शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
4
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
5
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
6
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
7
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
8
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
9
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
10
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
12
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
13
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
14
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
15
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
16
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
17
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
18
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
19
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
20
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?

Lok Sabha Election 2019 : देश चालविण्यासाठी ५६ इंचाची छाती लागते  : देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 20:52 IST

देश चालविण्यासाठी ५६ पक्ष लागत नाहीत. त्यांच्यावर भरवश्यावर देश चालत नाहीत. ५६ इंचाची छाती लागते. शेतकरी, सर्वसामान्यांच्या पाठीशी राहणारे आमचे पक्ष आहे. भाजप, सेना आणि मित्रपक्षांच्या माध्यमातून जनतेच्या पाठबळावर बलशाली सरकार सत्तेमध्ये येणार आहे. आता केवळ लीड मोजणे बाकी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे केले.

ठळक मुद्देदेश चालविण्यासाठी ५६ इंचाची छाती लागते  : देवेंद्र फडणवीस आता केवळ लीड मोजणे बाकी

कोल्हापूर : देश चालविण्यासाठी ५६ पक्ष लागत नाहीत. त्यांच्यावर भरवश्यावर देश चालत नाहीत. ५६ इंचाची छाती लागते. शेतकरी, सर्वसामान्यांच्या पाठीशी राहणारे आमचे पक्ष आहे. भाजप, सेना आणि मित्रपक्षांच्या माध्यमातून जनतेच्या पाठबळावर बलशाली सरकार सत्तेमध्ये येणार आहे. आता केवळ लीड मोजणे बाकी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे केले.येथील तपोवन मैदानावर भाजप-शिवसेना युतीच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार प्रारंभ सभेमध्ये ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबईत अरबी महासागर आणि कोल्हापुरात जनतेचा महासागर. आम्ही एकत्रपणे पुढे जात आहोत. भाजप-सेनेची युती सत्तेसाठी नाही. विचारांची युती आहे. आमचा हिंदुत्ववाद संकुचित नाही. जाती, भाषेच्या पलीकडील हिंदुत्ववाद आहे. केवळ नावामध्ये राष्ट्रवादी असून चालत नाही. मनात राष्ट्रवाद असावा लागतो.

 

राष्ट्रभक्ती घेऊन आम्ही मैदानात आलो आहोत. विरोधकांना उमेदवार मिळत नाहीत. त्यांच्या कॅप्टनने माढ्यातून माघार घेतली आहे. त्यांची तिकीटे उमेदवार परत करीत आहेत. प्रचंड मतांनी युतीचे सरकार पुन्हा सत्तेत येईल. गरीब ही काँग्रेसवाल्यांच्या नेत्याच्या चेल्या-चापट्यांची. तुमच्या १५ वर्षांचे आकडे घेऊन या, आम्ही साडेचार वर्षात केलेल्या कामाचे आकडे त्यांच्यापेक्षा जास्त आहेत. देशातील शेतकरी, गरीबांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योजना राबवून बळ दिले.

कोल्हापूरच्या भूमीने परिवर्तन घडविलेकोल्हापूर हे शक्तीपीठ आहे. आई अंबेचे शक्तीपीठ, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन कोल्हापूर आहे. विकास, परिवर्तनाच्या कृतीचा प्रारंभ या नगरीतून व्हावा, याउद्देशाने युतीने प्रचाराचा प्रारंभ येथून केला. कोल्हापूरच्या भूमीने देशात परिवर्तन घडविले, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

सुपारी घेऊन बोलण्यापेक्षा घरी बसाआमचे कपडे उतरविणारा अजून जन्माला आला नाही. बारामतीच्या पोपटाच्या अंगावर एकही कपडा शिल्लक नाही. सुपारी घेऊन बोलण्यापेक्षा दुपारी घरी बसा. मोदी हे सूर्यासारखे आहेत. हे लक्षात घ्यावे, अशी टीका राज ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.

तुमची भ्रष्टाचार मॅनेजमेंट कंपनीजर, आमची इव्हेंट कंपनी म्हणत असला, तर तुमची भ्रष्टाचार मॅनेजमेंट कंपनी असल्याची टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधक काँग्रेस-राष्ट्रवादीवर केली. पश्चिम महाराष्ट्रातील सामना १० विरुद्ध शून्य असा फरकाने युती जिंकणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकkolhapurकोल्हापूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस