शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यातील ६५ अंगणवाडी कर्मचारी कामावर हजर, काम बंद आंदोलनाला एक महिना पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 13:20 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कारवाईमुळे भीती

कोल्हापूर : जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये गुरुवारी ६५ कर्मचारी कामावर हजर झाल्या आहेत. या कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनाला गुरुवारी एक महिना पूर्ण झाला असून, अजूनही कोणताच तोडगा न निघाल्याने या कर्मचारी कामावर रुजू झाल्या आहेत.‘मानधन नको, वेतन हवे’ यासह अन्य मागण्यांसाठी ४ डिसेंबरपासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चारही संघटनांनी गेल्या महिन्याभरात वेळाेवेळी जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलने केली आहेत. मुंबई येथे या प्रश्नी झालेल्या बैठकीतही काही तोडगा निघाला नाही, तर नागपूर येथे विधानसभा अधिवेशनावेळीही मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. परंतु, तरीही निर्णय झाला नाही. अखेर बुधवार, ३ डिसेंबरपासून मुंबईत आझाद मैदानावर या कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे.

मात्र, हे आंदोलन सुरू होऊन एक महिना झाल्यानंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यातूनच नव्याने नेमणूक झालेल्या सेविका आणि मदतनिसांना प्रशासनाने कामावर हजर होण्याचे आवाहन केल्यामुळे जिल्ह्यात गुरुवारी ५५ मदतनीस आणि १० सेविका कामावर हजर झाल्या आहेत. यामध्ये शाहूवाडी तालुक्यातील प्रमाण अधिक असून, त्याखालोखाल करवीर आणि कागल तालुक्यातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कारवाईमुळे भीतीसिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नव्याने हजर झालेल्या ४० हून अधिक अंगणवाडी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतला. त्यांच्याऐवजी प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याची कुणकुण लागल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील नव्याने नेमण्यात आलेल्या कर्मचारीही कामावर रुजू होत आहेत. मात्र, अशा पद्धतीने संपात सहभागी होण्याचा या कर्मचाऱ्यांचा अधिकार शासन हिरावून घेऊ शकत नाही, असे संघटनांचे म्हणणे आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरStrikeसंप