शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा एक वर्ष आधीच; ही कुठली पद्धत?, इतिहास संशोधकांचा सवाल

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: June 2, 2023 13:54 IST

राजकीय धुळवडीमुळे शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा करता येणार नाही, या भीतीपोटी सरकार यंदाचा ३४९वा सोहळा ३५०वा म्हणून एक वर्ष आधीच साजरा करत आहे

इंदुमती गणेशकोल्हापूर : पुढच्यावर्षी मेमध्ये लोकसभा निवडणूक, राजकीय धुळवडीमुळे शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा करता येणार नाही, या भीतीपोटी सरकार यंदाचा ३४९वा सोहळा ३५०वा म्हणून एक वर्ष आधीच साजरा करत आहे. आजवरच्या इतिहासात कोणत्याही महापुरुषांची जयंती, राज्याभिषेक किंवा पुण्यस्मरणाचे कार्यक्रम त्यावर्षीपासून साजरे केले जात असताना यंदा फक्त राजकारणासाठी एक वर्ष आधीच त्रिशतकोत्तर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करणारे सरकारचे गणित कच्चे आहे की मेथड चुकली, अशी विचारणा इतिहास संशोधकांनी केली आहे.स्वराज्य संस्थापक शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा म्हणजे महाराष्ट्रासाठी सोनियाचा दिन. यादिवशी स्वराज्याला, रयतेला राजा मिळाला म्हणूनच दरवर्षी ६ जून रोजी मोठ्या जल्लोषात रायगडावर साजरा होतो. त्यासाठी हजारो मावळे रायगडावर दाखल होतात. यंदाचा हा ३४९वा शिवराज्याभिषेक दिन असताना शासनाकडून ३५०वा सोहळा म्हणून चुकीचे मार्केटिंग केले जात आहे.६ जूनला काय करणार?दरवर्षी ६ जूनला हा सोहळा होत असतो; पण आज शुक्रवारी पंतप्रधानांची वेळ आहे म्हणून तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जात आहे. मग ६ जूनला काय करणार? दाेन वेळा शिवराज्याभिषेक करणार का? हे प्रश्न आहेत. हा सगळा खटाटोप फक्त पुढच्यावर्षीच्या निवडणुकांसाठी केला जात असल्याने इतिहास संशोधक व शिवप्रेमींमध्ये असंतोष आहे.

ही कुठली पद्धत म्हणायची?शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ६ जून १६७४ रोजी झाला. तेव्हापासून २०२३ पर्यंतची तारीख विचारात घेतली तर यंदाचा ३४९वा शिवराज्याभिषेक दिन आहे. पुढच्यावर्षीचा म्हणजे २०२४ सालचा शिवराज्याभिषेक दिन ३५०वा असणार आहे.

याआधीचे महापुरुषांचे उत्सव

  • शिवराज्याभिषेक दिनाचा त्रिशतकोत्सव १९७४ साली साजरा झाला. त्यावेळी रायगडावर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी गेल्या होत्या. कोल्हापुरात हत्तीवरून मिरवणुका निघाल्या होत्या. शासनाच्या लोकराज्य मासिकामध्ये याची छायाचित्रे व वर्णन आहे.
  • शिवाजी महाराजांचा त्रिशताब्दी जन्मोत्सव १९२७ साली साजरा झाला.
  • शिवाजी महाराजांचा ३००वा पुण्यस्मरण १९८० साली झाला.
  • राजर्षी शाहू महाराजांचा जन्मशताब्दी उत्सव १९७४ साली झाला.
  • शाहू महाराजांचे स्मृतिशताब्दी वर्ष ६ मे २०२२ साली सुरू झाले व २०२३ साली संपले.

राजकारणासाठी आणि निवडणुकांसाठी ३४९व्या शिवराज्याभिषेक दिनाचा, इतिहासाचा सरकारकडून खेळखंडोबा केला जात आहे. हा प्रकार म्हणजे बाळ जन्मण्याआधीच त्याचा वाढदिवस करण्याचा, इतिहास संशोधकांना, दिग्गज मंडळींना नालायक ठरवण्याचा प्रयत्न आहे. शिवप्रेमींनी चुकीच्या गोष्टींमागे फरफटत न जाता, डोळसपणे याचा विचार करावा. -इंद्रजित सावंत, इतिहास संशोधक, कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजShivrajyabhishekशिवराज्याभिषेक