शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

तुटलेल्या विद्युत तारांमुळे कोल्हापूर जिल्ह्यात दीड वर्षांत ५८ जणांनी गमावला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 16:39 IST

देखभाल दुरुस्तीवर प्रश्नचिन्ह

कोल्हापूर : गावात, शेत-शिवारात तुटलेल्या विद्युत तारांना स्पर्श होऊन आणि खांबांमध्ये वीज उतरून झालेल्या दुर्घटनांमध्ये गेल्या दीड वर्षांत ५८ जणांनी प्राण गमावला. अलीकडे अशा दुर्घटनांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे तुटलेल्या विद्युत तारा मृत्यूचे सापळे ठरत आहेत. वाढत्या अपघातांमुळे महावितरणच्या देखभाल दुरुस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.वादळी वारा आणि पावसामुळे झाडांच्या फांद्या पडून विजेच्या तारा तुटतात. जमीन खचल्याने विजेचे खांब कलतात. जीर्ण झालेल्या तारा तुटून शेतात पडल्याने दुर्घटना घडतात. जानेवारी २०२३ ते ८ जुलै २०२४ या कालावधीत जिल्ह्यात विजेच्या तारांचा स्पर्श होऊन ५८ जणांनी जीव गमावला. गेल्या आठ दिवसांत तीन घटनांमध्ये चौघांचा मृत्यू झाला. शाहूवाडी तालुक्यातील कोपार्डे येथे दोघे सख्खे भाऊ ठार झाले. नागाव (ता. हातकणंगले) येथे शेतात वैरणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला, तर वडणगे (ता. करवीर) येथे शेतात बांधावरील गवताला खत टाकण्यासाठी गेलेला तरुण विजेच्या धक्क्याने ठार झाला.या तिन्ही घटनांमध्ये शेतात पडलेल्या विद्युत तारा शेतकऱ्यांना दिसल्याच नाहीत. उसाची शेती, वाढलेेले गवत, झाडी यामुळे पडलेल्या तारा लक्षात येत नाहीत. पावसामुळे साचलेले पाणी आणि ओलसर हिरव्या वनस्पतींमुळे हा धोका आणखी वाढतो. अशा दुर्घटना रोखण्यासाठी महावितरणला तातडीने ठोस उपाययोजना कराव्या लागणार आहेत. तसेच नागरिकांनाही खबरदारी घ्यावी लागणार आहे.दुरुस्ती होते की नाही?दरवर्षी पावसाळ्यापूर्वी विद्युत खांब, तारा, डीपी यांची तपासणी केली जाते. जीर्ण खांब आणि तारा बदलल्या जातात. अडथळे ठरणाऱ्यांच्या झाडांची छाटणी केली जाते. विद्युत प्रवाहात बिघाड निर्माण होताच पुरवठा खंडित होण्यासाठी सर्किट ब्रेकर्स, रिलेज, फ्यूज यांचा वापर केला जातो. मात्र, त्यानंतरही दुर्घटनांची संख्या वाढत असल्याने दुरुस्तीच्या कामांबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.

कुटुंबीयांना चार लाखांची मदतमहावितरणच्या चुकीमुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास मृताच्या नातेवाइकांना चार लाख, तर जखमीला दोन लाख रुपयांची मदत दिली जाते. यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून दुर्घटनेचा पंचनामा होणे गरजेचे असते.

खबरदारी घेणे गरजेचेशेतात विजेचे खांब असल्यास शेतकऱ्यांनी तारांचा अंदाज घ्यावा. वाकलेले खांब आणि लोंबकळणाऱ्या तारा दिसताच महावितरणच्या कर्मचाऱ्यांना कळवावे. स्वत:हून तारा हटवण्याचा प्रयत्न करू नये. विजेच्या खांबांना जनावरे बांधू नयेत. विद्युत पंप हाताळताना किंवा चालू करताना रबरी हातमोजे, गमबूट वापरावेत असे आवाहन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरelectricityवीजmahavitaranमहावितरण