शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
3
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
4
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
5
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
6
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
7
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
8
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
9
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
10
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती
11
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
12
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
13
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
14
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
15
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
16
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
17
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
18
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
19
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
20
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे

३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा एक वर्ष आधीच; ही कुठली पद्धत?, इतिहास संशोधकांचा सवाल

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: June 2, 2023 13:54 IST

राजकीय धुळवडीमुळे शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा करता येणार नाही, या भीतीपोटी सरकार यंदाचा ३४९वा सोहळा ३५०वा म्हणून एक वर्ष आधीच साजरा करत आहे

इंदुमती गणेशकोल्हापूर : पुढच्यावर्षी मेमध्ये लोकसभा निवडणूक, राजकीय धुळवडीमुळे शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा करता येणार नाही, या भीतीपोटी सरकार यंदाचा ३४९वा सोहळा ३५०वा म्हणून एक वर्ष आधीच साजरा करत आहे. आजवरच्या इतिहासात कोणत्याही महापुरुषांची जयंती, राज्याभिषेक किंवा पुण्यस्मरणाचे कार्यक्रम त्यावर्षीपासून साजरे केले जात असताना यंदा फक्त राजकारणासाठी एक वर्ष आधीच त्रिशतकोत्तर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करणारे सरकारचे गणित कच्चे आहे की मेथड चुकली, अशी विचारणा इतिहास संशोधकांनी केली आहे.स्वराज्य संस्थापक शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा म्हणजे महाराष्ट्रासाठी सोनियाचा दिन. यादिवशी स्वराज्याला, रयतेला राजा मिळाला म्हणूनच दरवर्षी ६ जून रोजी मोठ्या जल्लोषात रायगडावर साजरा होतो. त्यासाठी हजारो मावळे रायगडावर दाखल होतात. यंदाचा हा ३४९वा शिवराज्याभिषेक दिन असताना शासनाकडून ३५०वा सोहळा म्हणून चुकीचे मार्केटिंग केले जात आहे.६ जूनला काय करणार?दरवर्षी ६ जूनला हा सोहळा होत असतो; पण आज शुक्रवारी पंतप्रधानांची वेळ आहे म्हणून तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जात आहे. मग ६ जूनला काय करणार? दाेन वेळा शिवराज्याभिषेक करणार का? हे प्रश्न आहेत. हा सगळा खटाटोप फक्त पुढच्यावर्षीच्या निवडणुकांसाठी केला जात असल्याने इतिहास संशोधक व शिवप्रेमींमध्ये असंतोष आहे.

ही कुठली पद्धत म्हणायची?शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ६ जून १६७४ रोजी झाला. तेव्हापासून २०२३ पर्यंतची तारीख विचारात घेतली तर यंदाचा ३४९वा शिवराज्याभिषेक दिन आहे. पुढच्यावर्षीचा म्हणजे २०२४ सालचा शिवराज्याभिषेक दिन ३५०वा असणार आहे.

याआधीचे महापुरुषांचे उत्सव

  • शिवराज्याभिषेक दिनाचा त्रिशतकोत्सव १९७४ साली साजरा झाला. त्यावेळी रायगडावर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी गेल्या होत्या. कोल्हापुरात हत्तीवरून मिरवणुका निघाल्या होत्या. शासनाच्या लोकराज्य मासिकामध्ये याची छायाचित्रे व वर्णन आहे.
  • शिवाजी महाराजांचा त्रिशताब्दी जन्मोत्सव १९२७ साली साजरा झाला.
  • शिवाजी महाराजांचा ३००वा पुण्यस्मरण १९८० साली झाला.
  • राजर्षी शाहू महाराजांचा जन्मशताब्दी उत्सव १९७४ साली झाला.
  • शाहू महाराजांचे स्मृतिशताब्दी वर्ष ६ मे २०२२ साली सुरू झाले व २०२३ साली संपले.

राजकारणासाठी आणि निवडणुकांसाठी ३४९व्या शिवराज्याभिषेक दिनाचा, इतिहासाचा सरकारकडून खेळखंडोबा केला जात आहे. हा प्रकार म्हणजे बाळ जन्मण्याआधीच त्याचा वाढदिवस करण्याचा, इतिहास संशोधकांना, दिग्गज मंडळींना नालायक ठरवण्याचा प्रयत्न आहे. शिवप्रेमींनी चुकीच्या गोष्टींमागे फरफटत न जाता, डोळसपणे याचा विचार करावा. -इंद्रजित सावंत, इतिहास संशोधक, कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजShivrajyabhishekशिवराज्याभिषेक