शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : देश चालविण्यासाठी ५६ इंचाची छाती लागते  : देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 20:52 IST

देश चालविण्यासाठी ५६ पक्ष लागत नाहीत. त्यांच्यावर भरवश्यावर देश चालत नाहीत. ५६ इंचाची छाती लागते. शेतकरी, सर्वसामान्यांच्या पाठीशी राहणारे आमचे पक्ष आहे. भाजप, सेना आणि मित्रपक्षांच्या माध्यमातून जनतेच्या पाठबळावर बलशाली सरकार सत्तेमध्ये येणार आहे. आता केवळ लीड मोजणे बाकी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे केले.

ठळक मुद्देदेश चालविण्यासाठी ५६ इंचाची छाती लागते  : देवेंद्र फडणवीस आता केवळ लीड मोजणे बाकी

कोल्हापूर : देश चालविण्यासाठी ५६ पक्ष लागत नाहीत. त्यांच्यावर भरवश्यावर देश चालत नाहीत. ५६ इंचाची छाती लागते. शेतकरी, सर्वसामान्यांच्या पाठीशी राहणारे आमचे पक्ष आहे. भाजप, सेना आणि मित्रपक्षांच्या माध्यमातून जनतेच्या पाठबळावर बलशाली सरकार सत्तेमध्ये येणार आहे. आता केवळ लीड मोजणे बाकी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे केले.येथील तपोवन मैदानावर भाजप-शिवसेना युतीच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार प्रारंभ सभेमध्ये ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबईत अरबी महासागर आणि कोल्हापुरात जनतेचा महासागर. आम्ही एकत्रपणे पुढे जात आहोत. भाजप-सेनेची युती सत्तेसाठी नाही. विचारांची युती आहे. आमचा हिंदुत्ववाद संकुचित नाही. जाती, भाषेच्या पलीकडील हिंदुत्ववाद आहे. केवळ नावामध्ये राष्ट्रवादी असून चालत नाही. मनात राष्ट्रवाद असावा लागतो.

 

राष्ट्रभक्ती घेऊन आम्ही मैदानात आलो आहोत. विरोधकांना उमेदवार मिळत नाहीत. त्यांच्या कॅप्टनने माढ्यातून माघार घेतली आहे. त्यांची तिकीटे उमेदवार परत करीत आहेत. प्रचंड मतांनी युतीचे सरकार पुन्हा सत्तेत येईल. गरीब ही काँग्रेसवाल्यांच्या नेत्याच्या चेल्या-चापट्यांची. तुमच्या १५ वर्षांचे आकडे घेऊन या, आम्ही साडेचार वर्षात केलेल्या कामाचे आकडे त्यांच्यापेक्षा जास्त आहेत. देशातील शेतकरी, गरीबांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योजना राबवून बळ दिले.

कोल्हापूरच्या भूमीने परिवर्तन घडविलेकोल्हापूर हे शक्तीपीठ आहे. आई अंबेचे शक्तीपीठ, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन कोल्हापूर आहे. विकास, परिवर्तनाच्या कृतीचा प्रारंभ या नगरीतून व्हावा, याउद्देशाने युतीने प्रचाराचा प्रारंभ येथून केला. कोल्हापूरच्या भूमीने देशात परिवर्तन घडविले, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

सुपारी घेऊन बोलण्यापेक्षा घरी बसाआमचे कपडे उतरविणारा अजून जन्माला आला नाही. बारामतीच्या पोपटाच्या अंगावर एकही कपडा शिल्लक नाही. सुपारी घेऊन बोलण्यापेक्षा दुपारी घरी बसा. मोदी हे सूर्यासारखे आहेत. हे लक्षात घ्यावे, अशी टीका राज ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.

तुमची भ्रष्टाचार मॅनेजमेंट कंपनीजर, आमची इव्हेंट कंपनी म्हणत असला, तर तुमची भ्रष्टाचार मॅनेजमेंट कंपनी असल्याची टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधक काँग्रेस-राष्ट्रवादीवर केली. पश्चिम महाराष्ट्रातील सामना १० विरुद्ध शून्य असा फरकाने युती जिंकणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकkolhapurकोल्हापूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस