शहरं
Join us  
Trending Stories
1
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
2
१०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना २६% दर कपात; ७० टक्के लोकांना फायदा: फडणवीसांची घोषणा
3
धर्मांतरानंतर गायब झाल्या हिंदू मुली, छांगुर बाबाच्या आणखी एका चेल्याची पोलखोल; मेरठशीही थेट कनेक्शन!
4
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
5
Stock Market Today: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात; निफ्टी २५,२०० च्या वर, SBI, Hindalco, Eicher Motors मध्ये खरेदी
6
जीजू अन् मेहुणीचा सुरू होता बेडरूम रोमान्स, इतक्यात पती आला; पुढे जे घडलं त्यानं अख्खं गाव सुन्न झालं!
7
ज्येष्ठांसाठी जॅकपॉट आहे Post Officeची ही स्कीम; फक्त एकदा गुंतवा पैसे, दर महिन्याला ₹२०,५०० चं इन्कम फिक्स
8
Bihar Election: मोफत वीज देणार, ऑगस्टपासून योजना लागू; नितीश कुमारांनी केली घोषणा, किती यूनिट वीज देणार मोफत?
9
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
10
"मी तुझ्यावर प्रेम करतो, लग्न करशील?", जिनिलियाला चाहत्याचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली- "मी विचार केला असता पण..."
11
राज्यातील आजी-माजी मंत्री, बडे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये? कोण कोण अडकले...
12
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
13
फडणवीसांशी बोलले...! पुढे दोन पावलांवर ठाकरे-शिंदे आमने-सामने, बाजूला बसणे सोडा बघणेही टाळले
14
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
15
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
16
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
17
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
18
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
19
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
20
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 

कोरोना मृताच्या ६० वारसांना दोनदा मिळाली मदत, कोल्हापूर जिल्हा प्रशासनासमोर वसुलीची डोकेदुखी 

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: December 29, 2022 18:59 IST

जे रक्कम परत करणार नाहीत त्यांच्यावर काय कारवाई करायची याचे स्पष्ट निर्देश नाहीत.

इंदुमती गणेशकोल्हापूर : खात्यावर ५० हजार रुपये येणे अपेक्षित असताना आले १ लाख रुपये.. मग काय आनंदी आनंद, डबल धमाका.. अशी स्थिती होईल की नाही. कोरोनाने मृत्यू झालेल्या एका व्यक्तीच्या दोन वारसांना किंवा एकालाच दोनवेळा ५० हजारांचे अर्थसाहाय्य मिळाल्याची ६० प्रकरणे जिल्ह्यात उघडकीस आली आहेत. या रकमेची परत वसुली करणे ही जिल्हा प्रशासनासाठी डोकेदुखी बनली आहे. यातील अनेकांनी प्रामाणिकपणे प्रशासनाला रक्कम परत केली आहे, तर काही जणांनी हात वर केले आहे.कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसांना राज्य शासनाच्या वतीने ५० हजारांचे अर्थसाहाय्य केले जाते. त्यासाठी जिल्ह्यातून अंदाजे ७ हजारांवर वारस पात्र ठरले. त्यांच्या अर्जांची छाननी करून खात्यावर रक्कम वर्ग झाली; पण नंतर डेटा चेक करताना कळाले की, ६० मृतांच्या वारसांच्या खात्यावर रक्कम दोनदा गेली आहे.

राज्य शासनातील अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत त्यांनी जिल्हा प्रशासनाला दुसरी रक्कम वसूल करण्याचा आदेश दिला; पण लेखी काही आले नाही. जे रक्कम परत करणार नाहीत त्यांच्यावर काय कारवाई करायची याचे स्पष्ट निर्देश नाहीत. शेवटी प्रशासनाने सामंजस्याने पैसे वसूल करून घेण्याचा पर्याय अवलंबला.

नेमके करायचे काय...?

  • आर्थिक मदतीमुळे अनेक कुटुंबांमध्ये त्रांगडे होऊन बसले आहे. ही प्रकरणे इतकी कौटुंबिक आणि व्यक्तिगत स्वरूपाची आहेत की त्यावर नेमका निर्णय काय द्यायचा हेच कळेनासे झाले आहे.
  • निधन झालेल्या व्यक्तीस दोन पत्नी आहेत, एकीच्या खात्यावर रक्कम गेल्याने दुसरी भांडत आली. साहेब मीच नवऱ्याला अखेरपर्यंत सांभाळले तिला पैसे का दिले..?
  • मुलाच्या खात्यावर रक्कम वर्ग झाली, सावत्र आईने तक्रार केल्यावर मुलाने सांगितले, या आईने आमच्या कुटुंबाला, वडिलांना फार छळले, तिचा काही संबंध नाही. अर्धी रक्कमसुद्धा मी देणार नाही.
  • खात्यावर दोनदा आलेली रक्कम मुलाने खर्च केली आणि वसुलीसाठी फोन केल्यावर पैसे नाहीत मी काय करू, असा गयावया सुरू आहे.
  • वडिलांच्या मृत्यूचे पैसे पहिल्या पत्नीच्या खात्यावर आणि दुसऱ्या पत्नीच्या मुलाच्या खात्यावर अशा दोन ठिकाणी वर्ग झाली आहे. दोघांनाही प्रत्येकी २५ हजार परत करायला सांगितले; पण दोघेही हटायला तयार नाहीत.
  • गांधीनगरमधील एका महिलेला रक्कम दोनदा मिळाली. तिला आणि सवतीला दोघींनाही वसुलीचे फोन गेले. दुसरीला पैसे मिळाले नाहीत, आणि पहिली पैसे परत करेना.

कसबा बावड्यातील पठ्ठ्या भारीच निघाला..एका वारसाने कसबा बावड्यातील संगणक व्यावसायिकाकडून अर्ज भरून घेतला. त्या पठ्ठ्याने बाकी माहिती बरोबर भरली; पण खाते नंबर आणि मोबाईल नंबर स्वत:चा अपलोड केला. रक्कम गेली त्याच्या खात्यावर. अर्ज करून तीन महिने झाले तरी पैसे मिळाले नाहीत म्हणून वारसाने जिल्हा आपत्तीकडे संपर्क साधला. छाननी केल्यानंतर व्यावसायिकाचा गोलमाल लक्षात आला. धाक दाखवल्यावर महिन्याची मुदत मागितली, आता तीन महिने झाले तरी पैसे परत केलेले नाहीत.

६ अर्जांवर एकाचेच खाते..एका पक्षाचा कार्यकर्ता जिल्हा व महापालिका प्रशासनाकडे वारंवार विविध अर्जांचे काय झाले, याचा पाठपुरावा करण्यासाठी यायचा. अर्जांची छाननी सुरू असताना कळले की, याचा खाते क्रमांक आणि मोबाईल क्रमांक ६ जणांच्या अर्जावर आहे, त्याशिवाय त्याने संबंधितांकडून अर्ज भरण्याचे म्हणून प्रत्येकी हजार रुपये वसूल केले.

चांगुलपणा असाही..६० पैकी २० हून अधिक लोकांनी वसुलीसाठी फोन जाण्याआधी स्वत:हून प्रामाणिकपणे जास्त आलेली रक्कम परत केली. २० जणांनी प्रशासनाचा फोन आला की तजवीज करून रक्कम भरली. उरलेल्या काही जणांनी तयारी दाखवली. मुलाची आठवण म्हणून एका कुटुंबाने मुलगा शिकलेल्या शाळेला देणगी दिली, अशा चांगल्या घटनाही यानिमित्ताने पुढे आल्या. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcorona virusकोरोना वायरस बातम्या