शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

‘पंचतारांकित’मधील १०० एकरांचा प्लॉट एमआयडीसीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 18:10 IST

या प्लॉटवर नवा आराखडा तयार केला जाणार आहे. १० ते २० गुंठ्यांपर्यंत लहान, मध्यम व मोठे असे प्लॉट पाडले जाणार आहेत. त्यानंतर उद्योजकांना हे प्लॉट वाटले जाणार आहेत. लवकरच या प्रक्रियेला सुरुवात होईल.

ठळक मुद्देव्यवस्थापनाने उच्च न्यायालयात धाव घेऊन स्थगिती मिळविली.

प्रवीण देसाई ।कोल्हापूर : टेक्स्टाईल उद्योगासाठी बॉम्बे रेयॉन कंपनीला कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये दिलेला १०० एकरचा प्लॉट शुक्रवारी (दि. १३) ताब्यात घेण्यात आला आहे. सध्याच्या बाजारभावानुसार त्याची किंमत १८६ कोटी रुपये आहे. गेल्या १० वर्षांपासून कंपनीने याचा वापर केलेला नाही. ही बाजू महाराष्ट औद्योगिक महामंडळ (एमआयडीसी)ने उच्च न्यायालयात पुराव्यानिशी मांडल्याने त्यांच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यामुळे या प्लॉटचे उद्योजकांना पुन्हा वाटप होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.जिल्ह्यातील प्रमुख शिरोली, गोकुळ शिरगाव, कागल-हातकणंगले पंचतारांकित आद्योगिक वसाहत (एमआयडीसी)मध्ये उद्योगांसाठी जमिनी शिल्लक नाहीत.

स्थानिक लोकांना उद्योगासाठी जागेची मागणी पाहता ती या ठिकाणी उपलब्ध होणे शक्य नाही. परंतु १०० एकरचा प्लॉट ताब्यात घेतल्याने उद्योजकांसाठी पुन्हा आशा पल्लवित झाल्या आहेत. ‘एमआयडीसी’च्या कोल्हापूर कार्यालयाकडून बॉम्बे रेयॉन कंपनीला २०११मध्ये कागल-हातकणंगले पंचतारांकित एमआयडीसीमध्ये १०० एकरचा प्लॉट दिला होता. टेक्स्टाईल उद्योगासाठी घेतलेल्या या प्लॉटवर गेल्या १० वर्षांत काहीच केलेले नाही. तसेच ते कोणाला काही करूनही देत नव्हते. त्यामुळे ‘एमआयडीसी’ कार्यालयाने हा प्लॉट ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला; परंतु त्यावर बॉम्बे रेयॉनचे व्यवस्थापन जिल्हा न्यायालयात गेले. त्या ठिकाणी ‘एमआयडीसी’च्या बाजूने निकाल लागला. त्यानंतर व्यवस्थापनाने उच्च न्यायालयात धाव घेऊन स्थगिती मिळविली.

येथेही ‘एमआयडीसी’ने आवश्यक ते पुरावे सादर करून बाजू भक्कमपणे मांडली. यावर न्यायालयाने स्थगिती उठवून ‘एमआयडीसी’च्या बाजूने निकाल दिला. त्यानुसार शुक्रवारी (दि. १३) हा प्लॉट ताब्यात घेण्यात आला आहे.

या प्लॉटवर नवा आराखडा तयार केला जाणार आहे. १० ते २० गुंठ्यांपर्यंत लहान, मध्यम व मोठे असे प्लॉट पाडले जाणार आहेत. त्यानंतर उद्योजकांना हे प्लॉट वाटले जाणार आहेत. लवकरच या प्रक्रियेला सुरुवात होईल. अशाच पद्धतीने औद्योगिक वसाहतींमधील विनावापर असलेले प्लॉट ताब्यात घ्यावेत, असा सूर उमटत आहे.

 

उद्योगासाठी १०० एकरचा प्लॉट देऊनही गेली दहा वर्षे त्याचा वापर केला नाही. त्यामुळे न्यायालयीन पातळीवर लढाई लढून हा प्लॉट ‘एमआयडीसी’ने ता

ब्यात घेतला आहे. त्याचा आराखडा बनवून उद्योजकांना प्लॉटचे वाटप केले जाईल.- अविनाश सुभेदार, सहमुख्य कार्यकारी अधिकारी, ‘एमआयडीसी’

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMIDCएमआयडीसी