शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
2
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
3
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
4
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
5
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
6
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
7
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
8
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
9
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
10
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
11
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
12
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
13
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
14
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
15
"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
16
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
17
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
18
Astrology: नवीन वर्षात नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी २०२६ मधील तारखा आणि शुभ मुहूर्त 
19
Numerology: 'या' जन्मतारखेच्या मुलींमध्ये असतो कमालीचा आत्मविश्वास आणि सौंदर्याचा अहंकारही 
20
सोने-चांदी पुन्हा महागले! खरेदी करण्यापूर्वी २२ कॅरेट आणि २४ कॅरेटचे दर पाहा; आणखी भाव वाढणार?
Daily Top 2Weekly Top 5

तुटलेल्या विद्युत तारांमुळे कोल्हापूर जिल्ह्यात दीड वर्षांत ५८ जणांनी गमावला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 16:39 IST

देखभाल दुरुस्तीवर प्रश्नचिन्ह

कोल्हापूर : गावात, शेत-शिवारात तुटलेल्या विद्युत तारांना स्पर्श होऊन आणि खांबांमध्ये वीज उतरून झालेल्या दुर्घटनांमध्ये गेल्या दीड वर्षांत ५८ जणांनी प्राण गमावला. अलीकडे अशा दुर्घटनांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे तुटलेल्या विद्युत तारा मृत्यूचे सापळे ठरत आहेत. वाढत्या अपघातांमुळे महावितरणच्या देखभाल दुरुस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.वादळी वारा आणि पावसामुळे झाडांच्या फांद्या पडून विजेच्या तारा तुटतात. जमीन खचल्याने विजेचे खांब कलतात. जीर्ण झालेल्या तारा तुटून शेतात पडल्याने दुर्घटना घडतात. जानेवारी २०२३ ते ८ जुलै २०२४ या कालावधीत जिल्ह्यात विजेच्या तारांचा स्पर्श होऊन ५८ जणांनी जीव गमावला. गेल्या आठ दिवसांत तीन घटनांमध्ये चौघांचा मृत्यू झाला. शाहूवाडी तालुक्यातील कोपार्डे येथे दोघे सख्खे भाऊ ठार झाले. नागाव (ता. हातकणंगले) येथे शेतात वैरणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला, तर वडणगे (ता. करवीर) येथे शेतात बांधावरील गवताला खत टाकण्यासाठी गेलेला तरुण विजेच्या धक्क्याने ठार झाला.या तिन्ही घटनांमध्ये शेतात पडलेल्या विद्युत तारा शेतकऱ्यांना दिसल्याच नाहीत. उसाची शेती, वाढलेेले गवत, झाडी यामुळे पडलेल्या तारा लक्षात येत नाहीत. पावसामुळे साचलेले पाणी आणि ओलसर हिरव्या वनस्पतींमुळे हा धोका आणखी वाढतो. अशा दुर्घटना रोखण्यासाठी महावितरणला तातडीने ठोस उपाययोजना कराव्या लागणार आहेत. तसेच नागरिकांनाही खबरदारी घ्यावी लागणार आहे.दुरुस्ती होते की नाही?दरवर्षी पावसाळ्यापूर्वी विद्युत खांब, तारा, डीपी यांची तपासणी केली जाते. जीर्ण खांब आणि तारा बदलल्या जातात. अडथळे ठरणाऱ्यांच्या झाडांची छाटणी केली जाते. विद्युत प्रवाहात बिघाड निर्माण होताच पुरवठा खंडित होण्यासाठी सर्किट ब्रेकर्स, रिलेज, फ्यूज यांचा वापर केला जातो. मात्र, त्यानंतरही दुर्घटनांची संख्या वाढत असल्याने दुरुस्तीच्या कामांबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.

कुटुंबीयांना चार लाखांची मदतमहावितरणच्या चुकीमुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास मृताच्या नातेवाइकांना चार लाख, तर जखमीला दोन लाख रुपयांची मदत दिली जाते. यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून दुर्घटनेचा पंचनामा होणे गरजेचे असते.

खबरदारी घेणे गरजेचेशेतात विजेचे खांब असल्यास शेतकऱ्यांनी तारांचा अंदाज घ्यावा. वाकलेले खांब आणि लोंबकळणाऱ्या तारा दिसताच महावितरणच्या कर्मचाऱ्यांना कळवावे. स्वत:हून तारा हटवण्याचा प्रयत्न करू नये. विजेच्या खांबांना जनावरे बांधू नयेत. विद्युत पंप हाताळताना किंवा चालू करताना रबरी हातमोजे, गमबूट वापरावेत असे आवाहन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरelectricityवीजmahavitaranमहावितरण