शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
2
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
3
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
4
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
5
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
6
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
7
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
8
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
9
एका कुशीवरुन दुसऱ्या कुशीवर... पण काही केल्या झोपच येईना; 'या' ६ टिप्स गाढ झोपेमागचं रहस्य
10
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
11
चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना
12
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
13
एका शेअरने बदललं गुंतवणूकदारांचे नशीब! १ लाखाची गुंतवणूक ५ वर्षांत झाली ३४ लाखांहून अधिक
14
Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप!
15
विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, कोळी बांधवांचा लालबाग मंडळावर गंभीर आरोप
16
अवघे पाऊणशे वयमान! सत्तरीत जग फिरण्याचं स्वप्न; ३५ देशांची सोलो ट्रिप, कोण आहे 'ट्रॅव्हल अम्मा'?
17
पितृपक्ष २०२५: कधी आहे सर्वपित्री अमावास्या? खंडग्रास सूर्यग्रहण लागणार; पाहा, काही मान्यता
18
'...तरच गाझा युद्ध थांबेल'; शांतता चर्चेत नवा ट्विस्ट, इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांचे मोठे विधान!
19
पितृपक्ष २०२५: १५ दिवस स्वामी सेवेने पितृदोष मुक्तता; १ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील
20
एडटेक कंपनी 'फिजिक्स वाला'चा ३८२० कोटींचा आयपीओ; सेबीकडे दस्तऐवज दाखल, कुठे करणार गुंतवणूक?

कोल्हापूर जिल्ह्यात ८७ गावांमध्ये अंत्यसंस्काराला स्मशानभूमीच नाही, पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात सर्वाधिक गावे

By समीर देशपांडे | Updated: July 22, 2025 17:16 IST

जागा मिळेना, प्रश्न सुटेना, शेवटच्या प्रवासाची चिंता मिटेना

समीर देशपांडेकोल्हापूर : प्रत्येकाच्या आयुष्याची अखेर ठरलेली आहे; परंतु हा शेवटचा प्रवासही सुखाचा व्हावा, अशी इच्छा सर्वांचीच असते; परंतु जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील ८७ गावे आणि वाड्यांवर अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीच नाही. त्यामुळे या गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागा मिळेना, प्रश्न सुटेना आणि शेवटच्या प्रवासाची चिंता मिटेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.प्रत्येक गावाला, वाडीला, वस्तीला स्मशानभूमी गरजेची असते; परंतु अनेक ठिकाणी जागांची अडचण असल्याने स्मशानभूमीच नसल्याचे दिसून येते. त्यामुळे वैयक्तिक शेतामध्ये बहुतांशीवेळा अंत्यसंस्कार करण्यात येतात; परंतु अशावेळी अनेक मर्यादा येतात. भावकीमध्ये जर मतभेद नसतील तर प्रश्न निर्माण होत नाहीत; परंतु अनेकदा गावपातळीवर ज्यांची गुंठाभरही जमीन नाही अशांची कुचंबना होते. गेली अनेक वर्षे या गावांमध्ये स्मशानभूमी नाही, ही वस्तुस्थिती आहे; परंतु याबाबत काही ठोस कार्यवाही होताना दिसत नाही. केवळ प्रशासकीय पातळीवर हा प्रश्न सुटणारा नाही, हीदेखील वस्तुस्थिती आहे.मंत्री, आमदार आणि खासदार यांनी यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे. कारण अनेकदा जागा मिळवताना स्थानिक पातळीवर अडचणी येतात. अशा प्रकरणांमध्ये त्या-त्या परिसराच्या लोकप्रतिनिधींनी लक्ष घातले तर हे प्रश्न सुटू शकतात. अनेक तालुक्यांतील मोठ्या गावांमध्येही स्मशानभूमी नसल्याचे दिसून येते. वास्तविक स्मशानभूमी आणि तिकडे जाणारे रस्ते यासाठी निधीची उपलब्धता सहज होत असताना इतक्या वाड्या- वस्त्यांवर आणि गावांमध्ये स्मशानभूमी नसणे भूषणावह नाही.

स्मशानभूमी नसलेली तालुकावार गावे

  • राधानगरी - २१
  • आजरा - १६
  • भुदरगड - १३
  • शाहूवाडी - १२
  • करवीर - १०
  • चंदगड - ०९
  • शिरोळ - ०५
  • हातकणंगले - ०१
  • एकूण - ८७

खास योजना तयार करण्याची गरजया सर्व गावांमध्ये जर स्मशानभूमी करायची असेल तर त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून योजना तयार करण्याची गरज आहे. त्यातून जागा घेण्यासाठी अनुदान देऊन त्या ठिकाणी लवकरात लवकर स्मशानभूमी कशी करता येईल, याकडे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी खास लक्ष देऊन तशी योजना जाहीर करण्याची मागणी होत आहे. त्यांच्याच मतदारसंघात स्मशानभूमी नसलेली गावे अधिक आहेत.