शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांचे 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
2
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
3
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
4
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
5
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
6
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."
7
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
8
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
9
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
10
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
11
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
12
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
13
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
15
फ्लॅट वेळेत न दिल्यास बिल्डरला १८% व्याजासह भरपाई द्यावीच लागेल; सुप्रीम कोर्टाचा आदेश
16
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
17
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
18
देशातील प्रत्येक तिसरा लहानगा हार्ट अटॅकच्या मार्गावर?; मुलांच्या रक्तातील चरबीचे प्रमाण वाढले
19
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
20
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक

शेतीसाठी ५० मेगावॅटचे सौरऊर्जा प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:07 IST

प्रवीण देसाई ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शेतकºयांना शेतीसाठी स्वस्त दरात आणि दिवसाही पुरेशी वीज मिळावी यासाठी राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’ योजनेंतर्गत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ५० मेगावॅटचे ‘सौर ऊर्जा प्रकल्प’ उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी ‘महानिर्मिती ’कडून १० शासकीय जागांची पाहणी करून त्याचा प्रस्ताव ...

प्रवीण देसाई ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शेतकºयांना शेतीसाठी स्वस्त दरात आणि दिवसाही पुरेशी वीज मिळावी यासाठी राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’ योजनेंतर्गत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ५० मेगावॅटचे ‘सौर ऊर्जा प्रकल्प’ उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी ‘महानिर्मिती’कडून १० शासकीय जागांची पाहणी करून त्याचा प्रस्ताव सरकारकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आला आहे. सहा महिन्यांत या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.राज्यातील शेतकरी विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी सौरऊर्जानिर्मित वीज फिडरला जोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्टÑ सरकारने घेतला आहे. शेतकºयांना विजेची गरज लक्षात घेऊन सुरुवातीला शेतकºयांना सौर पंप देण्याची योजना होती; परंतु हे पंप वितरित करण्याला मर्यादा असल्याने कृषीपंपांना वीजपुरवठा करणाºया ‘महावितरण’च्या सबस्टेशनच्या फिडरनाच सौरऊर्जेच्या माध्यमातून जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या माध्यमातून ही वीज दिवसा सौरऊर्जेद्वारे व रात्री आवश्यकतेनुसार ‘महावितरण’द्वारे मिळू शकणार आहे. यासाठी सबस्टेशनच्या परिसरातच किंवा आसपासच्या परिसरातच सौरऊर्जा प्रकल्प उभारले जाणार आहेत. राज्यात पहिल्या टप्प्यात नागपूर, औरंगाबाद, पुणे व कोल्हापूर या विभागात ३०० मेगावॅटचे सौरऊर्जा प्रकल्प उभारले जाणार आहेत. यामध्ये कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात ५० मेगावॅटचे प्रकल्प उभारले जाणार आहेत.२ मेगावॅटच्या एका प्रकल्पासाठी किमान १० एकर जागा लागणार आहे. ज्याप्रमाणे जागा उपलब्ध असेल त्याप्रमाणे, २, ५, १० मेगावॅटचे मिळून ५० मेगावॅटपर्यंतचे प्रकल्प होणार आहेत. यासाठी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील १० सरकारी जागांची पाहणी महावितरण, महाऊर्जा व महानिर्मितीच्या माध्यमातून करण्यात आली आहे. या जागांबाबतचा सर्व माहिती असणारा अहवाल मुंबईतील महानिर्मिती व महाऊर्जाच्या कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. या कार्यालयाकडून पहिल्या टप्प्यात ५० मेगावॅटच्या प्रकल्पांची एकत्रित टेंडर प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. या महिन्याभरात टेंडर प्रक्रियेचे काम चालू होईल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खºया अर्थाने प्रत्यक्ष कामाला सहा महिन्यांनंतर सुरुवात होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.शेतकºयांना मिळेल १२ तास वीज‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’ योजनेंतर्गत उभारण्यात येणाºया सौरऊर्जा प्रकल्पांमुळे शेतकºयांना १२ तास वीज मिळू शकणार आहे. सध्या वीजनिर्मितीचा एक युनिटचा दर साधारणपणे साडेसहा रुपये आहे.सौर ऊर्जानिर्मितीचा प्रति युनिट खर्च हा साधारणपणे ३ ते ३.२५ रुपये आहे. त्यामुळे निश्चितच शेतकºयांना स्वस्तात वीज मिळणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी