शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
3
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
4
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
5
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
6
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
7
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
8
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
11
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
12
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
13
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
14
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
15
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
16
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
17
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
18
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
19
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
20
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी

दररोज २१ एमएलडी सांडपाणी कोल्हापुरात विनाप्रक्रिया पंचगंगेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 06:00 IST

जलचरांना मोठा फटका : शहर व परिसरातील नागरिकांसोबत शेतीचेही आरोग्य बिघडले, देशातील १० प्रदूषित नद्यांमध्ये पंचगंगेचा समावेश

नसीम सनदी।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : न्यायालयाने सातत्याने फटकारल्यानंतरही कोल्हापूर शहरातील २१ एमएलडी सांडपाणी दररोज विनाप्रक्रिया थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे. त्याचा फटका माणसांसोबतच शेती आणि जलचरांना बसत आहे.देशातील १० प्रदूषित नद्यांमध्ये पंचगंगेचा समावेश होतो. या प्रदूषणात कोल्हापूर शहराचा वाटा सर्वाधिक आहे. या प्रदूषणावरून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पन्नासवर नोटिसा काढल्या आहेत. तरीही दुर्लक्ष केल्याने अखेर उच्च न्यायालयानेच कान टोचले. तेव्हा कुठे सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प उभा राहिला. शिंगणापूर, बालिंगा, नागदेववाडी या तीन पम्पिंग स्टेशनमधून प्रतिदिन १३० एमएलडी पाण्याचा उपसा केला जातो. शहरातील १२ नाल्यांतून आलेल्या ९५ एमएलडी सांडपाण्यावर दुधाळी, बापटकॅम्प, लाईन बाजार येथील केंद्रांवर प्रक्रिया केली जाते. या प्रकल्पासाठी ७८ कोटींचा खर्च झाला आहे; पण अजूनही ते पूर्ण क्षमतेने चालवले जात नाही. त्यामुळे २१ एमएलडी पाणी थेट नदीत मिसळते. यामुळे माणसांसोबतच जलचर आणि जैवविविधतेलाही फटका बसत आहे. हिरवा तवंग आणि जलपर्णीमुळे नदीच्या पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाण कमी होऊन जलचर गुदमरून मरण पावतात. या खोऱ्यातील मासेमारी आता संपल्यातच जमा आहे.उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नेमलेल्या निरी समितीने अहवाल दिल्यानंतर जिल्ह्यातील सहा औद्योगिक वसाहतींतील २२८० उद्योेगांवर सांडपाण्यावर प्रक्रिया करून पुनर्वापर करण्याचे निर्बंध घालण्यात आले. यामुळे त्यांचे सांडपाणी नदीत मिसळणे काही प्रमाणात बंद झाले आहे. तरी इतर ठिकाणांवरून येणारे सांडपाणी नदीतच सोडले जात आहे. शहराबरोबरच नदीकाठावरील १७४ गावांना प्रदूषणाची मोठ्या प्रमाणावर झळ बसत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने शासनाकडे १०८ कोटी रुपयांची मागणी केली होती; पण त्यालाही पाच वर्षांचा कालावधी लोटला आहे. त्यानंतर ९६ कोटींचा सुधारित प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी दिला. त्यालाही शासनाकडून प्रतिसाद मिळालेला नाही.नदीशेजारी असूनहीटँकरने पाणीकोल्हापूर शहरातून बाहेर पडणारे सांडपाणी पंचगंगेतून वाहत जाऊन नृसिंहवाडीला कृष्णा नदीला जाऊन मिसळते. कोल्हापूर ते नृसिंहवाडी या जवळपास ६० मीटरच्या पट्ट्यात पंचगंगा नदी प्रदूषणाचे अक्राळविक्राळ स्वरूप धारण करते. शहराने केलेल्या घाणीचा फटका या नदीकाठावरील जनतेला आणि शेतीलाही बसतो. नदीकाठावर राहूनदेखील तब्बल ३९ गावांतील लोकांना पिण्यासाठीच्या पाण्याची व्यवस्था टँकरद्वारे अथवा आरओ प्लान्टद्वारे करावी लागते.शेती उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावरपंचगंगा खोºयातील करवीर, हातकणंगले आणि शिरोळ या तीन तालुक्यांतील शेतीला या प्रदूषणाची मोठी झळ बसत आहे. फेसाळलेल्या पाण्यामुळे या भागातील बहुतांश शेती क्षारपड होऊ लागली आहे. या भागात ऊस या प्रमुख पिकासह धान्य, कडधान्य आणि भाजीपाल्याची पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. मध्यंतरी शिरोळमध्ये पिकणाºया भाज्या खाल्ल्या तर कॅन्सर होतो, अशा अफवा होत्या. शिवाय दरवर्षी अतिसाराची साथ ठरलेलीच असते.

टॅग्स :pollutionप्रदूषण