शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

८१ हजार शेतकऱ्यांना हवी दोन टप्प्यांत एफआरपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 00:41 IST

राजाराम लोंढे । कोल्हापूर : चौदा दिवसांत उसाची एकरकमी एफआरपी देणे कायद्याने बंधनकारक असले तरी आता दोन-तीन टप्प्यांत एफआरपी ...

राजाराम लोंढे ।कोल्हापूर : चौदा दिवसांत उसाची एकरकमी एफआरपी देणे कायद्याने बंधनकारक असले तरी आता दोन-तीन टप्प्यांत एफआरपी देण्यासाठी शेतकऱ्यांनीच संमती दिल्याने साखर कारखाने कायद्याच्या कचाट्यातून सुटले आहेत. ऊसनोंदीचा करार करतानाच सर्वच कारखान्यांनी तसे लेखी लिहून घेतले आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील तब्बल ८१ हजार ७५० शेतकºयांनी संमती दिल्याने कारखाने सुटले. मात्र, शेतकरी अडकणार, हे निश्चित आहे.शेतकºयांना उसाची निघणारी रक्कम विनाकपात एकरकमी १४ दिवसांत देण्याचा कायदा १९६६ साली केंद्र सरकारने केला असला तरी त्याची खºया अर्थाने अंमलबजावणी शेतकरी संघटनांच्या उठावानंतरच झाली. तोपर्यंत कारखान्यांचा हंगाम संपल्यानंतर पहिला हप्ता, गौरी-गणपतीला ५०-७५ रुपयांचा दुसरा हप्ता आणि दुसरा हंगाम सुरू होण्याअगोदर अंतिम बिल दिले जायचे. मात्र, २००४ पासून उसाची किमान किंमत वेळेत देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली. शेतकºयाचा ऊस गाळपासाठी उचल केल्यापासून १४ दिवसांच्या आत ‘एफआरपी’प्रमाणे त्या उसाचे पैसे देणे बंधनकारक आहे. या कालावधीत पैसे न दिल्यास पैसे देईपर्यंतच्या काळात या रकमेवर १५ टक्क्यांप्रमाणे व्याज शेतकºयांना द्यावे लागते. गेल्या दोन-तीन वर्षांपासून ‘स्वाभिमानी’सह ‘आंदोलन अंकुश’, ‘जय शिवराय’ या संघटनांनी कायद्याचा आधार घेऊन साखर कारखान्यांची कोंडी केली. एकरकमी एफआरपीच नव्हे, तर १४ दिवसांनंतर होणारे व्याज वसुलीसाठी संघटनांनी साखर आयुक्तांकडे तगादा लावल्यानेच गेल्या हंगामात सर्वाधिक कारखान्यांवर ‘आरआरसी’च्या कारवाई झाल्या.कायदा आणि कारवाईच्या धसक्याने कारखान्यांनी ‘एफआरपी’ दोन-तीन टप्प्यांत देण्यासाठी शेतकºयांकडून संमंतीपत्रे घेतली. कोल्हापूर जिल्ह्यातील १२ कारखान्यांकडील ४५ हजार ९५५ शेतकºयांनी, तर सांगली जिल्ह्यातील १२ कारखान्यांकडील ३५ हजार ७९५ शेतकºयांनी संमतीपत्रे दिली आहेत. विशेष म्हणजे सांगलीतील सर्वच कारखान्यांनी संमतीपत्रे घेतली आहेत. एफआरपीचे तुकडे केल्याने कर्जाचे हप्ते थकणार, त्यातून व्याज फुगणार आणि त्याचा फटका शेतकºयांना बसणार आहे. त्यामुळे संमतीपत्राने कारखाने सुटले मात्र शेतकरी अडकणार, हे निश्चित आहे.-------------------------------------मागील हंगामापासून ‘हा’ प्रयोगमागील हंगामात शेतकरी संघटनांचा प्रभाव असलेल्या शिरोळ तालुक्यातील कारखान्यांनी संमतीपत्रांचा प्रयोग केला होता. त्याचे लोण आता जिल्ह्यात पसरले आहे.------------------------------------कारखानानिहाय संमती दिलेल्या शेतकºयांची संख्या :भोगावती १२,०७१राजाराम २,२१२अप्पासाहेब नलवडे ५,९५०जवाहर ३,१००कुंभी-कासारी ५,७०९शरद १,६२२गायकवाड ३,००६डी. वाय. पाटील ७,०१०दालमिया २,०७१गुरुदत्त १,३११इको केन १,०६४इंदिरा (अथणी) ८२९एकूण ४५,९५५...................हुतात्मा १,२३४राजारामबापू साखराळे२,०७९राजारामबापू, वाटेगाव१,५६४सोनहिरा २,३९०वसंतदादा २,३९०विश्वासराव नाईक ३,५२५क्रांती ७४६मोहनराव श्ािंदे १,००२सर्वोदय ७००निनाईदेवी (दालमिया)२,९४१सद्गुरू ८५७उदगिरी १६,४०७एकूण ३५,७९५...................................शेतकरी मात्र अनभिज्ञविभागातील ७५ टक्क्यांपेक्षा अधिक शेतकºयांनी संमतीपत्रे दिल्याचे साखर सहसंचालक कार्यालयाच्या अहवालावरून दिसून येते. मात्र ज्यांनी संमतीपत्रे दिली, त्या शेतकºयांना याबाबत काहीच माहीत नाही. मग कारखान्यांनी नेमकी संमती कोणाकडून व कशी घेतली? हा प्रश्न आहे.आपल्या कष्टाचे पैसे दोन-तीन टप्प्यांत द्या, असे एकही शेतकरी म्हणणार नाही. ही कारखानदारांची मखलाशी असून, या संमतीच्या पत्राच्या आडून कायद्यातून सुटण्याचा कोणी प्रयत्न करीत असेल, तर गाठ ‘स्वाभिमानी’शी आहे.- प्रा. जालंदर पाटील, राज्याध्यक्ष, ‘स्वाभिमानी’ संघटना