शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

अद्याप ६२ टक्के पूरबाधित ऊस शेतातच, कारखान्यांकडून थंडा प्रतिसाद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2021 17:28 IST

अजूनही ११ हजार ६५३ हेक्टरवरील नदीकाठाला तोडीच्या प्रतीक्षेत आहे. केवळ ३८ टक्केच ऊस गाळपासाठी गेला असून ६२ टक्के ऊस शिवारातच आहे.

नसीम सनदी कोल्हापूर : आधीच निसर्गाने मारले असल्याने सहानुभूती ठेवून साखर कारखान्यांनी पूरबाधित ऊस हंगामाच्या पहिल्या टप्प्यातच तोडून न्यावा असे सक्त आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी देऊन देखील त्याचा विसर पडल्यासारखीच जिल्ह्यातील परिस्थिती आहे. पुराचा सामना करावा लागणाऱ्या १९ कारखान्यांनी हंगाम सुरू झाल्याच्या या दोन महिन्यात १८ हजार ८७४ पैकी ७२२१ हेक्टवरीलच ऊस तोडला आहे. अजूनही ११ हजार ६५३ हेक्टरवरील नदीकाठाला तोडीच्या प्रतीक्षेत आहे. केवळ ३८ टक्केच ऊस गाळपासाठी गेला असून ६२ टक्के ऊस शिवारातच आहे.ऊस ऐन वाढीच्या अवस्थेत असताना जुलैच्या शेवटच्या आठवड्यात आलेल्या महापुराने नदी-ओढ्याकाठच्या पिकाचे अतोनात नुकसान केले. निसर्गाच्या या अवकृपेमुळे ऊस उत्पादक सलग तिसऱ्या वर्षी मोडून वाढला. त्याला आधार देण्यासाठी म्हणून स्वत: जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी पुढाकार घेत पूरबाधित प्राधान्याने तोडावा असा आग्रह धरला. यासाठी प्रादेशिक साखर सहसंचालकांच्या नेतृत्वाखाली नियंत्रण समिती देखील नेमली. रोजच्या रोज आढावा घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.यासंदर्भात स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी तीनवेळा कारखाना प्रतिनिधींशी बैठक घेऊन त्यांना ६०: ४०या प्रमाणात तोडीचे नियोजन करण्यास सांगण्यात आले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही परिस्थितीत नोव्हेबर अखेरपर्यंत पूरबाधित ऊस तुटला पाहिजे असे सक्त आदेशही काढले, पण आता नोव्हेंबर संपण्यास आठ दिवसांचा कालावधी उरला असताना वस्तूस्थिती तपासली असता १९ कारखान्यांनी केवळ ३८ टक्केच ऊस तोडला असल्याचे निदर्शनास आले आहे.खासदार मागे, मंत्री पुढे- पूर बाधित ऊस तोडण्यामध्ये खासदार संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखालील मंडलिक कारखान्याने केवळ १४ टक्केच ऊस तोडला आहे. 

- याउलट पालकमंत्री सतेज पाटील यांच्या डी.वाय कारखान्याने ५२ टक्के, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सरसेनापती कारखान्याने ६५ टक्के तर, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या शरद कारखान्याने ५९ टक्के ऊस गाळप केला आहे.

उसाचे मग सरपणच..!- नदीकाठचा ऊस गाळाने माखला आहे. त्याला आता किरळे फुटू लागली आहेत. गुंठ्याला १० मोळी देखील चांगला ऊस निघणार नाही 

- आता तर उन्हाचा तडाखा जसा वाढेल तसे या उसाचे सरपणच होणार आहे. काडी लावून पेटवून देण्याशिवाय शेतकऱ्यांसमोर पर्याय राहणार नाही. 

- आता हे क्षेत्र तुटले तर रान रिकामे करुन रब्बी पीक घेता येणे शक्य आहे.

टक्केवारीराजाराम, कुंभी, गुरुदत्त, दत्त शिराेळ, शरद, दालमिया, दौलत, डी.वाय, जवाहर, बिद्री या कारखान्यांकडे एक हजार हेक्टरवरील पूरबाधित उसाची नाेद आहे. पण दालमियाचा ५८ टक्के, डी.वाय ५२, बिद्री ४८ टक्केचा अपवाद वगळता उर्वरित कारखान्यांची टक्केवारी ४० टक्क्यांच्या आतच आहे.

कारखानानिहाय पूर बाधित ऊस (हेक्टरमध्ये )

कारखाना पूर बाधित नोंद तुटलेले क्षेत्र टक्केवारी शिल्लक ऊस
वारणा ५८४ १९५३३३८९
पंचगंगा ७९४१२२१५६७१
कुंभी१६३८४६१२८११७७
बिद्री १००८ ४८५४८५२३
भोगावती ८१९१५९ १९६६०
दत्त २३२१८४४३६ १४७६
शाहू ८१६१७८ २१६३८
जवाहर१२४८३९७ ३१८५१
राजाराम१७७१ ५१०२८१२६१
आजरा ५५४४ ८०११
मंडलिक४६३६५ १४ ३९७
शरद१४४८ ८६३५९ ५८५
डी.वाय १०५९ ५५२ ५२ ५०६
अथणी६१ ४५७२   १६
दालमिया १२११७०७ ५८ ५०३
गुरुदत्त१५२२३९३ २५  ११२८
इको केन ६९५० ७२ १९
ओलम४४७ ४१९९३२७
सेनापती ३६५२४० ६५१२५

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने