शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

दररोज २१ एमएलडी सांडपाणी कोल्हापुरात विनाप्रक्रिया पंचगंगेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 06:00 IST

जलचरांना मोठा फटका : शहर व परिसरातील नागरिकांसोबत शेतीचेही आरोग्य बिघडले, देशातील १० प्रदूषित नद्यांमध्ये पंचगंगेचा समावेश

नसीम सनदी।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : न्यायालयाने सातत्याने फटकारल्यानंतरही कोल्हापूर शहरातील २१ एमएलडी सांडपाणी दररोज विनाप्रक्रिया थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे. त्याचा फटका माणसांसोबतच शेती आणि जलचरांना बसत आहे.देशातील १० प्रदूषित नद्यांमध्ये पंचगंगेचा समावेश होतो. या प्रदूषणात कोल्हापूर शहराचा वाटा सर्वाधिक आहे. या प्रदूषणावरून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पन्नासवर नोटिसा काढल्या आहेत. तरीही दुर्लक्ष केल्याने अखेर उच्च न्यायालयानेच कान टोचले. तेव्हा कुठे सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प उभा राहिला. शिंगणापूर, बालिंगा, नागदेववाडी या तीन पम्पिंग स्टेशनमधून प्रतिदिन १३० एमएलडी पाण्याचा उपसा केला जातो. शहरातील १२ नाल्यांतून आलेल्या ९५ एमएलडी सांडपाण्यावर दुधाळी, बापटकॅम्प, लाईन बाजार येथील केंद्रांवर प्रक्रिया केली जाते. या प्रकल्पासाठी ७८ कोटींचा खर्च झाला आहे; पण अजूनही ते पूर्ण क्षमतेने चालवले जात नाही. त्यामुळे २१ एमएलडी पाणी थेट नदीत मिसळते. यामुळे माणसांसोबतच जलचर आणि जैवविविधतेलाही फटका बसत आहे. हिरवा तवंग आणि जलपर्णीमुळे नदीच्या पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाण कमी होऊन जलचर गुदमरून मरण पावतात. या खोऱ्यातील मासेमारी आता संपल्यातच जमा आहे.उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नेमलेल्या निरी समितीने अहवाल दिल्यानंतर जिल्ह्यातील सहा औद्योगिक वसाहतींतील २२८० उद्योेगांवर सांडपाण्यावर प्रक्रिया करून पुनर्वापर करण्याचे निर्बंध घालण्यात आले. यामुळे त्यांचे सांडपाणी नदीत मिसळणे काही प्रमाणात बंद झाले आहे. तरी इतर ठिकाणांवरून येणारे सांडपाणी नदीतच सोडले जात आहे. शहराबरोबरच नदीकाठावरील १७४ गावांना प्रदूषणाची मोठ्या प्रमाणावर झळ बसत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने शासनाकडे १०८ कोटी रुपयांची मागणी केली होती; पण त्यालाही पाच वर्षांचा कालावधी लोटला आहे. त्यानंतर ९६ कोटींचा सुधारित प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी दिला. त्यालाही शासनाकडून प्रतिसाद मिळालेला नाही.नदीशेजारी असूनहीटँकरने पाणीकोल्हापूर शहरातून बाहेर पडणारे सांडपाणी पंचगंगेतून वाहत जाऊन नृसिंहवाडीला कृष्णा नदीला जाऊन मिसळते. कोल्हापूर ते नृसिंहवाडी या जवळपास ६० मीटरच्या पट्ट्यात पंचगंगा नदी प्रदूषणाचे अक्राळविक्राळ स्वरूप धारण करते. शहराने केलेल्या घाणीचा फटका या नदीकाठावरील जनतेला आणि शेतीलाही बसतो. नदीकाठावर राहूनदेखील तब्बल ३९ गावांतील लोकांना पिण्यासाठीच्या पाण्याची व्यवस्था टँकरद्वारे अथवा आरओ प्लान्टद्वारे करावी लागते.शेती उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावरपंचगंगा खोºयातील करवीर, हातकणंगले आणि शिरोळ या तीन तालुक्यांतील शेतीला या प्रदूषणाची मोठी झळ बसत आहे. फेसाळलेल्या पाण्यामुळे या भागातील बहुतांश शेती क्षारपड होऊ लागली आहे. या भागात ऊस या प्रमुख पिकासह धान्य, कडधान्य आणि भाजीपाल्याची पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. मध्यंतरी शिरोळमध्ये पिकणाºया भाज्या खाल्ल्या तर कॅन्सर होतो, अशा अफवा होत्या. शिवाय दरवर्षी अतिसाराची साथ ठरलेलीच असते.

टॅग्स :pollutionप्रदूषण