शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वाकुर्डे योजनेसाठी दोनशे कोटी

By admin | Updated: December 31, 2016 23:07 IST

देवेंद्र फडणवीस : शिराळ्याच्या नागपंचमीस गतवैभव मिळवून देऊ

शिराळा : ‘जिल्हा परिषद निवडणुकीत तुम्ही आमदार शिवाजीराव नाईक यांना यश द्या, त्यांना मंत्री बनवून मी तुम्हाला भेट देईन. वाकुर्डे योजना २०१९ पर्यंत पूर्ण करण्यासाठी दोनशे कोटींचा निधी दोन ते तीन टप्प्यांत उपलब्ध करून देऊ’, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे दिली. शिराळा येथील नागपंचमीस गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी केंद्रीय स्तरावर कायद्यात शिथिलता आणण्यासाठी स्वत: प्रयत्न करेन, असेही त्यांनी सांगितले.शिराळा उपजिल्हा रुग्णालय इमारतीचे भूमिपूजन, मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे व यशवंत दूध संघाच्या विस्तारीकरणाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यानंतर आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सहकार मंत्री तथा पालकमंत्री सुभाष देशमुख, कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार राजू शेट्टी, आमदार शिवाजीराव नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या विभागाची महत्त्वाकांक्षी वाकुर्डे सिंचन योजना आघाडी सरकारच्या काळात निधी न मिळाल्याने १५ वर्षे रखडली. राज्यातील सर्व रखडलेल्या योजना पंतप्रधान सिंचन योजनेतून पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यामुळे वाकुर्डे योजनेस दोन ते तीन टप्प्यात दोनशे कोटींचा निधी देऊन २०१९ पर्यंत ती पूर्ण करू. याचपद्धतीने ताकारी, म्हैसाळ, टेंभू योजनाही पूर्ण करू. शिराळ्यातील नागपंचमीवेळी जिवंत नागांची पूजा करण्याच्या परवानगीबाबत पर्यावरण मंत्र्यांसोबत बैठक घेऊन कायद्यात शिथिलता कशी मिळेल, यासाठी स्वत: प्रयत्न करू.ते म्हणाले की, हे सरकार शेतकऱ्यांचे हिताचे आहे. शेतकऱ्यांना चोवीस तास वीज मिळावी यासाठी कृषी पंप फिडर आणि उपसा जलसिंचन योजना सौर ऊर्जेवर चालवणार असून, या योजनेस केंद्राकडून प्रती मेगॉवट तीन कोटीचा निधी मिळणार आहे. देशासाठी हा पथदर्शक प्रकल्प असेल. राज्यातील सर्व जिल्हा, उपजिल्हा तसेच प्राथमिक आरोग्य रुग्णालये माहिती तंत्रज्ञान व डिजिटलद्वारे जोडण्यात येणार आहेत. कंटेनर रुग्णसेवा सुरू करण्यात येणार आहे. यामुळे चांगल्या रुग्णालयातील डॉक्टरांकडून रुग्णसेवा मिळणार आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुंबई येथील स्मारकासाठी १५ वर्षांत आघाडी सरकार एकही परवानगी मिळवू शकले नाही, मात्र आम्ही दोन वर्षात सर्व परवानग्या मिळवून याचा प्रारंभ केला आहे. आज आमची केंद्रात, राज्यात सत्ता आहे. आम्ही चांगले निर्णय घेत आहोत, मात्र हे निर्णय अमलात आणण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समितीत सत्ता असणे गरजेचे आहे. जशी तुम्ही नगरपालिकांना सत्ता दिली, तशी सत्ता येथेही देऊन काम करण्याची संधी द्या, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी) ‘शिवाजीराव नाईक यांना मंत्रिपदाची भेट देऊ ’आमदार शिवाजीराव नाईक यांच्या कामाच्या आणि विषय सोडविण्याच्या पद्धतीमुळे आपण प्रभावित झालो आहे. त्यांना तुम्ही येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत यशाच्या रूपाने भेट दिली की, आपण त्यांना मंत्रिपदाची भेट देऊ. तुम्ही निश्चिंत रहा, असेही मुख्यमंत्री म्हणाले.