शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

‘धनगर आरक्षणा’ साठी ८ सप्टेंबरचा ‘अल्टिमेटम’, कोल्हापुरात धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 18:13 IST

धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणीचा निर्णय सरकारने ८ सप्टेंबरपर्यंत घ्यावा, असा ‘अल्टिमेटम’ समस्त धनगर समाजातर्फे सोमवारी सरकारला देण्यात आला. याबाबतचा निर्णय होईपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात रास्ता रोको, चक्का जाम, तहसीलदारांना निवेदन या पद्धतीने आंदोलन सुरू ठेवू, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

ठळक मुद्देसमस्त धनगर समाजातर्फे सरकारला इशारा : सरकारचा वेळकाढूपणा : रानगे ‘यळकोट यळकोट...जय मल्हार’ च्या घोषणांनी परिसर दणाणला

कोल्हापूर : धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणीचा निर्णय सरकारने ८ सप्टेंबरपर्यंत घ्यावा, असा ‘अल्टिमेटम’ समस्त धनगर समाजातर्फे सोमवारी सरकारला देण्यात आला. याबाबतचा निर्णय होईपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात रास्ता रोको, चक्का जाम, तहसीलदारांना निवेदन या पद्धतीने आंदोलन सुरू ठेवू, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

हे सरकार वेळकाढूपणा करत समाजाची फसवणूक करत असल्याचा आरोप बबन रानगे यांनी केला.धनगर समाजासाठी अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी़, या मागणीसाठी संपूर्ण राज्यभर समाजातर्फे आंदोलन हाती घेतले आहे़ त्यानुसार कोल्हापूर समस्त धनगर समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी शासनाच्या निषेधार्थ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आंदोलनस्थळी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यानंतर समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांची भेट घेऊन अहिल्यादेवींची प्रतिमा व निवेदन सादर केले. भर पावसात जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले धनगर समाजबांधव ‘आरक्षणाची अंमलबजावणी झालीच पाहिजे’, ‘यळकोट, यळकोट...जय मल्हार’ असा जयघोष आणि भंडाऱ्यांची उधळण करत या आंदोलनात सहभागी झाले.बबन रानगे म्हणाले, सरकारने २०१४ च्या निवडणुकीच्या बारामती येथक्षल जाहीर सभेत सत्तेवर आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्येच आरक्षणाबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले होते; परंतु चार वर्षे झाली तरी यावर कोणताच निर्णय झालेला नाही. सरकार वेळकाढूपणा करत असून त्यांच्याकडून समाजाची फसवणूक सुरू आहे; यामुळे सरकारवर समाजाचा विश्वास राहिलेला नाही.बयाजी शेळके म्हणाले, घटना पुनर्विलोकन आयोगाची अध्यक्ष एन. वेंकटचलय्या यांनी २००३ मध्ये महाराष्ट्रातील सह्याद्री अतिथी गृह येथे येऊन जातीच्या नावातील घोळाबाबत सुनावणी घेऊन दुरुस्ती केली; त्यानुसार धनगड/धनगर अशी नोंद करण्यात आली; परंतु आजतागायत त्यानुसार अंमलबजावणी झालेली नाही.

प्रकाश पुजारी म्हणाले, आरक्षणासंदर्भात ८ सप्टेंबरपर्यंत निर्णय घेऊन अनुसूचित जमातीचे दाखले तरुणांना मिळाले नाही तर वेळप्रसंगी तीव्र आंदोलन करून मुख्यमंत्र्यांची खुर्ची हलवून सोडू.आंदोलनात एन. डी. बोडके, उदय डांगे, बाबूराव बोडके, सिद्धार्थ बन्ने, नारायण मोटे-देसाई, विठ्ठल भमांगूळ, शहाजी सिद, हरी पुजारी, विश्वास गावडे, विकास घागरे, राजेश बाणदार, नागेश पुजारी, विठ्ठल शिनगारे, आदींसह समाजबांधव सहभागी झाले होते. 

 

टॅग्स :Chakka jamचक्काजामkolhapurकोल्हापूर