शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

कोल्हापूर जिल्ह्यातील ५७ बंधारे अद्याप पाण्याखालीच, पावसाची उघडझाप : पूरस्थिती कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 18:27 IST

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. सोमवारीही उघडझाप राहून काही काळ शहरासह जिल्ह्यात खडखडीत ऊनही पडले. जिल्ह्यातील नद्या अजून तुडूंब भरल्या असल्याने अद्याप ५७ बंधारे पाण्याखाली आहेत.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यातील ५७ बंधारे अद्याप पाण्याखालीच, पावसाची उघडझाप : पूरस्थिती कायम  पंचगंगेची पाणी पातळी ३७.०८ फुटांवर : शिवाजी पुलावरील अवजड वाहतूक बंदच

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. सोमवारीही उघडझाप राहून काही काळ शहरासह जिल्ह्यात खडखडीत ऊनही पडले. जिल्ह्यातील नद्या अजून तुडूंब भरल्या असल्याने अद्याप ५७ बंधारे पाण्याखाली आहेत.

राधानगरी धरणातील दोन दरवाजांतून ४४५६ क्युसेक विसर्ग सुरू असल्याने पंचगंगा नदीची पातळी राजाराम बंधारा येथे दुपारपर्यंत ३७.०८ इतकी राहिली. शिवाजी पुलावरून कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील अवजड वाहनांसाठी वाहतूक बंदच आहे.गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर तीन दिवसांपासून कमी झाला आहे. सोमवारी पावसाची उघड-झाप होऊन अधून- मधून हलक्या सरी कोसळत होत्या. शहरासह जिल्ह्यातही काही काळ सूर्यदर्शन झाले. धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने जिल्ह्यातील नद्या तुडूंब भरल्याने अद्यापही ५७ बंधारे पाण्याखाली आहेत.

राज्यमार्ग ४, प्रमुख जिल्हा ७, ग्रामीण १६ व इतर जिल्हा १९ असे ४६ मार्ग बंद असून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी इंचा-इंचाने कमी होत असली तरी अद्यापही ती राजाराम बंधारा येथे दुपारी ३७.०८ फुटांवर राहिली. पंचगंगा इशारा पातळीच्या खाली गेल्याने दोन दिवसांपासून शिवाजी पूल येथून बंद करण्यात कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग दुचाकी व तीनचाकी वाहनांसाठी खुला करण्यात आला; परंतु अद्याप चारचाकी व अवजड वाहनांसाठी तो सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आला आहे.

धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी असला तरी राधानगरी धरणाचे दोन दरवाजे खुले असून त्यामधून ४४५६ क्युसेक विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सोमवारी सकाळी आठपर्यंत १४.६८ मि.मी. पावसाची नोंद झाली. त्यामध्ये सर्वाधिक गगनबावड्यामध्ये ४५.५० मि.मी., त्याखालोखाल शाहूवाडीमध्ये ३१.०० मि.मी. पाऊस पडला आहे.

तालुकानिहाय पाऊस मिलीमीटरमध्ये असा -हातकणंगले (२.१२), शिरोळ (०.५७), पन्हाळा (१२.२९), शाहूवाडी (२६.३३), राधानगरी (२४.५०), गगनबावडा (३०.००), करवीर (७.६३), कागल (७.१४), गडहिंग्लज (६.००), भुदरगड (२३.८०), आजरा (१६.००), चंदगड (१९.८३).

दूधगंगा, कोयनेतून विसर्ग वाढविलादूधगंगा धरण ८८ टक्के भरले असून येथून ८००० क्युसेक विसर्ग सुरू आहे. वारणा धरण ८४ टक्के भरले असून येथून ६,०६१ क्युसेक, कोयना ७९ टक्के भरले असून ३२ हजार ८०९ क्युसेक, अलमट्टी ८७.८९ भरले असून १ लाख ६५ हजार ६५८ क्युसेक विसर्ग सुरू आहे. दूधगंगा व कोयना धरणांतून जलविसर्ग वाढविण्यात आला आहे. 

 

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018kolhapurकोल्हापूर