शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा एक वर्ष आधीच; ही कुठली पद्धत?, इतिहास संशोधकांचा सवाल

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: June 2, 2023 13:54 IST

राजकीय धुळवडीमुळे शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा करता येणार नाही, या भीतीपोटी सरकार यंदाचा ३४९वा सोहळा ३५०वा म्हणून एक वर्ष आधीच साजरा करत आहे

इंदुमती गणेशकोल्हापूर : पुढच्यावर्षी मेमध्ये लोकसभा निवडणूक, राजकीय धुळवडीमुळे शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा करता येणार नाही, या भीतीपोटी सरकार यंदाचा ३४९वा सोहळा ३५०वा म्हणून एक वर्ष आधीच साजरा करत आहे. आजवरच्या इतिहासात कोणत्याही महापुरुषांची जयंती, राज्याभिषेक किंवा पुण्यस्मरणाचे कार्यक्रम त्यावर्षीपासून साजरे केले जात असताना यंदा फक्त राजकारणासाठी एक वर्ष आधीच त्रिशतकोत्तर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करणारे सरकारचे गणित कच्चे आहे की मेथड चुकली, अशी विचारणा इतिहास संशोधकांनी केली आहे.स्वराज्य संस्थापक शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा म्हणजे महाराष्ट्रासाठी सोनियाचा दिन. यादिवशी स्वराज्याला, रयतेला राजा मिळाला म्हणूनच दरवर्षी ६ जून रोजी मोठ्या जल्लोषात रायगडावर साजरा होतो. त्यासाठी हजारो मावळे रायगडावर दाखल होतात. यंदाचा हा ३४९वा शिवराज्याभिषेक दिन असताना शासनाकडून ३५०वा सोहळा म्हणून चुकीचे मार्केटिंग केले जात आहे.६ जूनला काय करणार?दरवर्षी ६ जूनला हा सोहळा होत असतो; पण आज शुक्रवारी पंतप्रधानांची वेळ आहे म्हणून तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जात आहे. मग ६ जूनला काय करणार? दाेन वेळा शिवराज्याभिषेक करणार का? हे प्रश्न आहेत. हा सगळा खटाटोप फक्त पुढच्यावर्षीच्या निवडणुकांसाठी केला जात असल्याने इतिहास संशोधक व शिवप्रेमींमध्ये असंतोष आहे.

ही कुठली पद्धत म्हणायची?शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ६ जून १६७४ रोजी झाला. तेव्हापासून २०२३ पर्यंतची तारीख विचारात घेतली तर यंदाचा ३४९वा शिवराज्याभिषेक दिन आहे. पुढच्यावर्षीचा म्हणजे २०२४ सालचा शिवराज्याभिषेक दिन ३५०वा असणार आहे.

याआधीचे महापुरुषांचे उत्सव

  • शिवराज्याभिषेक दिनाचा त्रिशतकोत्सव १९७४ साली साजरा झाला. त्यावेळी रायगडावर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी गेल्या होत्या. कोल्हापुरात हत्तीवरून मिरवणुका निघाल्या होत्या. शासनाच्या लोकराज्य मासिकामध्ये याची छायाचित्रे व वर्णन आहे.
  • शिवाजी महाराजांचा त्रिशताब्दी जन्मोत्सव १९२७ साली साजरा झाला.
  • शिवाजी महाराजांचा ३००वा पुण्यस्मरण १९८० साली झाला.
  • राजर्षी शाहू महाराजांचा जन्मशताब्दी उत्सव १९७४ साली झाला.
  • शाहू महाराजांचे स्मृतिशताब्दी वर्ष ६ मे २०२२ साली सुरू झाले व २०२३ साली संपले.

राजकारणासाठी आणि निवडणुकांसाठी ३४९व्या शिवराज्याभिषेक दिनाचा, इतिहासाचा सरकारकडून खेळखंडोबा केला जात आहे. हा प्रकार म्हणजे बाळ जन्मण्याआधीच त्याचा वाढदिवस करण्याचा, इतिहास संशोधकांना, दिग्गज मंडळींना नालायक ठरवण्याचा प्रयत्न आहे. शिवप्रेमींनी चुकीच्या गोष्टींमागे फरफटत न जाता, डोळसपणे याचा विचार करावा. -इंद्रजित सावंत, इतिहास संशोधक, कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजShivrajyabhishekशिवराज्याभिषेक