शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्यानं केली पाकची फजिती; पत्रकार परिषदेत फोटो दाखवत खोट्या दाव्याची पोलखोल
2
Operation Sindoor Live Updates: भारताच्या २६ ठिकाणांवर पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न
3
भारताच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, काय काय करतंय वाचाच 
4
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
5
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश
6
राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन
7
India vs Pakistan : जीडीपी, जॉब आणि डेव्हलपमेंटमध्ये पाकिस्तानची दूरपर्यंत भारताशी तुलना नाही; पाहा 'ही' आकडेवारी
8
India Pakistan Tension : पाकिस्तानच्या मिसाईलचे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 
9
शिवाजी साटम यांच्या कमबॅकनंतर पार्थ समथानची CID 2 मधून एक्झिट; म्हणाला, "हे आधीच..."
10
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
11
India Pakistan Tension : खेळ महत्त्वाचा; पण आधी देश! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा खास संदेश
12
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?
13
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
14
Tarot Card: एकावेळी एका गोष्टीवर लक्ष द्या, नाहीतर तारांबळ उडेल; आगामी आठवडा संयम पाहणारा!
15
"मसूद अजहर-हाफिज सईद बिनधास्त फिरत आहेत...", 'गोपी बहू'नं पाकिस्तानला दाखवला आरसा, म्हणाली - युद्ध व्हायलाच पाहिजे...
16
Virat Kohli Test Retirement: रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
17
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड की 'टेररिस्ट फंड'? पाकिस्तानला IMF च्या फंडिंगवर भडकल्या प्रियंका चतुर्वेदी
18
India Pakistan Tension : उडवून टाकलं! भारत-पाक हल्ल्यादरम्यान अमृतसरमध्ये पाडले ड्रोन
19
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी

३९ कारखान्यांची साखर जप्त होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 00:49 IST

कोल्हापूर : हंगाम सुरू होऊन पावणेतीन महिने उलटले तरी शेतकऱ्यांना एक रुपयाही न देणाºया राज्यातील ३९ साखर कारखान्यांवर महसुली ...

कोल्हापूर : हंगाम सुरू होऊन पावणेतीन महिने उलटले तरी शेतकऱ्यांना एक रुपयाही न देणाºया राज्यातील ३९ साखर कारखान्यांवर महसुली कारवाई करण्याचा निर्णय साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी घेतला आहे. यामध्ये १८ खासगी, तर २१ सहकारी कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांकडे १८१३ कोटी ८१ लाख थकीत एफआरपी असून, त्यांची साखर जप्त करून शेतकºयांना एफआरपीप्रमाणे पैसे देण्याचे आदेश मंगळवारी रात्री उशिरा गायकवाड यांनी काढले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रेट्याने सरकारला ही कारवाई करावी लागली आहे.साखरेचे दर घसरल्याने एकरकमी एफआरपी देता येत नसल्याची भूमिका राज्यातील कारखान्यांनी घेतली. तर एकरकमी एफआरपीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाम राहिली आहे. सोमवारी (दि. २८) साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढत कारखान्यांवर कारवाईची मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केली. कारवाईचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित केले. मंगळवारी एफआरपी थकविणाºया कारखान्यांवर कारवाईसाठी ‘स्वाभिमानी’ प्रयत्नशील होती. राज्यातील ३९ कारखान्यांनी शेतकºयांना एक दमडीही दिलेली नाही. त्यांच्याकडे १८१३ कोटी ८१ लाखांची एफआरपी थकीत आहे. या कारखान्यांना नोटिसा काढून २४ जानेवारी रोजी त्यांची सुनावणी घेतली. पाच दिवसांत या कारखान्यांनी पैसे न दिल्याने मंगळवारी रात्री महसुली कारवाईचे आदेश आयुक्तांनी जिल्हाधिकाºयांना दिले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील ‘दत्त-शिरोळ’, ‘जवाहर’, ‘पंचगंगा’, ‘शरद’, ‘वारणा’, ‘गुरुदत्त’, ‘संताजी घोरपडे’, ‘इको केन शुगर’; तर सांगली जिल्ह्यातील ‘महाकाली’, ‘वसंतदादा’, ‘केन अ‍ॅग्रो’, ‘निनाईदेवी’, ‘विश्वासराव नाईक’ व सातारा जिल्ह्यातील ‘किसन वीर’, ‘किसन वीर- प्रतापगड’, ‘किसन वीर- खंडाळा’ कारखान्यांचा समावेश आहे.दररोज ५० कारखान्यांना जप्तीच्या नोटिसापहिल्या टप्प्यात सुनावणी पूर्ण झालेल्या ३९ कारखान्यांवर साखरजप्तीची कारवाई केली. उर्वरित कारखान्यांपैकी रोज ५० कारखान्यांना नोटिसा काढून त्यांची सुनावणी घेतली जाईल आणि त्यांच्यावरही ही कारवाई करण्याची तयारी साखर आयुक्तांनी केली आहे.जिल्हाधिकारी आजपासून कार्यवाही करणारसाखर आयुक्तांनी महसूल कारवाईचे आदेश दिले आहेत. हे आदेश बुधवारी सकाळी संबंधित जिल्हाधिकाºयांना प्राप्त होणार असून, त्यानंतर पुढील कार्यवाही सुरू होणार आहे.या कारखान्यांवर कारवाई होणारकोल्हापूर : दत्त-शिरोळ, जवाहर, पंचगंगा, शरद, वारणा, गुरुदत्त, संताजी घोरपडे, इको केन शुगर.सांगली : महाकाली, वसंतदादा, केन अ‍ॅग्रो,निनाईदेवी, विश्वासराव नाईकसातारा : किसन वीर- भुर्इंज, किसन वीर- प्रतापगड,किसन वीर- खंडाळा.सोलापूर : विठ्ठल-पांडे, गोकुळ शुगर, कुरमदास, सिद्धेश्वर, बबनराव शिंदे, जयहिंद शुगर.जळगाव : मधुकर. च्जालना : समृद्धी शुगर, रामेश्वरबीड : माजलगाव, वैद्यनाथ, जय महेश शुगर, जय भवानीपरभणी : रेणुका शुगर, त्रिधारा शुगर.उस्मानाबाद : शीला अतुल शुगर, शंभो महादेव.लातूर : पानगेश्वर, श्री साईबाबा शुगर अहमदनगर : गणेश, डॉ. बी. बी. तनपुरे औरंगाबाद : शरदनागपूर : वेंकेटेश्वरा