल्टिमेटम’ समस्त धनगर समाजातर्फे सोमवारी सरकारला देण्यात आला. याबाबतचा निर्णय होईपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात रास्ता रोको, चक्का जाम, तहसीलदारांना निवेदन या पद्धतीने आंदोलन सुरू ठेवू, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

हे सरकार वेळकाढूपणा करत समाजाची फसवणूक करत असल्याचा आरोप बबन रानगे यांनी केला.धनगर समाजासाठी अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी़, या मागणीसाठी संपूर्ण राज्यभर समाजातर्फे आंदोलन हाती घेतले आहे़ त्यानुसार कोल्हापूर समस्त धनगर समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी शासनाच्या निषेधार्थ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आंदोलनस्थळी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यानंतर समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांची भेट घेऊन अहिल्यादेवींची प्रतिमा व निवेदन सादर केले. भर पावसात जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले धनगर समाजबांधव ‘आरक्षणाची अंमलबजावणी झालीच पाहिजे’, ‘यळकोट, यळकोट...जय मल्हार’ असा जयघोष आणि भंडाऱ्यांची उधळण करत या आंदोलनात सहभागी झाले.बबन रानगे म्हणाले, सरकारने २०१४ च्या निवडणुकीच्या बारामती येथक्षल जाहीर सभेत सत्तेवर आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्येच आरक्षणाबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले होते; परंतु चार वर्षे झाली तरी यावर कोणताच निर्णय झालेला नाही. सरकार वेळकाढूपणा करत असून त्यांच्याकडून समाजाची फसवणूक सुरू आहे; यामुळे सरकारवर समाजाचा विश्वास राहिलेला नाही.बयाजी शेळके म्हणाले, घटना पुनर्विलोकन आयोगाची अध्यक्ष एन. वेंकटचलय्या यांनी २००३ मध्ये महाराष्ट्रातील सह्याद्री अतिथी गृह येथे येऊन जातीच्या नावातील घोळाबाबत सुनावणी घेऊन दुरुस्ती केली; त्यानुसार धनगड/धनगर अशी नोंद करण्यात आली; परंतु आजतागायत त्यानुसार अंमलबजावणी झालेली नाही.

प्रकाश पुजारी म्हणाले, आरक्षणासंदर्भात ८ सप्टेंबरपर्यंत निर्णय घेऊन अनुसूचित जमातीचे दाखले तरुणांना मिळाले नाही तर वेळप्रसंगी तीव्र आंदोलन करून मुख्यमंत्र्यांची खुर्ची हलवून सोडू.आंदोलनात एन. डी. बोडके, उदय डांगे, बाबूराव बोडके, सिद्धार्थ बन्ने, नारायण मोटे-देसाई, विठ्ठल भमांगूळ, शहाजी सिद, हरी पुजारी, विश्वास गावडे, विकास घागरे, राजेश बाणदार, नागेश पुजारी, विठ्ठल शिनगारे, आदींसह समाजबांधव सहभागी झाले होते. 

 

टॅग्स :Chakka jamचक्काजामkolhapurकोल्हापूर