शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
4
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
5
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
6
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
7
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
9
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
11
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
12
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
13
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
14
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
15
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
16
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
17
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
18
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
19
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
20
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

पेठवडगाव तालुक्यासाठी ३० ग्रामसभांचे ठराव

By admin | Updated: May 15, 2015 00:05 IST

लोकप्रतिनिधींचे पाठबळ नाही : विभाजनाचा प्रस्ताव शासनदरबारी दाखल करूनही वरिष्ठ पातळीवर उदासीनता

दिलीप चरणे -नवे पारगाव येथील सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर साळुंखे यांनी सन २००० मध्ये हातकणंगले तालुक्याचे विभाजन होऊन पेठवडगाव स्वतंत्र तालुका व्हावा, अशी मागणी करणारा प्रस्ताव प्रथम राज्य शासनाकडे मांडला. व्यक्तिगत पातळीवर त्यांनी प्रयत्न केले. तथापि, त्यांच्या प्रयत्नास यश मिळाले नाही. त्यावेळी जनतेची फारशी साथही मिळाली नाही. दरम्यान, आठ वर्षे निघून गेली. हातकणंगले तालुक्याचे विभाजन होऊन पेठवडगाव व इचलकरंजी हे दोन तालुके व्हावेत, अशी मागणी जनतेतूनच जोर धरू लागली.प्रभाकर साळुंखे यांनी हातकणंगले तालुक्यात फिरुन जनतेची हातकणंगले तालुका विभाजन संदर्भात मते जाणून घेतली. त्यातून ‘नियोजित पेठवडगाव तालुका कृती समिती’ची स्थापना झाली. पेठवडगावचे रौप्यमहोत्सवी नगराध्यक्ष विजयसिंह यादव व ज्येष्ठ कायदेपंडित अ‍ॅड. पी. के. चौगुले (पारगावकर) यांच्या मार्गदर्शनाखाली कृती समितीची स्थापना करुन कार्य अधिक गतीमान केले. कृती समितीमध्ये सर्वसमावेशक सदस्यांचा समावेश केला. समितीच्या वतीने पेठवडगाव स्वतंत्र तालुक्याच्या मागणीची जाणीवजागृती करण्यात आली.हातकणंगले तालुक्यातील ६२ गावांपैकी ३० गावांना १५ आॅगस्ट २०११ रोजीच्या ग्रामसभेत ‘हातकणंगले तालुक्याचे विभाजन होऊन पेठवडगाव स्वतंत्र तालुका व्हावा’ असा एकमुखी ठराव संमत केला. पेठवडगावसह परिसरातील ३ गावांनी पेठवडगाव स्वतंत्र तालुका होण्याच्या मागणीस ठरावाद्वारे बळ दिल्याने कृती समितीनेही कार्याची गती वाढविली.कृती समितीच्यावतीने १२ मार्च २०१२ रोजी वडगाव येथे तालुक्यातील ३५ गावांतील सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्यांसह विविध पक्ष, सामाजिक संस्थांचा संयुक्त मेळावा विजयसिंह यादव यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या मेळाव्यात पेठवडगावला तालुक्याचा दर्जा मिळण्यासाठी व्यापक लढा उभारू व प्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.नियोजित पेठवडगाव तालुका कृती समितीच्या वतीने २५ डिसेंबर २०१२ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व महसूलमंत्री यांच्याकडे योग्य त्या कार्यवाहीसाठी तालुका विभाजनाचा प्रस्ताव सादर करण्यात आला.दरम्यान, हातकणंगले तालुक्याच्या विभाजनाला जनहिताचा रेटा आहे, पण त्याला लोकप्रतिनिधींचे पाठबळ मिळत नाही. सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर हातकणंगले तालुक्याच्या विभाजनाच्या मागणीचा फार्स तालुक्यातील लोकप्रतिनिधींकडून केला जातो. हातकणंगले तालुक्यातील लोकप्रतिनिधींची उदासीनता हाच तालुका विभाजनातील मोठा अडसर आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या जवळच असणाऱ्या सांगली जिल्ह्यातील तालुका विभाजनाचे उत्तम उदाहरण आपल्यासमोर आहे. सन १९९९ ला सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्याचे विभाजन होऊन तासगाव व पलूस अशा दोन तालुक्यांची निर्मिती झाली, तर खानापूर तालुक्याचे विभाजन होऊन कडेगाव व खानापूर असे दोन तालुके झाले. येथे लोकप्रतिनिधींचे पाठबळ मिळाल्याने ते शक्य झाले. (समाप्त)यांनी दिले ठरावनिलेवाडी, जुने पारगाव, नवे पारगाव, तळसंदे, चावरे, मनपाडळे, वाठार तर्फ उदगाव, मौजे भादोले, मौजे किणी, घुणकी, भेंडवडे, लाटवडे, सावर्डे, खोची, कापूरवाडी, मौजे तासगाव, मौजे वडगाव, संभापूर, टोप, नागाव, वठार तर्फ वडगाव, नरंदे, मिणचे, वडगाव नगरपरिषद, मौजे अंबप, अंबपवाडी, पाडळी, कासारवाडी, शिरोली, सोनार्ली वसाहत.