शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

५७ शाळांतील २०१ खोल्या धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 01:06 IST

संतोष मिठारी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण ५७ प्राथमिक शाळांमधील गळके छत आणि पडक्या भिंती ...

संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण ५७ प्राथमिक शाळांमधील गळके छत आणि पडक्या भिंती असलेल्या २०१ वर्गखोल्या धोकादायक आहेत. त्यांच्या दुरुस्ती अथवा पुनर्बांधणीचे काम होण्यास काही कालावधी लागणार आहे. बसण्यायोग्य नसलेल्या वर्गखोल्यांमुळे शाळांना सध्या समाजमंदिरे, भाडेतत्त्वावरील इमारतींचा आधार घ्यावा लागत आहे.जिल्ह्यात एकूण १९९४ जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. यापैकी ९८ प्राथमिक शाळांकडून ३२७ वर्गखोल्यांच्या निर्लेखनाचे (पुनर्बांधणी/दुरुस्ती) प्रस्ताव जुलै २०१६ ते मे २०१९ अखेर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला दिले आहेत. त्यांपैकी ५७ शाळांतील २०१ वर्गखोल्यांच्या निर्लेखनास मान्यता दिली आहे. निर्लेखन करावयाच्या शिल्लक वर्गखोल्यांची संख्या १२६ इतकी आहे. त्यामध्ये पन्हाळा, भुदरगड आणि करवीर तालुक्यांतील वर्गखोल्यांची संख्या अधिक आहे.गडहिंग्लज तालुक्यातील एका शाळेकडून नऊ वर्गखोल्यांच्या निर्लेखनासाठीचा प्रस्ताव सादर केला आहे. मात्र, त्याला अद्याप मान्यता मिळालेली नाही. बसण्यायोग्य नसलेल्या शाळा आणि वर्गखोल्यांची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला देण्यात आली आहे. या वर्षी २४२ शाळांची दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये छत, भिंतीची पुनर्बांधणी, वर्गखोल्यांची दुरुस्ती, आदींचा समावेश आहे. विविध शाळांमधील ११६ वर्गखोल्या बांधण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी २२ वर्गखोल्यांचे काम पूर्ण झाले आहे. या कामाची गती वाढविणे आवश्यक आहे.वर्गखोल्यांच्या निर्लेखनाचे काम पूर्ण झाले नसल्याने पर्यायी व्यवस्थेचा शाळा आणि विद्यार्थ्यांना आधार घ्यावा लागणार आहे. विद्यार्थी सुरक्षा आणि त्यांना योग्य सुविधांद्वारे शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शाळा आणि वर्गखोल्यांच्या दुरुस्तीचे काम लवकर पूर्ण होणे आवश्यक ठरणार आहे.पन्हाळा तालुक्यातील वर्गखोली पडलीगेल्या वर्षी पन्हाळा तालुक्यातील एका शाळेस पुनर्बांधणीसाठी मान्यता दिलेली वर्गखोली पडली. मात्र, त्यात कोणत्याही इयत्तेचा वर्ग भरत नव्हता. संबंधित शाळेने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची दक्षता घेऊन त्यांची अन्य ठिकाणी व्यवस्था केली होती. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.पर्यायी व्यवस्थेनंतरच मान्यता : निर्लेखनाबाबत शाळांकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर पहिल्यांदा संबंधित वर्ग भरविण्याची पर्यायी व्यवस्था या शाळांनी केल्यानंतरच त्यांना मान्यता दिली जाते. वर्ग भरविण्यासाठी भाडेतत्त्वावर इमारत घेतली असल्यास तिचे भाडेदेखील जिल्हा परिषदेकडून दिले जाते. निर्लेखनासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या शाळांना निधी उपलब्ध करून देण्यात येतो.