शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

कोल्हापूर जिल्ह्यात साडेचार महिन्यांत २२ खून, ६ अनैतिक संबंधातून!

By उद्धव गोडसे | Updated: May 23, 2024 12:11 IST

क्षणिक रागामुळे आयुष्याची होते राखरांगोळी

उद्धव गोडसेकोल्हापूर : रागाच्या क्षणावर नियंत्रण मिळवता आले नाही तर वाद होऊन विपरीत घडते. रागाच्या भरात हातून गुन्हा घडतो अन् त्याची शिक्षा दोषींसह त्यांच्या कुटुंबालाही भोगावी लागते. आर्थिक नुकसान आणि कुटुंबांची फरफट होते. त्यामुळे अशा घटना टाळण्याचे भान असायलाच हवे. जिल्ह्यात गेल्या साडेचार महिन्यांत खुनाच्या २२ घटना घडल्या. यातील सहा खून अनैतिक संबंधातून, तर चार खून आर्थिक वादातून झाले आहेत.कौटुंबिक वाद, आर्थिक वाद आणि अनैतिक संबंधातून होणारे वाद हाणामारीपर्यंत पोहोचतात. क्षणिक रागाच्या भरात हाती लागेल ती वस्तू समोरच्या व्यक्तीच्या डोक्यात घातली जाते. काही वेळा कट रचून अडसर ठरणाऱ्या व्यक्तीचा काटा काढला जातो. पोर्ले तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) येथे रविवारी (दि. १९) सायंकाळी विकास पाटील या तरुणाचा खून अनैतिक संबंधातूनच झाल्याचे उघडकीस आले आहे.गेल्या साडेचार महिन्यांत जिल्ह्यात एकूण २२ खून झाले. यातील सहा खून अनैतिक संबंधातून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. आर्थिक वाद, शेतीचा वाद, गुंडांच्या टोळ्यांमधील संघर्ष यातूनही खुनांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात इचलकरंजीसह परिसरात सर्वाधिक खून होतात.

राग का येतोय?बदलत्या जीवनशैलीत माणसांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. अपेक्षा पूर्ण होत नसल्याने अपेक्षाभंगातून दु:ख वाढते. यातून परिस्थिती, आसपासच्या व्यक्ती, नातेवाइकांबद्दल मनात राग निर्माण होतो. भौतिक सुविधांना प्राधान्य देताना भावनिक विकासाकडे दुर्लक्ष होते. क्षमतांपेक्षा जास्त मिळवण्याचा हव्यास आणि याची पूर्तता होण्यात अडचणी येताच माणसांचा रागाचा पारा वाढतो. तो नियंत्रित ठेवण्यासाठी संवाद आणि विवेकी वृत्ती जागृत ठेवणे गरजेचे असल्याचे मानसोपचारतज्ज्ञ सांगतात.दोन कुटुंबांची वाताहतपोर्ले तर्फ ठाणे येथे रविवारी झालेल्या खुनामुळे विकास पाटील हा घरातील कर्ता तरुण गेला. त्याच्या पश्चात आई, पत्नी, दोन लहान मुले आणि भाऊ असा परिवार आहे. कर्ता तरुण गेल्यामुळे पाच-सहा एकर शेती, १० ते १२ जणावरांचा भार आता कुटुंबीयांवर पडला. बापाविना मुलांच्या शिक्षणाचाही प्रश्न गंभीर होण्याचा धोका आहे. दुसरीकडे हल्लेखोर युवराज गायकवाड याचेही कुटुंब उद्ध्वस्त झाले. सैन्यदलात नोकरी करून मिळवलेला मानसन्मान एका क्षणात धुळीस मिळाला. त्याच्यासह साथीदारांना आता अनेक वर्षे तुरुंगात काढावी लागतील. या काळात कुटुंबांची फरफट होणार. शिवाय कुटुंबांची बदनामी न भरून निघणारी असेल. अशा घटना टाळण्यासाठी नैतिक आचरण हाच महत्त्वाचा उपाय आहे.

असे घडले २२ खून

  • अनैतिक संबंध - ६
  • आर्थिक वाद - ४
  • पूर्ववैमनस्य - ३
  • प्रेम संबंध - २
  • कौटुंबिक वाद -१
  • अज्ञात कारण -१
  • इतर कारणांवरून - ५

अनैतिक संबंधातून खुनांचे प्रमाण वाढणे हे बिघडत्या सामाजिक वातावरणाचे प्रतीक आहे. अशा घटना संबंधित कुटुंबांवर आणि समाजमनावरही गंभीर परिणाम करतात. नैतिक आचरणातून अशा गुन्ह्यांचे प्रमाण कमी होऊ शकेल. - रवींद्र कळमकर - पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी