जिल्ह्यात ६७६ शेतकऱ्यांचाच पीक विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 12:26 AM2019-08-19T00:26:14+5:302019-08-19T00:26:22+5:30

नसिम सनदी। लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पीक विमा न भरणे किती महागात पडू शकते, याची प्रचिती आता शेतकऱ्यांना ...

3 farmers own crop insurance in the district | जिल्ह्यात ६७६ शेतकऱ्यांचाच पीक विमा

जिल्ह्यात ६७६ शेतकऱ्यांचाच पीक विमा

Next

नसिम सनदी।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पीक विमा न भरणे किती महागात पडू शकते, याची प्रचिती आता शेतकऱ्यांना येऊ लागली आहे. तीन लाखांहून अधिक शेतकºयांची पिके महापुराने कुजवली आहेत; त्यापैकी केवळ ६७६ इतक्याच शेतकºयांनी विमा उतरवल्याने ते लाभास पात्र ठरणार आहेत. उर्वरित शेतकºयांना शासनाच्या मदतीवरच विसंबून राहावे लागणार आहे.
पीक नुकसानीचा निकष ५० ऐवजी ३३ टक्क्यांपर्यंत खाली आणल्याने विम्याचा लाभ घेणाºया शेतकºयांची संख्या वाढेल अशी अपेक्षा होती, पण नेहमीप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी गाफील राहिले. प्रलयंकारी असा महापूर कोल्हापूर जिल्ह्याने अनुभवला. यात जिल्ह्यातील ३ लाख ९१ हजार ४८० पिकाखालील क्षेत्रापैकी तब्बल १ लाख ५ हजार ६९ हेक्टरवरील पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली, तर उर्वरित क्षेत्रातील पिकांनाही अतिवृष्टीचा फटका बसला. उंच भागातील पिकांचा अपवाद वगळता जिल्ह्यातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. यातून सावरण्यासाठी शेतकºयांना विम्याचा मोठा आधार होता, पण दुर्दैवाने कोल्हापुरातील शेतकरी त्यापासून वंचित राहणार आहेत.
उंबरठा उत्पन्न जास्त असल्याने विमा हप्ता भरूनही त्याचा लाभ होत नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी पिकांचा विमा उतरवण्यास सहजासहजी धजावत नाहीत. यावर्षी दोन ते तीनवेळा मुदतवाढ देऊन देखील केवळ ६७६ शेतकºयांनी २७१ हेक्टरवरीलच भात, सोयाबीन, भुईमुग, ज्वारी, नाचणी या पिकाचे विमे उतरवले आहेत.
नुकसानीच्या आकड्यात आणि विमाधारक शेतकºयांच्या आकड्यात फार मोठी तफावत आहे. ३ लाख १३ हजार ६१० शेतकºयांची पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर हा आकडा आणखी वाढणार आहे.
उसाचे सर्वाधिक नुकसान
जिल्ह्यातील सर्वाधिक दोन लाखांहून अधिक हेक्टरवर उसाचे पीक घेतले जाते.
महापुराच्या तडाख्यात सर्वाधिक एक लाख हेक्टर नुकसान एकट्या ऊस पिकाचे झाले आहे, पण त्याचा विम्यात अंतर्भाव केला जात नाही.
मध्यंतरी जिल्हा बँकेच्या माध्यमातून पीककर्जातून विम्याची रक्कम वसूल करण्याचा निर्णय झाला, पण त्याला उत्पादकांकडूनच कडाडून विरोध झाला.
आज उसाचे ७० टक्क्यांहून अधिक नुकसान झाल्याने पुन्हा एकदा विम्याची गरज भासू लागली आहे.

चालू वर्षी पीकनिहाय भरलेला विमा
पीक शेतकरी क्षेत्र(हे.) विमा हफ्ता संरक्षित रक्कम
सोयाबीन १४९ ५६.६५ ४८७२१.१३ २४३६0५७.५0
ज्वारी ६ २.४९ १२२३.१९ ६११५९.८४
भात ४१४ १७0.८९ १४८६७५.३४ ७४३३७७१.५५
भूईमुग ६७ २७.६३ १७६८१.५९ ८८४0८0.३२
नाचणी ४0 १४.३१ ५२९३.५९ २६४६७९.५0
एकूण ६७६ २७१.१७ २२१५९४.८४ ११0७९७४८.७१

Web Title: 3 farmers own crop insurance in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.