शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! निवडणूक आयोग EVM मशीनला 'पाडू' नावाचे नवीन डिव्हाइस जोडणार; राज ठाकरेंच्या आरोपाने नव्या वादाला फोडणी
2
“राहुल गांधींची प्रभू श्रीरामांवर श्रद्धा, आता अयोध्येला जाणार”; काँग्रेस नेते म्हणाले…
3
जितेंद्र यांनी प्रॉपर्टी मार्केटमध्ये उडवली खळबळ; जपानी कंपनीसोबत ५५९.२५ कोटी रुपयांचा करार, नक्की प्रकरण काय?
4
राज्यातील 'या' शहरात नव्या मतदारांचा विस्फोट! ४४ टक्के एवढे प्रचंड संख्येने मतदार वाढले, फटका कोणाला? 
5
प्रशासकराजपूर्वी २९ पैकी किती महापालिकांत भाजपची सत्ता होती? समोर आली मोठी आकडेवारी...
6
ट्रम्प यांचा नवा 'रिअल इस्टेट' प्लॅन फसला! ग्रीनलँड विकत घेण्याच्या ऑफरला पंतप्रधानांचे सडेतोड उत्तर; म्हणाले...
7
पगारदारांनो लक्ष द्या! तुमच्या पीएफ खात्यावर मिळतोय ७ लाखांचा मोफत विमा; असा करा क्लेम
8
नोकरी सोडून शेतीची धरली कास! १३ लाखांच्या कर्जात बुडलेला तरुण आता कमावतोय वार्षिक २ कोटी
9
राधिका आपटेने बंडच पुकारलं! कामाच्या तासांवरुन निर्मात्यांसमोर ठेवल्या अटी, म्हणाली...
10
अत्यंत हलाखीची परिस्थिती, पत्र्याचं घर अन् गंभीर आजाराचा सामना; जालन्याचा काळू डॉन म्हणाला- "दर महिन्याला रक्त बदलावं लागतं..."
11
मुंबई १ नंबर, पुणे २...! राज्यातील तिसरे सर्वात मोठे शहर कोणते? ९९ टक्के लोक चुकणार हमखास...
12
आता चांदी ₹3 लाखच्या जवळ...! MCX वर 10800 रुपयांनी वधारला भाव; गुंतवणूकदारांना करतेय मालामाल
13
वंदे भारत, तेजस, शताब्दी की गतिमान; तिकीट दर वाढल्यावर कोणत्या ट्रेनचा प्रवास स्वस्त?
14
Thailand Train Accident: थायलंडमध्ये चालत्या ट्रेनवर कोसळली अवाढव्य क्रेन; २२ प्रवाशांचा मृत्यू, चिनी बनावटीचा हायस्पीड रेल्वे प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात
15
८० वर्षांच्या डॉक्टरची १५ कोटींची फसवणूक! १७ दिवस 'डिजिटल अरेस्ट', ७०० बँक खात्यांत पैसा
16
भाजपाचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांच्या निवासस्थानाला आग, अग्निशमन दलाची घटनास्थळी धाव
17
एका शेअरवर ५७ रुपयांचा डिविडंड देणार TATA समूहाची 'ही' कंपनी; रेकॉर्ड डेट जवळ, तुमच्याकडे आहे का?
18
नातूच झाला काळ! स्वतःच्या हाताने संपवलं आजी-आजोबांचं आयुष्य; आजीच्या एका खुणेने पकडला गेला
19
पंतप्रधान कार्यालयाला तक्रार, पत्र पाठवायचेय? आजपासून पत्ता बदलला, संक्रांतीच्या मुहूर्तावर नव्या जागेत स्थलांतर...
Daily Top 2Weekly Top 5

वाकुर्डे योजनेसाठी दोनशे कोटी

By admin | Updated: December 31, 2016 23:07 IST

देवेंद्र फडणवीस : शिराळ्याच्या नागपंचमीस गतवैभव मिळवून देऊ

शिराळा : ‘जिल्हा परिषद निवडणुकीत तुम्ही आमदार शिवाजीराव नाईक यांना यश द्या, त्यांना मंत्री बनवून मी तुम्हाला भेट देईन. वाकुर्डे योजना २०१९ पर्यंत पूर्ण करण्यासाठी दोनशे कोटींचा निधी दोन ते तीन टप्प्यांत उपलब्ध करून देऊ’, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे दिली. शिराळा येथील नागपंचमीस गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी केंद्रीय स्तरावर कायद्यात शिथिलता आणण्यासाठी स्वत: प्रयत्न करेन, असेही त्यांनी सांगितले.शिराळा उपजिल्हा रुग्णालय इमारतीचे भूमिपूजन, मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे व यशवंत दूध संघाच्या विस्तारीकरणाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यानंतर आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सहकार मंत्री तथा पालकमंत्री सुभाष देशमुख, कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार राजू शेट्टी, आमदार शिवाजीराव नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या विभागाची महत्त्वाकांक्षी वाकुर्डे सिंचन योजना आघाडी सरकारच्या काळात निधी न मिळाल्याने १५ वर्षे रखडली. राज्यातील सर्व रखडलेल्या योजना पंतप्रधान सिंचन योजनेतून पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यामुळे वाकुर्डे योजनेस दोन ते तीन टप्प्यात दोनशे कोटींचा निधी देऊन २०१९ पर्यंत ती पूर्ण करू. याचपद्धतीने ताकारी, म्हैसाळ, टेंभू योजनाही पूर्ण करू. शिराळ्यातील नागपंचमीवेळी जिवंत नागांची पूजा करण्याच्या परवानगीबाबत पर्यावरण मंत्र्यांसोबत बैठक घेऊन कायद्यात शिथिलता कशी मिळेल, यासाठी स्वत: प्रयत्न करू.ते म्हणाले की, हे सरकार शेतकऱ्यांचे हिताचे आहे. शेतकऱ्यांना चोवीस तास वीज मिळावी यासाठी कृषी पंप फिडर आणि उपसा जलसिंचन योजना सौर ऊर्जेवर चालवणार असून, या योजनेस केंद्राकडून प्रती मेगॉवट तीन कोटीचा निधी मिळणार आहे. देशासाठी हा पथदर्शक प्रकल्प असेल. राज्यातील सर्व जिल्हा, उपजिल्हा तसेच प्राथमिक आरोग्य रुग्णालये माहिती तंत्रज्ञान व डिजिटलद्वारे जोडण्यात येणार आहेत. कंटेनर रुग्णसेवा सुरू करण्यात येणार आहे. यामुळे चांगल्या रुग्णालयातील डॉक्टरांकडून रुग्णसेवा मिळणार आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुंबई येथील स्मारकासाठी १५ वर्षांत आघाडी सरकार एकही परवानगी मिळवू शकले नाही, मात्र आम्ही दोन वर्षात सर्व परवानग्या मिळवून याचा प्रारंभ केला आहे. आज आमची केंद्रात, राज्यात सत्ता आहे. आम्ही चांगले निर्णय घेत आहोत, मात्र हे निर्णय अमलात आणण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समितीत सत्ता असणे गरजेचे आहे. जशी तुम्ही नगरपालिकांना सत्ता दिली, तशी सत्ता येथेही देऊन काम करण्याची संधी द्या, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी) ‘शिवाजीराव नाईक यांना मंत्रिपदाची भेट देऊ ’आमदार शिवाजीराव नाईक यांच्या कामाच्या आणि विषय सोडविण्याच्या पद्धतीमुळे आपण प्रभावित झालो आहे. त्यांना तुम्ही येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत यशाच्या रूपाने भेट दिली की, आपण त्यांना मंत्रिपदाची भेट देऊ. तुम्ही निश्चिंत रहा, असेही मुख्यमंत्री म्हणाले.