शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

अद्याप ६२ टक्के पूरबाधित ऊस शेतातच, कारखान्यांकडून थंडा प्रतिसाद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2021 17:28 IST

अजूनही ११ हजार ६५३ हेक्टरवरील नदीकाठाला तोडीच्या प्रतीक्षेत आहे. केवळ ३८ टक्केच ऊस गाळपासाठी गेला असून ६२ टक्के ऊस शिवारातच आहे.

नसीम सनदी कोल्हापूर : आधीच निसर्गाने मारले असल्याने सहानुभूती ठेवून साखर कारखान्यांनी पूरबाधित ऊस हंगामाच्या पहिल्या टप्प्यातच तोडून न्यावा असे सक्त आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी देऊन देखील त्याचा विसर पडल्यासारखीच जिल्ह्यातील परिस्थिती आहे. पुराचा सामना करावा लागणाऱ्या १९ कारखान्यांनी हंगाम सुरू झाल्याच्या या दोन महिन्यात १८ हजार ८७४ पैकी ७२२१ हेक्टवरीलच ऊस तोडला आहे. अजूनही ११ हजार ६५३ हेक्टरवरील नदीकाठाला तोडीच्या प्रतीक्षेत आहे. केवळ ३८ टक्केच ऊस गाळपासाठी गेला असून ६२ टक्के ऊस शिवारातच आहे.ऊस ऐन वाढीच्या अवस्थेत असताना जुलैच्या शेवटच्या आठवड्यात आलेल्या महापुराने नदी-ओढ्याकाठच्या पिकाचे अतोनात नुकसान केले. निसर्गाच्या या अवकृपेमुळे ऊस उत्पादक सलग तिसऱ्या वर्षी मोडून वाढला. त्याला आधार देण्यासाठी म्हणून स्वत: जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी पुढाकार घेत पूरबाधित प्राधान्याने तोडावा असा आग्रह धरला. यासाठी प्रादेशिक साखर सहसंचालकांच्या नेतृत्वाखाली नियंत्रण समिती देखील नेमली. रोजच्या रोज आढावा घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.यासंदर्भात स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी तीनवेळा कारखाना प्रतिनिधींशी बैठक घेऊन त्यांना ६०: ४०या प्रमाणात तोडीचे नियोजन करण्यास सांगण्यात आले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही परिस्थितीत नोव्हेबर अखेरपर्यंत पूरबाधित ऊस तुटला पाहिजे असे सक्त आदेशही काढले, पण आता नोव्हेंबर संपण्यास आठ दिवसांचा कालावधी उरला असताना वस्तूस्थिती तपासली असता १९ कारखान्यांनी केवळ ३८ टक्केच ऊस तोडला असल्याचे निदर्शनास आले आहे.खासदार मागे, मंत्री पुढे- पूर बाधित ऊस तोडण्यामध्ये खासदार संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखालील मंडलिक कारखान्याने केवळ १४ टक्केच ऊस तोडला आहे. 

- याउलट पालकमंत्री सतेज पाटील यांच्या डी.वाय कारखान्याने ५२ टक्के, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सरसेनापती कारखान्याने ६५ टक्के तर, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या शरद कारखान्याने ५९ टक्के ऊस गाळप केला आहे.

उसाचे मग सरपणच..!- नदीकाठचा ऊस गाळाने माखला आहे. त्याला आता किरळे फुटू लागली आहेत. गुंठ्याला १० मोळी देखील चांगला ऊस निघणार नाही 

- आता तर उन्हाचा तडाखा जसा वाढेल तसे या उसाचे सरपणच होणार आहे. काडी लावून पेटवून देण्याशिवाय शेतकऱ्यांसमोर पर्याय राहणार नाही. 

- आता हे क्षेत्र तुटले तर रान रिकामे करुन रब्बी पीक घेता येणे शक्य आहे.

टक्केवारीराजाराम, कुंभी, गुरुदत्त, दत्त शिराेळ, शरद, दालमिया, दौलत, डी.वाय, जवाहर, बिद्री या कारखान्यांकडे एक हजार हेक्टरवरील पूरबाधित उसाची नाेद आहे. पण दालमियाचा ५८ टक्के, डी.वाय ५२, बिद्री ४८ टक्केचा अपवाद वगळता उर्वरित कारखान्यांची टक्केवारी ४० टक्क्यांच्या आतच आहे.

कारखानानिहाय पूर बाधित ऊस (हेक्टरमध्ये )

कारखाना पूर बाधित नोंद तुटलेले क्षेत्र टक्केवारी शिल्लक ऊस
वारणा ५८४ १९५३३३८९
पंचगंगा ७९४१२२१५६७१
कुंभी१६३८४६१२८११७७
बिद्री १००८ ४८५४८५२३
भोगावती ८१९१५९ १९६६०
दत्त २३२१८४४३६ १४७६
शाहू ८१६१७८ २१६३८
जवाहर१२४८३९७ ३१८५१
राजाराम१७७१ ५१०२८१२६१
आजरा ५५४४ ८०११
मंडलिक४६३६५ १४ ३९७
शरद१४४८ ८६३५९ ५८५
डी.वाय १०५९ ५५२ ५२ ५०६
अथणी६१ ४५७२   १६
दालमिया १२११७०७ ५८ ५०३
गुरुदत्त१५२२३९३ २५  ११२८
इको केन ६९५० ७२ १९
ओलम४४७ ४१९९३२७
सेनापती ३६५२४० ६५१२५

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने