शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
2
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
3
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
4
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
5
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
7
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
8
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
9
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
10
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
11
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
12
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
13
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
14
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
15
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
16
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
17
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
18
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
19
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
20
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून ८० टक्के रोजगार भूमिपुत्रांना : सुभाष देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 17:39 IST

बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर शासनाने भर दिला आहे, असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शनिवारी येथे केले.

ठळक मुद्देबाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा, उद्योगक्षेत्रात ८० टक्के रोजगार भूमिपुत्रांना : सुभाष देसाई कौशल्य विकासासाठी जिल्हा नियोजनमधून एक कोटीची तरतूद : पालकमंत्री

कोल्हापूर : मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करण्यासाठी उद्योगांना बळ देण्याचे काम सुरू असून या क्षेत्रात ८० टक्के रोजगार स्थानिक भूमिपुत्रांना देणे ही शासनाची भूमिका आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर शासनाने भर दिला आहे, असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शनिवारी येथे केले; तर याच कार्यक्रमात कौशल्य विकासासाठी जिल्हा नियोजनमधून एक कोटींची तरतूद केल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.उद्योग विभागातर्फे पेटाळा येथील पद्माराजे गर्ल्स हायस्कूलच्या आवारात आयोजित बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रकांत पाटील होते. प्रमुख उपस्थिती अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमन मित्तल, उद्योग सहसंचालक व्ही. एल. राजाळे, आदींची होती.उद्योगमंत्री देसाई म्हणाले, उद्योगक्षेत्रात गेल्या साडेचार वर्षांत आमूलाग्र सुधारणा आणि बदल करण्यात आले आहेत. उद्योजकांना यापूर्वी घ्याव्या लागणाऱ्या सुमारे ७५ परवानग्यांची संख्या कमी करून ती आता केवळ १० ते १५ वर आणली आहे. त्याबरोबरच उद्योगघटकांना पायाभूत सुविधा आणि सवलती देण्यास शासनाने प्राधान्य दिले आहे. बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर शासनाने भर दिला असून, आतापर्यंत पुणे, ठाणे, नाशिक या ठिकाणी झालेल्या मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. कोल्हापूर येथील मेळाव्यातूनही अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.पालकमंत्री पाटील म्हणाले, तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच सर्व जिल्ह्यांत कौशल्य प्रशिक्षणास प्राधान्य दिले आहे. कौशल्य विकासाला अधिक व्यापकता देण्याच्या उद्देशाने जिल्हा नियोजन समितीतून यासाठी एक कोटीची तरतूद करण्याचा मानस आहे. तसेच नवउद्योजकांना भाग भांडवलासाठी दोन कोटींच्या निधीची तरतूद करण्यावर शासनाने भर दिला आहे.आमदार क्षीरसागर म्हणाले, रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून अधिकाधिक तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. 

 

टॅग्स :Subhash Desaiसुभाष देसाईkolhapurकोल्हापूर