शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

ग्रामपंचायत, नगरपालिकांची ७,८४१ कोटींची वीज थकबाकी माफ; ऊर्जा विभागाचा मोठा निर्णय 

By समीर देशपांडे | Updated: January 11, 2023 13:58 IST

मुद्दलाची रक्कम शासन महावितरणला भरणार

कोल्हापूर : राज्यातील ग्रामपंचायत, नगरपालिकांची पाणी योजना आणि रस्त्यावरील दिव्यांची सात हजार ८४१ कोटींची व्याज आणि मुद्दलाची वीज थकबाकी माफ करण्यात आली आहे. यातील व्याज महावितरण माफ करणार असून मुद्दलाची रक्कम शासन महावितरणला भरणार आहे. याबाबत सोमवारी ऊर्जा विभागाने आदेश काढला आहे.केंद्र शासनाच्या कर्जविषयक मार्गदर्शक तत्त्वांमध्ये वित्तीय संस्थांनी आणि राष्ट्रीयीकृत बॅंकांनी वीजवितरण कंपन्यांना कर्ज मंजूर करताना शासकीय विभागांची वीज देयके थकबाकी शून्य असण्याची अट घातली आहे. यामुळे महावितरणला नवीन कर्ज उभारणी अशक्य झाले आहे. एकीकडे प्रचंड प्रमाणात थकबाकी आणि दुसरीकडे कर्ज उभारणीवर आलेल्या मर्यादा यातून मार्ग काढण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १३ जुलै २०२२ रोजी घेतलेल्या बैठकीत एकरकमी परतफेड योजना तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार हा माफीचा निर्णय घेण्यात आला आहे.

हा घेतला निर्णय

  • ३० जून २०२२ पर्यंत ग्रा.पं.चे पाणी योजना आणि पथदिव्यांची ३,७७५ कोटी रुपये मुद्दल थकीत आहे. ही रक्कम शासन भरणार आहे. तर व्याजाची तीन हजार ६८२ कोटी रुपयांची रक्कम महावितरण माफ करणार आहे.
  • याच मुदतीतील नगर पंचायती आणि नगरपालिकांची १८६ कोटी २५ लाख रुपयांची मुद्दल थकबाकी शासन भरणार आहे. तर १९८ कोटी ६४ लाख रुपयांचे व्याज महावितरण माफ करणार आहे.
  • ३० जून २०२२ नंतरची ही बिले मात्र ग्रामपंचायत, नगर पंचायत आणि नगरपालिकांना भरावी लागणार आहेत.

महावितरणवरील कर्ज३१ मार्च २०२०/ ३९ हजार १५२ कोटी रुपये३० जून २०२२/ ५३ हजार ३६९ कोटी रुपयेमहावितरणची थकबाकी३१ मार्च २०२०/ ५९ हजार ८३३ कोटी रुपये३१ मे २०२२/ ६७ हजार १४९ कोटी रुपयेकर वाढवण्याबाबत उदासीनता

  • ग्रामस्थांचा रोष नको, म्हणून ग्रामपंचायती घरफाळा आणि पाणीपट्टी वाढवत नाहीत. त्यामुळे अनेकवेळा वीजबिले थकीत होण्याचे प्रमाण अधिक आहे.
  • त्यामुळे एकीकडे गावागावात कोट्यवधीच्या विकास योजना राबवताना त्या त्या गावातील सुविधांच्या प्रमाणात कर आकारणी बाबत ही शासनाने बंधन घालण्याची गरज आहे.

 

वीजबिल थकबाकीमुळे गेली अनेक वर्षे स्ट्रीटलाइटच्या नव्या कामास मंजुरी मिळत नव्हती. नव्याने नागरिकरण झालेल्या वस्त्या अंधारातच राहिल्या होत्या. त्यामुळे लोकप्रतिनिधींना नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागत होते. या निर्णयामुळे नागरिकांना दिलासा मिळेल. - उत्तम आंबवडे, सरपंच, उजळाईवाडी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायतelectricityवीजmahavitaranमहावितरण