शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

आजऱ्यात रस्त्यावरील अपघातामुळे जातो २५ ते ३० जणांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:26 IST

सदाशिव मोरे आजरा : आजरा, गडहिंग्लज, उत्तूर रस्त्यावर गतिरोधक नसल्याने सुसाट वेगाने वाहने धावत आहेत. रस्त्याचा अंदाज येत नसल्याने ...

सदाशिव मोरे

आजरा : आजरा, गडहिंग्लज, उत्तूर रस्त्यावर गतिरोधक नसल्याने सुसाट वेगाने वाहने धावत आहेत. रस्त्याचा अंदाज येत नसल्याने अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. याच रस्त्यावर प्रतिवर्षी २५ ते ३० जणांचा नाहक बळी जात आहे. गतिरोधकाचा अभाव व वेगावर नियंत्रण नसल्याने अपघातात अनेक कुटुंबे उद्‌ध्वस्त होत आहेत.

कोकण व गोव्याचे प्रवेशद्वार आजरा आहे. सर्वच वाहने आजऱ्यामार्गे कोकणात जातात. दोन वाहने जाण्यासाठी अरूंद पण चांगला झालेला गडहिंग्लज-उत्तूर रस्ता सध्या अपघाताला निमंत्रण देत आहेत. दररोज या रस्त्यावर मोटारसायकलसह मोठ्या वाहनांचे अपघात होत आहेत. सुसाट वेगाने जाणारी वाहने, वेगावर अजिबात नियंत्रण नाही व रस्त्याचा अंदाज येत नसल्याने अपघात होत आहेत. मोटारसायकलस्वार तर हेल्मेटच घालत नाहीत. पोलीसही हेल्मेटऐवजी गाडीची कागदपत्रे पाहून दंड करतात. त्यामध्येही आर्थिक चिरीमिरी होऊन प्रकरणे मिटवली जातात. वळणावळणाचे रस्ते असल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. जवळपास ४४ ते ५० वळणे असून वाहनधारकांना ती लक्षात येत नाहीत. उसाने भरलेल्या ट्रॅक्टरमुळेही अपघात होतात. आजरा-गडहिंग्लज-उत्तूर-आंबोली रस्त्यावर प्रतिवर्षी २५ ते ३० जणांना आपला जीव गमवावा लागत आहे. मोटारसायकलीवरील युवकांचे लायसन्सही नसणे तसेच बेदरकारपणे वाहने चालवून अपघाताला निमंत्रण देत आहेत. वेगावरील नियंत्रणाबरोबर गतिरोधकाची गरज आहे. चार दिवसांपूर्वी मोटारसायकल अपघातात झालेला दोघांचा मृत्यू तालुकावासीयांचे मन हेलावणारा होता. मात्र, दोघांच्याही डोक्याला हेल्मेट नव्हते. आता सर्वांनीच वेगावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.

-------------------------

* प्रतिक्रिया

अरूंद रस्ता, वेगमर्यादेचे पालन नाही, रस्त्याच्या मधोमध पांढरे पट्टे पाहिजेत. पोलिसांच्या कारवाईबरोबर स्वयंशिस्तही गरजेची आहे तरच अपघातांचे प्रमाण कमी होईल.

- बालाजी भांगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक