शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा-AIMIM युतीचा दुसरा अंक! एमआयएमच्या पाठिंब्यावर BJP नेत्याचा मुलगा बनला स्वीकृत नगरसेवक
2
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता बदलणार; 'सेवा तीर्थ'साठी किती खर्च?
3
सोन्याच्या दुकानात चोरी केली, परत जाताना गुटखा खाण्यासाठी मास्क काढला अन् सीसीटीव्हीत कैद झाला, पोहोचला तुरुंगात
4
Travel : २६ जानेवारीचा लॉन्ग वीकेंड आणि वृंदावनची वारी! कान्हाच्या नगरीत फिरण्यासाठी 'हे' आहे परफेक्ट प्लॅनिंग
5
आमचा अणुबॉम्ब भारत, इस्रायल, अमेरिकेच्या विरोधात...', अणु सिद्धांतावर पाकिस्तानचा मोठा दावा
6
"आम्ही कुणाला गुलाम बनवलं नाही, आम्ही तर...", काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
7
प्यारवाली लव्हस्टोरी! ४० वर्षांनी 'ती' म्हणाली 'हो', तरुणपणी झालं नाही लग्न; आता जुळल्या रेशीमगाठी
8
मुकुल अग्रवाल यांनी विकत घेतले 100 वर्ष जुन्या कंपनीचे तब्बल 4 कोटी शेअर, ₹18 वर आलाय भाव; तुमच्याकडे आहेत का?
9
आता कानावरही विश्वास ठेवू नका; इंदूरमध्ये भावाच्या आवाजात फोन आला अन् शिक्षिकेचे ९७ हजार उडाले!
10
हॉर्मुझचा जलमार्ग इराण रोखणार? जागतिक तेल बाजार धास्तावला; पेट्रोल-डिझेलच्या किमती भडकणार?
11
BBL: बिग बॅश लीगमध्ये रिझवानचा घोर अपमान; कर्णधारानं भर मैदानातून धाडलं बाहेर, कारण काय?
12
१० प्रभागांत 'हॉट सीट'; निवडणुकीत 'बिग फाइट', भाजपचे महानगराध्यक्ष, माजी महापौर, सभापतींच्या लढतीकडे लक्ष!
13
गुंतवणूकदारांना दिलासा! टाटा स्टील आणि एसबीआयमध्ये मोठी खरेदी; निफ्टी पुन्हा २५,७०० च्या पार
14
दुसऱ्यांदा फेल झाले ISRO चे मिशन; PSLV-C62 मध्ये नेमका काय बिघाड झाला? जाणून घ्या...
15
ठाकरेंची 'मशाल' हाती घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरली बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री, गल्लोगल्ली केला प्रचार
16
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका पुढे गेल्या...! ग्रामीण भागातील निवडणुकीचे बिगुल कधी वाजणार? सर्वोच्च न्यायालयाने दिली नवी मुदत
17
सौदी अरेबियात अवैध स्थलांतरितांविरोधात मोठी कारवाई; आतापर्यंत १० हजार लोकांना देशाबाहेर हाकलले
18
राज ठाकरेंनी अदानींच्या वाढलेल्या उद्योगांवरून घेरले; अमित साटमांनी केला पलटवार, फोटो दाखवत म्हणाले...
19
Dry Day: मुंबई, पुण्यासह राज्यात सर्व २९ महापालिका क्षेत्रात १३ ते १६ जानेवारी या चार दिवस 'ड्राय डे'
20
"भाजपच्या बुलडोझरला न घाबरता आमचा कार्यकर्ता निर्धाराने उभा, काँग्रेसचाच झेंडा फडकणार"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याला २५० कोटी कृषीकर्जमाफी शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2017 01:21 IST

थकबाकीदारापेक्षा ‘सरसकट’ची मानसिकता : ‘यूपी’च्या धर्तीवर एक लाखापर्यंत निर्णय अपेक्षित; शेतकऱ्यांना आशा

कोल्हापूर : उत्तर प्रदेश सरकारच्या धर्तीवर शेतकऱ्यांना एक लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी मिळाली तर कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे अडीच लाख शेतकऱ्यांना तिचा लाभ होणार आहे. थकबाकीदारांबरोबरच नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काहीतरी देण्याची राज्य सरकारची मानसिकता आहे; त्यामुळे जिल्ह्यासाठी किमान २५० कोटींची कर्जमाफी होऊ शकते. देशाचे राजकारण आतापर्यंत शेतकऱ्यांभोवतीच फिरले आहे. निवडणुकीत शेती आणि शेतकऱ्यांसाठी गोंडस घोषणा करायच्या आणि मैदान मारून न्यायचे हे काही नवे नाही. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली आणि ‘न भूतो न भविष्यती’ असे यश भाजपला मिळाले; पण पंतप्रधान मोदी यांचा शब्द मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी खरा करीत राज्यातील ८६ लाख शेतकऱ्यांना एक लाखापर्यंत कर्जमाफी केली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी काही नवीन नाही. शिवसेनेबरोबर कॉँग्रेस, राष्ट्रवादी यासाठी आग्रही आहे. दोन्ही कॉँग्रेसनी तर अखंड अर्थसंकल्पीय अधिवेशन कर्जमाफीच्या मागणीसाठी धारेवर धरले आहे. तेवढे करून ते थांबले नाहीत, तर रखरखत्या उन्हात संघर्षयात्रा काढून त्यांनी सरकारवर दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. कर्जमाफी देणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकही मंत्री म्हणत नाहीत; पण ती कधी देणार याबाबतही ते काहीच बोलत नसल्याने शेतकरी अस्वस्थ झाला आहे. उत्तर प्रदेशने एक लाखापर्यंत कर्जमाफी केल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर का असेना, पण सरकार काहीतरी निर्णय घेईल, असे वाटत आहे. मध्यंतरी सहकार विभागाने जिल्हानिहाय थकीत कर्जाची माहिती घेतली आहे; पण सरकारची मानसिकता पाहता केवळ थकबाकीदारांना कर्जमाफी न देता नियमित कर्जपुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ कसा होईल, याची चाचपणी सरकारच्या पातळीवर सुरू आहे. उत्तर प्रदेशच्या धर्तीवर निर्णय घेतला तर सगळ्याच शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या माध्यमातून दरवर्षी २ लाख ४२ हजार, तर ३४ राष्ट्रीयीकृत बॅँकांच्या माध्यमातून ६८ हजार शेतकरी २५०० कोटी पीककर्ज घेतात. त्यांपैकी बहुतांश शेतकरी हे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी आहेत. एक लाखापर्यंत सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेतला, तर जिल्ह्यातील किमान अडीच लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ होऊ शकतो. थकबाकीचे प्रमाण वाढले !यंदा उसाच्या तुटवड्यामुळे फेबु्रवारीमध्येच साखर कारखान्यांचा हंगाम संपला. उसाचे उत्पादन घटल्याने कारखान्यांच्या पहिल्या ऊस बिलातून ७५ टक्के कर्ज खाती भागली आहेत. त्यामुळे वाटप २५०० कोटींपैकी सुमारे ९०० कोटी अद्याप शेतकऱ्यांकडून येणे आहे. जूनपर्यंत त्याची वसुली झाली नाही तर ते थकीत जाणार आहे.केंद्र व राज्य सरकारची अशी होती योजना केंद्र सरकार पाच एकरांच्या आतील शेतकऱ्यांचे २००७ पूर्वीचे संपूर्ण थकीत कर्ज माफ.पाच एकरांवरील शेतकऱ्यांसाठी कर्ज सवलत योजना.राज्य सरकार सर्वच शेतकऱ्यांना सरसकट वीस हजार रुपये कर्जमाफी.