शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

कोल्हापूर जिल्ह्यातील ५७ बंधारे अद्याप पाण्याखालीच, पावसाची उघडझाप : पूरस्थिती कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 18:27 IST

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. सोमवारीही उघडझाप राहून काही काळ शहरासह जिल्ह्यात खडखडीत ऊनही पडले. जिल्ह्यातील नद्या अजून तुडूंब भरल्या असल्याने अद्याप ५७ बंधारे पाण्याखाली आहेत.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यातील ५७ बंधारे अद्याप पाण्याखालीच, पावसाची उघडझाप : पूरस्थिती कायम  पंचगंगेची पाणी पातळी ३७.०८ फुटांवर : शिवाजी पुलावरील अवजड वाहतूक बंदच

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. सोमवारीही उघडझाप राहून काही काळ शहरासह जिल्ह्यात खडखडीत ऊनही पडले. जिल्ह्यातील नद्या अजून तुडूंब भरल्या असल्याने अद्याप ५७ बंधारे पाण्याखाली आहेत.

राधानगरी धरणातील दोन दरवाजांतून ४४५६ क्युसेक विसर्ग सुरू असल्याने पंचगंगा नदीची पातळी राजाराम बंधारा येथे दुपारपर्यंत ३७.०८ इतकी राहिली. शिवाजी पुलावरून कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील अवजड वाहनांसाठी वाहतूक बंदच आहे.गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर तीन दिवसांपासून कमी झाला आहे. सोमवारी पावसाची उघड-झाप होऊन अधून- मधून हलक्या सरी कोसळत होत्या. शहरासह जिल्ह्यातही काही काळ सूर्यदर्शन झाले. धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने जिल्ह्यातील नद्या तुडूंब भरल्याने अद्यापही ५७ बंधारे पाण्याखाली आहेत.

राज्यमार्ग ४, प्रमुख जिल्हा ७, ग्रामीण १६ व इतर जिल्हा १९ असे ४६ मार्ग बंद असून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी इंचा-इंचाने कमी होत असली तरी अद्यापही ती राजाराम बंधारा येथे दुपारी ३७.०८ फुटांवर राहिली. पंचगंगा इशारा पातळीच्या खाली गेल्याने दोन दिवसांपासून शिवाजी पूल येथून बंद करण्यात कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग दुचाकी व तीनचाकी वाहनांसाठी खुला करण्यात आला; परंतु अद्याप चारचाकी व अवजड वाहनांसाठी तो सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आला आहे.

धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी असला तरी राधानगरी धरणाचे दोन दरवाजे खुले असून त्यामधून ४४५६ क्युसेक विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सोमवारी सकाळी आठपर्यंत १४.६८ मि.मी. पावसाची नोंद झाली. त्यामध्ये सर्वाधिक गगनबावड्यामध्ये ४५.५० मि.मी., त्याखालोखाल शाहूवाडीमध्ये ३१.०० मि.मी. पाऊस पडला आहे.

तालुकानिहाय पाऊस मिलीमीटरमध्ये असा -हातकणंगले (२.१२), शिरोळ (०.५७), पन्हाळा (१२.२९), शाहूवाडी (२६.३३), राधानगरी (२४.५०), गगनबावडा (३०.००), करवीर (७.६३), कागल (७.१४), गडहिंग्लज (६.००), भुदरगड (२३.८०), आजरा (१६.००), चंदगड (१९.८३).

दूधगंगा, कोयनेतून विसर्ग वाढविलादूधगंगा धरण ८८ टक्के भरले असून येथून ८००० क्युसेक विसर्ग सुरू आहे. वारणा धरण ८४ टक्के भरले असून येथून ६,०६१ क्युसेक, कोयना ७९ टक्के भरले असून ३२ हजार ८०९ क्युसेक, अलमट्टी ८७.८९ भरले असून १ लाख ६५ हजार ६५८ क्युसेक विसर्ग सुरू आहे. दूधगंगा व कोयना धरणांतून जलविसर्ग वाढविण्यात आला आहे. 

 

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018kolhapurकोल्हापूर