शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

अद्याप ६२ टक्के पूरबाधित ऊस शेतातच, कारखान्यांकडून थंडा प्रतिसाद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2021 17:28 IST

अजूनही ११ हजार ६५३ हेक्टरवरील नदीकाठाला तोडीच्या प्रतीक्षेत आहे. केवळ ३८ टक्केच ऊस गाळपासाठी गेला असून ६२ टक्के ऊस शिवारातच आहे.

नसीम सनदी कोल्हापूर : आधीच निसर्गाने मारले असल्याने सहानुभूती ठेवून साखर कारखान्यांनी पूरबाधित ऊस हंगामाच्या पहिल्या टप्प्यातच तोडून न्यावा असे सक्त आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी देऊन देखील त्याचा विसर पडल्यासारखीच जिल्ह्यातील परिस्थिती आहे. पुराचा सामना करावा लागणाऱ्या १९ कारखान्यांनी हंगाम सुरू झाल्याच्या या दोन महिन्यात १८ हजार ८७४ पैकी ७२२१ हेक्टवरीलच ऊस तोडला आहे. अजूनही ११ हजार ६५३ हेक्टरवरील नदीकाठाला तोडीच्या प्रतीक्षेत आहे. केवळ ३८ टक्केच ऊस गाळपासाठी गेला असून ६२ टक्के ऊस शिवारातच आहे.ऊस ऐन वाढीच्या अवस्थेत असताना जुलैच्या शेवटच्या आठवड्यात आलेल्या महापुराने नदी-ओढ्याकाठच्या पिकाचे अतोनात नुकसान केले. निसर्गाच्या या अवकृपेमुळे ऊस उत्पादक सलग तिसऱ्या वर्षी मोडून वाढला. त्याला आधार देण्यासाठी म्हणून स्वत: जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी पुढाकार घेत पूरबाधित प्राधान्याने तोडावा असा आग्रह धरला. यासाठी प्रादेशिक साखर सहसंचालकांच्या नेतृत्वाखाली नियंत्रण समिती देखील नेमली. रोजच्या रोज आढावा घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.यासंदर्भात स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी तीनवेळा कारखाना प्रतिनिधींशी बैठक घेऊन त्यांना ६०: ४०या प्रमाणात तोडीचे नियोजन करण्यास सांगण्यात आले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही परिस्थितीत नोव्हेबर अखेरपर्यंत पूरबाधित ऊस तुटला पाहिजे असे सक्त आदेशही काढले, पण आता नोव्हेंबर संपण्यास आठ दिवसांचा कालावधी उरला असताना वस्तूस्थिती तपासली असता १९ कारखान्यांनी केवळ ३८ टक्केच ऊस तोडला असल्याचे निदर्शनास आले आहे.खासदार मागे, मंत्री पुढे- पूर बाधित ऊस तोडण्यामध्ये खासदार संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखालील मंडलिक कारखान्याने केवळ १४ टक्केच ऊस तोडला आहे. 

- याउलट पालकमंत्री सतेज पाटील यांच्या डी.वाय कारखान्याने ५२ टक्के, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सरसेनापती कारखान्याने ६५ टक्के तर, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या शरद कारखान्याने ५९ टक्के ऊस गाळप केला आहे.

उसाचे मग सरपणच..!- नदीकाठचा ऊस गाळाने माखला आहे. त्याला आता किरळे फुटू लागली आहेत. गुंठ्याला १० मोळी देखील चांगला ऊस निघणार नाही 

- आता तर उन्हाचा तडाखा जसा वाढेल तसे या उसाचे सरपणच होणार आहे. काडी लावून पेटवून देण्याशिवाय शेतकऱ्यांसमोर पर्याय राहणार नाही. 

- आता हे क्षेत्र तुटले तर रान रिकामे करुन रब्बी पीक घेता येणे शक्य आहे.

टक्केवारीराजाराम, कुंभी, गुरुदत्त, दत्त शिराेळ, शरद, दालमिया, दौलत, डी.वाय, जवाहर, बिद्री या कारखान्यांकडे एक हजार हेक्टरवरील पूरबाधित उसाची नाेद आहे. पण दालमियाचा ५८ टक्के, डी.वाय ५२, बिद्री ४८ टक्केचा अपवाद वगळता उर्वरित कारखान्यांची टक्केवारी ४० टक्क्यांच्या आतच आहे.

कारखानानिहाय पूर बाधित ऊस (हेक्टरमध्ये )

कारखाना पूर बाधित नोंद तुटलेले क्षेत्र टक्केवारी शिल्लक ऊस
वारणा ५८४ १९५३३३८९
पंचगंगा ७९४१२२१५६७१
कुंभी१६३८४६१२८११७७
बिद्री १००८ ४८५४८५२३
भोगावती ८१९१५९ १९६६०
दत्त २३२१८४४३६ १४७६
शाहू ८१६१७८ २१६३८
जवाहर१२४८३९७ ३१८५१
राजाराम१७७१ ५१०२८१२६१
आजरा ५५४४ ८०११
मंडलिक४६३६५ १४ ३९७
शरद१४४८ ८६३५९ ५८५
डी.वाय १०५९ ५५२ ५२ ५०६
अथणी६१ ४५७२   १६
दालमिया १२११७०७ ५८ ५०३
गुरुदत्त१५२२३९३ २५  ११२८
इको केन ६९५० ७२ १९
ओलम४४७ ४१९९३२७
सेनापती ३६५२४० ६५१२५

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने