शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ४ हजार ५७८ बालके कुपोषणाच्या उंबरठ्यावर

By admin | Updated: November 6, 2016 00:28 IST

आरोग्याचा प्रश्न गंभीर : केंद्र शासनाच्या निधीअभावी ग्राम बालविकास केंद्रे वर्षभरापासून बंद; बेभरवशाच्या उपाययोजना

अशोक डोंबाळे -- सांगली --आरोग्य विभागाच्या तपासणीत जिल्ह्यातील पाच वर्षांपर्यंतची ४२११ बालके कमी वजनाची म्हणजेच कुपोषणाच्या उंबरठ्यावर, तर ३६७ तीव्र कमी वजनाची म्हणजे कुपोषित असल्याचे दिसून आले आहे. या बालकांना सुदृढ करण्यासाठी शासनाने प्रत्येक जिल्ह्यात स्थापन केलेली ग्राम बालविकास केंद्रे अनुदानाअभावी बंद असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. आरोग्य विभागाच्या सहकार्यामुळे एकात्मिक बालविकास सेवा योजना विभागामार्फत सप्टेंबरमध्ये जिल्ह्यातील पाच वर्षांपर्यंतच्या एक लाख ४८ हजार ६६६ बालकांची वजने तपासली होती. यामध्ये ४२११ बालकांचे वजन कमी आढळून आले आहे. आटपाडी तालुक्यात सर्वाधिक ६२३, शिराळा ५४३, पलूस ४६८ आणि जत तालुक्यामध्ये ४२५ बालकांची संख्या आढळून आली आहे. तीव्र कमी वजनाची ३६७ बालके आढळून आली असून आटपाडीत सर्वाधिक ६८, तर शिराळा तालुक्यात ५३, पलूस ३३, जत तालुक्यात ३८ बालकांचा समावेश आहे. या कुपोषित बालकांना आरोग्य सुविधा आणि पूरक पोषण आहार तातडीने सुरु करण्याची गरज आहे. कुपोषित बालकांचे बहुतांशी पालक गरीब कुटुंबातील आहेत. पुरेसा आहार आणि आरोग्य सुविधा मिळाली नसल्यामुळेच ती कुपोषित राहिली आहेत. केंद्र आणि राज्य शासनाच्या अर्थसाहाय्यातून जिल्ह्यात ग्राम बालविकास केंद्रे उभारून कुपोषित बालकांना तेथे ठेवले जात होते. औषधोपचार आणि पोषण आहार देण्यासाठी शासनाकडून प्रत्येकासाठी २५०० रुपये दिले जात होते. आरोग्य आणि पोषण आहाराबद्दल सेविका आणि वैद्यकीय अधिकारी जागृतीही करीत होते. यातूनच जिल्ह्यातील कुपोषित बालकांची संख्या कमी झाली होती. परंतु, शासनाने वर्षभरापासून निधीच बंद केल्यामुळे बालकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सध्या जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाकडून लोकसहभागातून शक्य तेथे पोषण आहार देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यालाही मर्यादा येत आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी ह्यराजमाता जिजाऊ माता बालआरोग्य व पोषण मिशनह्णची २00५ मध्ये स्थापना केली होती. मात्र राज्य सरकारने यासाठी निधीच दिलेला नाही. लोकसहभागातून आहार !सध्या केंद्र शासनाकडून निधी मिळत नसल्यामुळे केंद्रे बंद आहेत. तरीही तीव्र कमी वजनाच्या बालकांसाठी लोकसहभागातून पोषण आहार दिला जात आहे. पालकांनाही आहार व आरोग्य सुविधा देण्याबाबत सूचना दिल्या जात आहेत, असे जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण जाधव यांनी सांगितले.निधी कुचकामीवर्षात सांगलीसाठी दोन लाखांचा निधी मिळाला असून, तोही अंगणवाडी सेविकांच्या कार्यशाळेवरच खर्च झाला आहे. याबाबत शासनाकडे चौकशी केली असता, राजमाता जिजाऊ माता-बालआरोग्य व पोषण मिशनला दहा महिन्यांत मुदतवाढच मिळाली नाही, यामुळे कुपोषित बालकांसाठी निधी देण्याचा प्रश्नच निर्माण होत नसल्याचे सांगण्यात आले.