शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

आठ दिवसांत ४७ डेंग्यूसदृश रुग्ण, महापालिकेची उपाययोजना सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 12:20 IST

कोल्हापूर शहरात डेंग्यूसदृश रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याची तसेच आठ दिवसांत तापाचे ४७ रुग्ण आढळल्याची बाब समोर येत असल्यामुळे महापालिका आरोग्य विभागातर्फे डेंग्यूला प्रतिबंध करण्याकरिता घराघरांत पाणीसाठ्यात अळीनाशक टेमिफॉस सोडणे, गप्पी मासे सोडणे, व्हेंट पाईपला जाळी बांधणे, टायर जप्ती मोहीम घेणे अशा उपाययोजना केल्या जात आहेत.

ठळक मुद्देआठ दिवसांत ४७ डेंग्यूसदृश रुग्ण महापालिकेची उपाययोजना सुरू

कोल्हापूर : शहरात डेंग्यूसदृश रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याची तसेच आठ दिवसांत तापाचे ४७ रुग्ण आढळल्याची बाब समोर येत असल्यामुळे महापालिका आरोग्य विभागातर्फे डेंग्यूला प्रतिबंध करण्याकरिता घराघरांत पाणीसाठ्यात अळीनाशक टेमिफॉस सोडणे, गप्पी मासे सोडणे, व्हेंट पाईपला जाळी बांधणे, टायर जप्ती मोहीम घेणे अशा उपाययोजना केल्या जात आहेत.शहरात डेंग्यूला प्रतिबंध करण्याकरिता आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश आरोग्य विभागास दिले आहेत. त्यानुसार गेल्या शनिवारपासून ही मोहीम राबविण्यात येत आहे. मोहिमेसाठी आरोग्य विभागाकडील १३ सॅनिटेशन वॉर्ड तसेच नागरी आरोग्यकेंद्र यांची संयुक्तपणे १३ पथके तयार करण्यात आली आहेत.

मोहिमेअंतर्गत शहरातील सर्वच ८१ प्रभागांमध्ये तापाच्या रुग्णांचा सर्व्हे करणे, डास अळी सर्वेक्षण करणे, औषध फवारणी करणे, धूर फवारणी करणे, नागरिकांमध्ये डेंग्यू या आजाराविषयी हस्तपत्रकेद्वारे जनजागृती करणे, आदी कामे केली जात आहेत. गेल्या आठ दिवसांत तापाचे ४७ रुग्ण आढळून आले आहेत. शुक्रवारी ९६४ घरांत झालेल्या सर्व्हेक्षणात तापाचे १८ रुग्ण आढळून आले.शुक्रवारअखेर ५९ प्रभागांमध्ये मोहीम पूर्ण करण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये ८९६६ इतक्या घरांचे सर्व्हेक्षण करण्यात आलेले आहे. डास अळी असलेल्या परिसरात औषध फवारणी, धूर फवारणी करण्यात आलेली आहे. सदरची मोहीम साधारणत: २०० कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने राबविण्यात येत आहे. यासाठी ६५ स्प्रे पंप, २३ धूर फवारणी मशीनद्वारे धूर फवारणी करण्यात आलेली आहे.

 

टॅग्स :dengueडेंग्यूMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर