शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

‘पंचतारांकित’मधील १०० एकरांचा प्लॉट एमआयडीसीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 18:10 IST

या प्लॉटवर नवा आराखडा तयार केला जाणार आहे. १० ते २० गुंठ्यांपर्यंत लहान, मध्यम व मोठे असे प्लॉट पाडले जाणार आहेत. त्यानंतर उद्योजकांना हे प्लॉट वाटले जाणार आहेत. लवकरच या प्रक्रियेला सुरुवात होईल.

ठळक मुद्देव्यवस्थापनाने उच्च न्यायालयात धाव घेऊन स्थगिती मिळविली.

प्रवीण देसाई ।कोल्हापूर : टेक्स्टाईल उद्योगासाठी बॉम्बे रेयॉन कंपनीला कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये दिलेला १०० एकरचा प्लॉट शुक्रवारी (दि. १३) ताब्यात घेण्यात आला आहे. सध्याच्या बाजारभावानुसार त्याची किंमत १८६ कोटी रुपये आहे. गेल्या १० वर्षांपासून कंपनीने याचा वापर केलेला नाही. ही बाजू महाराष्ट औद्योगिक महामंडळ (एमआयडीसी)ने उच्च न्यायालयात पुराव्यानिशी मांडल्याने त्यांच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यामुळे या प्लॉटचे उद्योजकांना पुन्हा वाटप होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.जिल्ह्यातील प्रमुख शिरोली, गोकुळ शिरगाव, कागल-हातकणंगले पंचतारांकित आद्योगिक वसाहत (एमआयडीसी)मध्ये उद्योगांसाठी जमिनी शिल्लक नाहीत.

स्थानिक लोकांना उद्योगासाठी जागेची मागणी पाहता ती या ठिकाणी उपलब्ध होणे शक्य नाही. परंतु १०० एकरचा प्लॉट ताब्यात घेतल्याने उद्योजकांसाठी पुन्हा आशा पल्लवित झाल्या आहेत. ‘एमआयडीसी’च्या कोल्हापूर कार्यालयाकडून बॉम्बे रेयॉन कंपनीला २०११मध्ये कागल-हातकणंगले पंचतारांकित एमआयडीसीमध्ये १०० एकरचा प्लॉट दिला होता. टेक्स्टाईल उद्योगासाठी घेतलेल्या या प्लॉटवर गेल्या १० वर्षांत काहीच केलेले नाही. तसेच ते कोणाला काही करूनही देत नव्हते. त्यामुळे ‘एमआयडीसी’ कार्यालयाने हा प्लॉट ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला; परंतु त्यावर बॉम्बे रेयॉनचे व्यवस्थापन जिल्हा न्यायालयात गेले. त्या ठिकाणी ‘एमआयडीसी’च्या बाजूने निकाल लागला. त्यानंतर व्यवस्थापनाने उच्च न्यायालयात धाव घेऊन स्थगिती मिळविली.

येथेही ‘एमआयडीसी’ने आवश्यक ते पुरावे सादर करून बाजू भक्कमपणे मांडली. यावर न्यायालयाने स्थगिती उठवून ‘एमआयडीसी’च्या बाजूने निकाल दिला. त्यानुसार शुक्रवारी (दि. १३) हा प्लॉट ताब्यात घेण्यात आला आहे.

या प्लॉटवर नवा आराखडा तयार केला जाणार आहे. १० ते २० गुंठ्यांपर्यंत लहान, मध्यम व मोठे असे प्लॉट पाडले जाणार आहेत. त्यानंतर उद्योजकांना हे प्लॉट वाटले जाणार आहेत. लवकरच या प्रक्रियेला सुरुवात होईल. अशाच पद्धतीने औद्योगिक वसाहतींमधील विनावापर असलेले प्लॉट ताब्यात घ्यावेत, असा सूर उमटत आहे.

 

उद्योगासाठी १०० एकरचा प्लॉट देऊनही गेली दहा वर्षे त्याचा वापर केला नाही. त्यामुळे न्यायालयीन पातळीवर लढाई लढून हा प्लॉट ‘एमआयडीसी’ने ता

ब्यात घेतला आहे. त्याचा आराखडा बनवून उद्योजकांना प्लॉटचे वाटप केले जाईल.- अविनाश सुभेदार, सहमुख्य कार्यकारी अधिकारी, ‘एमआयडीसी’

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMIDCएमआयडीसी