शहरं
Join us  
Trending Stories
1
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
6
Alka Kubal : अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
7
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
8
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
9
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
11
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
12
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
13
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
14
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
15
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
16
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
17
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
18
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
19
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
20
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या

उपचार थांबविलेल्या ४९० एचआयव्ही संसर्गित रुग्णांपैकी ६३ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 11:07 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील एडस्वरील उपचार थांबविलेल्या ४९० एचआयव्ही संसर्गित रुग्णांपैकी ६३ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक यांच्या वतीने दीड महिन्याच्या सर्वेक्षणातून ही आकडेवारी समोर आली असून, यातील तब्बल १७९ जणांचे पत्ते चुकीचे असल्याचेही निष्पन्न झाले आहे. असे असले तरी जिल्ह्यातील १२२०० जण नियमित उपचाराव्दारे आरोग्यपूर्ण जीवन जगत आहेत, हेदेखील यानिमित्ताने लक्षात घ्यायला हवे.

ठळक मुद्देउपचार थांबविलेल्या ४९० एचआयव्ही संसर्गित रुग्णांपैकी ६३ जणांचा मृत्यूकोल्हापूर जिल्ह्याचे चित्र, १२२०० जण जगताहेत आरोग्यपूर्ण जीवन

समीर देशपांडेकोल्हापूर : जिल्ह्यातील एडस्वरील उपचार थांबविलेल्या ४९० एचआयव्ही संसर्गित रुग्णांपैकी ६३ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक यांच्या वतीने दीड महिन्याच्या सर्वेक्षणातून ही आकडेवारी समोर आली असून, यातील तब्बल १७९ जणांचे पत्ते चुकीचे असल्याचेही निष्पन्न झाले आहे. असे असले तरी जिल्ह्यातील १२२०० जण नियमित उपचाराव्दारे आरोग्यपूर्ण जीवन जगत आहेत, हेदेखील यानिमित्ताने लक्षात घ्यायला हवे.या जिल्हास्तरीय संस्थेने गेली काही वर्षे किर्लोस्कर आॅईल इंजिन्स यांच्या सामाजिक बांधीलकी उपक्रमांतर्गत मिळालेल्या अर्थसाहाय्यातून विविध मोहिमा हाती घेतल्या होत्या.

यंदा ‘संवेदना शोध मोहीम २०१९’अंतर्गत १ डिसेंबर २०१८ ते १५ जानेवारी २०१९ या दीड महिन्याच्या कालावधीमध्ये एकात्मिक समुपदेशन चाचणी केंद्राच्या ४८ कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील ४९० एडस्विषयक उपचार थांबविलेल्या रुग्णांची प्रत्यक्ष भेट घेण्याचा युद्धपातळीवरील कार्यक्रम हाती घेण्यात आला.या कर्मचाऱ्यांनी आपले नियमित कामकाज सांभाळून जिल्ह्यासह अगदी शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यांतील वाड्या-वस्त्यांवर जाऊन, शहरातील झोपडपट्ट्यांमधून फिरून हे सर्वेक्षण केले आहे. या ४९० जणांचे सर्वेक्षण केले असता ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. यातील चक्क ६३ जणांचे निधन झाले असून, १७९ जणांचे पत्ते चुकीचे निघाले आहेत.

४३ जणांनी शासकीय रुग्णालयात उपचारास नकार दिला आहे. बहुधा ते खासगी उपचार घेत असावेत; तर ३८ जणांनी पुन्हा उपचार सुरू करण्याची खात्री दिली आहे. २२ जणांनी प्रत्यक्ष उपचार सुरू केले असून, ९३ जण नोंदणी केलेल्या ठिकाणाहून औषधे न घेता इतर ठिकाणाहून घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ५२ जणांनी स्थलांतर केले आहे, तर १५ जणांचा संपर्क होऊ शकलेला नाही.

उपचार थांबविण्याची कारणे

  1. सामाजिक परिस्थितीमुळे रुग्णांना संकोच वाटतो.
  2.  उपचारासाठी येण्याजाण्याचा प्रवास खर्च परवडत नाही.
  3.  औषधांचे काही साईड इफेक्ट होतात.

 

 

आता एड्स रुग्णाविषयीचा समाजाचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. अजूनही समाजाने अशांना आधार देण्याची गरज आहे. त्यातूनच त्यांचा संकोच कमी होईल. आता उपचारासाठी येण्याजाण्याचा खर्चही देण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे. तसेच औषधांचे साईड इफेक्ट होण्याचे प्रमाण आता कमी झाले आहे. एक-दोन आठवडे असा परिणाम राहतो. औषधे बदलूनही देता येतात. या सर्व बाबींचा विचार केला तर रुग्णांसमोर उपचार थांबविणे हा पर्यायच असता कामा नये. जिल्ह्यातील १२२०० नागरिक आरोग्यपूर्ण जीवन जगत आहेत. त्यामुळे यापुढील काळात अशा रुग्णांनी उपचार थांबवू नयेत.- दीपा शिपूरकरजिल्हा कार्यक्रम अधिकारी, (एडस्), कोल्हापूर

टॅग्स :Healthआरोग्यkolhapurकोल्हापूर