शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

८१ हजार शेतकऱ्यांना हवी दोन टप्प्यांत एफआरपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 00:41 IST

राजाराम लोंढे । कोल्हापूर : चौदा दिवसांत उसाची एकरकमी एफआरपी देणे कायद्याने बंधनकारक असले तरी आता दोन-तीन टप्प्यांत एफआरपी ...

राजाराम लोंढे ।कोल्हापूर : चौदा दिवसांत उसाची एकरकमी एफआरपी देणे कायद्याने बंधनकारक असले तरी आता दोन-तीन टप्प्यांत एफआरपी देण्यासाठी शेतकऱ्यांनीच संमती दिल्याने साखर कारखाने कायद्याच्या कचाट्यातून सुटले आहेत. ऊसनोंदीचा करार करतानाच सर्वच कारखान्यांनी तसे लेखी लिहून घेतले आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील तब्बल ८१ हजार ७५० शेतकºयांनी संमती दिल्याने कारखाने सुटले. मात्र, शेतकरी अडकणार, हे निश्चित आहे.शेतकºयांना उसाची निघणारी रक्कम विनाकपात एकरकमी १४ दिवसांत देण्याचा कायदा १९६६ साली केंद्र सरकारने केला असला तरी त्याची खºया अर्थाने अंमलबजावणी शेतकरी संघटनांच्या उठावानंतरच झाली. तोपर्यंत कारखान्यांचा हंगाम संपल्यानंतर पहिला हप्ता, गौरी-गणपतीला ५०-७५ रुपयांचा दुसरा हप्ता आणि दुसरा हंगाम सुरू होण्याअगोदर अंतिम बिल दिले जायचे. मात्र, २००४ पासून उसाची किमान किंमत वेळेत देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली. शेतकºयाचा ऊस गाळपासाठी उचल केल्यापासून १४ दिवसांच्या आत ‘एफआरपी’प्रमाणे त्या उसाचे पैसे देणे बंधनकारक आहे. या कालावधीत पैसे न दिल्यास पैसे देईपर्यंतच्या काळात या रकमेवर १५ टक्क्यांप्रमाणे व्याज शेतकºयांना द्यावे लागते. गेल्या दोन-तीन वर्षांपासून ‘स्वाभिमानी’सह ‘आंदोलन अंकुश’, ‘जय शिवराय’ या संघटनांनी कायद्याचा आधार घेऊन साखर कारखान्यांची कोंडी केली. एकरकमी एफआरपीच नव्हे, तर १४ दिवसांनंतर होणारे व्याज वसुलीसाठी संघटनांनी साखर आयुक्तांकडे तगादा लावल्यानेच गेल्या हंगामात सर्वाधिक कारखान्यांवर ‘आरआरसी’च्या कारवाई झाल्या.कायदा आणि कारवाईच्या धसक्याने कारखान्यांनी ‘एफआरपी’ दोन-तीन टप्प्यांत देण्यासाठी शेतकºयांकडून संमंतीपत्रे घेतली. कोल्हापूर जिल्ह्यातील १२ कारखान्यांकडील ४५ हजार ९५५ शेतकºयांनी, तर सांगली जिल्ह्यातील १२ कारखान्यांकडील ३५ हजार ७९५ शेतकºयांनी संमतीपत्रे दिली आहेत. विशेष म्हणजे सांगलीतील सर्वच कारखान्यांनी संमतीपत्रे घेतली आहेत. एफआरपीचे तुकडे केल्याने कर्जाचे हप्ते थकणार, त्यातून व्याज फुगणार आणि त्याचा फटका शेतकºयांना बसणार आहे. त्यामुळे संमतीपत्राने कारखाने सुटले मात्र शेतकरी अडकणार, हे निश्चित आहे.-------------------------------------मागील हंगामापासून ‘हा’ प्रयोगमागील हंगामात शेतकरी संघटनांचा प्रभाव असलेल्या शिरोळ तालुक्यातील कारखान्यांनी संमतीपत्रांचा प्रयोग केला होता. त्याचे लोण आता जिल्ह्यात पसरले आहे.------------------------------------कारखानानिहाय संमती दिलेल्या शेतकºयांची संख्या :भोगावती १२,०७१राजाराम २,२१२अप्पासाहेब नलवडे ५,९५०जवाहर ३,१००कुंभी-कासारी ५,७०९शरद १,६२२गायकवाड ३,००६डी. वाय. पाटील ७,०१०दालमिया २,०७१गुरुदत्त १,३११इको केन १,०६४इंदिरा (अथणी) ८२९एकूण ४५,९५५...................हुतात्मा १,२३४राजारामबापू साखराळे२,०७९राजारामबापू, वाटेगाव१,५६४सोनहिरा २,३९०वसंतदादा २,३९०विश्वासराव नाईक ३,५२५क्रांती ७४६मोहनराव श्ािंदे १,००२सर्वोदय ७००निनाईदेवी (दालमिया)२,९४१सद्गुरू ८५७उदगिरी १६,४०७एकूण ३५,७९५...................................शेतकरी मात्र अनभिज्ञविभागातील ७५ टक्क्यांपेक्षा अधिक शेतकºयांनी संमतीपत्रे दिल्याचे साखर सहसंचालक कार्यालयाच्या अहवालावरून दिसून येते. मात्र ज्यांनी संमतीपत्रे दिली, त्या शेतकºयांना याबाबत काहीच माहीत नाही. मग कारखान्यांनी नेमकी संमती कोणाकडून व कशी घेतली? हा प्रश्न आहे.आपल्या कष्टाचे पैसे दोन-तीन टप्प्यांत द्या, असे एकही शेतकरी म्हणणार नाही. ही कारखानदारांची मखलाशी असून, या संमतीच्या पत्राच्या आडून कायद्यातून सुटण्याचा कोणी प्रयत्न करीत असेल, तर गाठ ‘स्वाभिमानी’शी आहे.- प्रा. जालंदर पाटील, राज्याध्यक्ष, ‘स्वाभिमानी’ संघटना