शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

मलकापूर : अणुस्करा मार्गासाठी ३०० कोटींचा निधी मंजूर तीन जिल्ह्यांतील रस्ता : नोव्हेंबरमध्ये प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 00:11 IST

कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातून जाणारा विटा, पेठ ते पाचल या अणुस्कुरा घाटातील राज्य मार्गासाठी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ३०० कोटी १८ लाख रुपयांचा निधी मंजूर

ठळक मुद्दे विटा ते पाचलपर्यंतचे अंतर राजाराम कांबळे

राजाराम कांबळे-

मलकापूर : कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातून जाणारा विटा, पेठ ते पाचल या अणुस्कुरा घाटातील राज्य मार्गासाठी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ३०० कोटी १८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हा राज्यमार्ग ‘हायब्रीड अ‍ॅन्युईटी’ या तंत्रज्ञानाने बनविला जाणार आहे. त्यामुळे प्रवासी, वाहनधारक यांना सोयीचा राज्यमार्ग म्हणून उदयास येणार आहे. नोव्हेंबर महिन्यात रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे.

कोल्हापूर, सांगली व रत्नागिरी जिल्ह्यांच्या राजापूर, शाहूवाडी, शिराळा व वाळवा तालुक्यातून अणुस्कुरा, विटा, पेठ हा राज्यमार्ग गेला आहे. हा राज्यमार्ग १३५ किलोमीटर लांबीचा आहे. या मार्गावर नऊ किलोमीटरचा यु आकाराची वळणे असलेला सर्वांत मोठा घाट आहे, तर सर्वांत लहान अमेणी घाट आहे. चार तालुक्यांच्या हद्दीतून हा राज्यमार्ग गेला आहे. रस्त्यासाठी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने ३०० कोटी १८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने टेंडरदेखील प्रसिद्ध केले आहे. पन्हाळा सार्वजनिक बांधकाम कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली काम केले जाणार आहे. एकाच कंपनीला काम दिल्यामुळे कामाचा दर्जा चांगला राहणार आहे.

या रस्त्याच्या कामासाठी विटा पेठ ते कोकरूड रस्त्यासाठी १९३ कोटी तर कोकरूड, अणुस्कुरा, पाचलपर्यंत १२५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. हा रस्ता हायब्रीड अ‍ॅन्युईटी या तंत्रज्ञानाने बनावला जाणार आहे. रस्त्यासाठी नवीन संकल्पना वापरली जाणार आहे. सात मीटर रुंदीचा होणार आहे. रस्त्याच्या काही ठिकाणी कायमस्वरूपी पाण्याचे झरे आहेत. त्यामुळे रस्ता खचून खड्डे पडतात, बारमाई पाणी झिरपत असते अशा ठिकाणी मोठा भराव टाकून रस्ता मजबूत केला जाणार आहे. शाहूवाडी तालुक्यातील अमेणी फाटा, तुरूकवाडी, पेरीड (घागर दरा), अमेणी घाट अशा ठिकाणी पाण्याचे स्रोत असल्यामुळे रस्ता लवकर खराब होतो.

या राज्यमार्गाच्या रस्त्याचे काम करतेवेळी कोकरूड, मलकापूर बाजारपेठेतून हा रस्ता गेला आहे. ज्या ठिकाणी रस्त्याची रुंदी कमी आहे अशा ठिकाणी रस्ता सात मीटर रुंदीने केला जाणार आहे. २००० साली रस्त्याचे रुंदीकरण झाले होते. सांगली जिल्ह्यातून रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारी झाडे तोडली जाणार आहे. ज्या ठिकाणी अपूर्ण कमी रुंदी आहे तेथे रस्ता मोठा केला जाणार आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यावर दळणवळणाला चालना मिळणार आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील प्रवाशांना गोवा व कोकणात जाण्यासाठी जवळचा मार्ग होणार आहे. कोकणातील प्रवाशांना पुणे, मुंबई येथे जाण्यासाठी जवळचा मार्ग आहे.

रस्त्याचे रुंदीकरण झाल्यास शाहूवाडी, शिराळा तालुक्यातील चाकरमान्यांना मुंबईला लवकर जाता येणार आहे. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची ये-जा वाढणार आहे. कोकणातील जयगड बंधरातून या मार्गावरून कोळशाची मोठी वाहतूक केली जाते. वाहनधारक, प्रवासी यांना हा मार्ग सुखकर होणार आहे. विटा, पेठ, कोकरूड, मलकापूर, अणुस्कुरा, साटवली, पाचलपर्यंत सहहकाम केले जाणार आहे.अणुस्कुरा घाटाचे रूंदीकरण होणारअणुस्कुरा घाटाचे रुंदीकरण केले जाणार आहे. घाटाच्या दोन्ही बाजूला संरक्षण भिंती, तारेचे कुंपण, लोखंडी बॅरेकेटस उभारली जाणार आहेत. या मार्गावरून सध्या चार चाकी व अवजड वाहनांची नेहमी गर्दी असते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणाºया जमिनीची किमती गगनाला भिडणार आहेत. या रस्त्याला राज्यमार्गाचा दर्जा मिळाल्यामुळे वाहनधारकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

 

 

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाkolhapurकोल्हापूरSangliसांगलीpwdसार्वजनिक बांधकाम विभाग