शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

उपचार थांबविलेल्या ४९० एचआयव्ही संसर्गित रुग्णांपैकी ६३ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 11:07 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील एडस्वरील उपचार थांबविलेल्या ४९० एचआयव्ही संसर्गित रुग्णांपैकी ६३ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक यांच्या वतीने दीड महिन्याच्या सर्वेक्षणातून ही आकडेवारी समोर आली असून, यातील तब्बल १७९ जणांचे पत्ते चुकीचे असल्याचेही निष्पन्न झाले आहे. असे असले तरी जिल्ह्यातील १२२०० जण नियमित उपचाराव्दारे आरोग्यपूर्ण जीवन जगत आहेत, हेदेखील यानिमित्ताने लक्षात घ्यायला हवे.

ठळक मुद्देउपचार थांबविलेल्या ४९० एचआयव्ही संसर्गित रुग्णांपैकी ६३ जणांचा मृत्यूकोल्हापूर जिल्ह्याचे चित्र, १२२०० जण जगताहेत आरोग्यपूर्ण जीवन

समीर देशपांडेकोल्हापूर : जिल्ह्यातील एडस्वरील उपचार थांबविलेल्या ४९० एचआयव्ही संसर्गित रुग्णांपैकी ६३ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक यांच्या वतीने दीड महिन्याच्या सर्वेक्षणातून ही आकडेवारी समोर आली असून, यातील तब्बल १७९ जणांचे पत्ते चुकीचे असल्याचेही निष्पन्न झाले आहे. असे असले तरी जिल्ह्यातील १२२०० जण नियमित उपचाराव्दारे आरोग्यपूर्ण जीवन जगत आहेत, हेदेखील यानिमित्ताने लक्षात घ्यायला हवे.या जिल्हास्तरीय संस्थेने गेली काही वर्षे किर्लोस्कर आॅईल इंजिन्स यांच्या सामाजिक बांधीलकी उपक्रमांतर्गत मिळालेल्या अर्थसाहाय्यातून विविध मोहिमा हाती घेतल्या होत्या.

यंदा ‘संवेदना शोध मोहीम २०१९’अंतर्गत १ डिसेंबर २०१८ ते १५ जानेवारी २०१९ या दीड महिन्याच्या कालावधीमध्ये एकात्मिक समुपदेशन चाचणी केंद्राच्या ४८ कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील ४९० एडस्विषयक उपचार थांबविलेल्या रुग्णांची प्रत्यक्ष भेट घेण्याचा युद्धपातळीवरील कार्यक्रम हाती घेण्यात आला.या कर्मचाऱ्यांनी आपले नियमित कामकाज सांभाळून जिल्ह्यासह अगदी शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यांतील वाड्या-वस्त्यांवर जाऊन, शहरातील झोपडपट्ट्यांमधून फिरून हे सर्वेक्षण केले आहे. या ४९० जणांचे सर्वेक्षण केले असता ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. यातील चक्क ६३ जणांचे निधन झाले असून, १७९ जणांचे पत्ते चुकीचे निघाले आहेत.

४३ जणांनी शासकीय रुग्णालयात उपचारास नकार दिला आहे. बहुधा ते खासगी उपचार घेत असावेत; तर ३८ जणांनी पुन्हा उपचार सुरू करण्याची खात्री दिली आहे. २२ जणांनी प्रत्यक्ष उपचार सुरू केले असून, ९३ जण नोंदणी केलेल्या ठिकाणाहून औषधे न घेता इतर ठिकाणाहून घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ५२ जणांनी स्थलांतर केले आहे, तर १५ जणांचा संपर्क होऊ शकलेला नाही.

उपचार थांबविण्याची कारणे

  1. सामाजिक परिस्थितीमुळे रुग्णांना संकोच वाटतो.
  2.  उपचारासाठी येण्याजाण्याचा प्रवास खर्च परवडत नाही.
  3.  औषधांचे काही साईड इफेक्ट होतात.

 

 

आता एड्स रुग्णाविषयीचा समाजाचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. अजूनही समाजाने अशांना आधार देण्याची गरज आहे. त्यातूनच त्यांचा संकोच कमी होईल. आता उपचारासाठी येण्याजाण्याचा खर्चही देण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे. तसेच औषधांचे साईड इफेक्ट होण्याचे प्रमाण आता कमी झाले आहे. एक-दोन आठवडे असा परिणाम राहतो. औषधे बदलूनही देता येतात. या सर्व बाबींचा विचार केला तर रुग्णांसमोर उपचार थांबविणे हा पर्यायच असता कामा नये. जिल्ह्यातील १२२०० नागरिक आरोग्यपूर्ण जीवन जगत आहेत. त्यामुळे यापुढील काळात अशा रुग्णांनी उपचार थांबवू नयेत.- दीपा शिपूरकरजिल्हा कार्यक्रम अधिकारी, (एडस्), कोल्हापूर

टॅग्स :Healthआरोग्यkolhapurकोल्हापूर