शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 २० वर्षे पदे भोगली, आता म्हणे, राष्ट्रवादी चोरांची गुहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 00:23 IST

राजाराम लोंढे / नसीम सनदी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : तुमच्या आजोबांची हयात काँग्रेसमध्ये गेली. आई राष्ट्रवादीमुळेच खासदार ...

राजाराम लोंढे / नसीम सनदी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : तुमच्या आजोबांची हयात काँग्रेसमध्ये गेली. आई राष्ट्रवादीमुळेच खासदार झाली व तुम्ही स्वत:ही राष्ट्रवादीमुळेच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झाला. गेली वीस वर्षे ज्या राष्टÑवादी कॉँग्रेसमध्ये राहून सत्तेची सर्व पदे भोगली, तोच पक्ष तुम्हाला आता चोरांची गुहा असल्याची उपरती कशी काय झाली? असा पलटवार खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्यावर केला.जोपर्यंत स्वाभिमानी शेतकऱ्यांची फौज माझ्यासोबत आहे, तोपर्यंत मला कोणी पराभूत करू शकत नाही. मला पराभूत करण्याचे नरेंद्र मोदी यांचे आदेश असल्याचे सांगणारे चंद्रकांत पाटील, तुमच्याबरोबर थेट मोदींनाच ‘हातकणंगले’त आणून बसवा, असे आव्हान शेट्टी यांनी दिले.चंद्रकांत पाटील तुमच्या फायली तयार!मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कारनाम्याचे सगळे पुरावे आणि फायली माझ्याकडे तयार आहेत. योग्यवेळी तक्रार करणारच आहे; पण जनताजनार्दन सर्वश्रेष्ठ असते. जनतेसमोरच सोक्षमोक्ष व्हायला हवा, म्हणून बिंदू चौकात यावे. अनेकांना ते तुरुंगाची भीती घालत आहेत; पण त्यांच्यावरच ही वेळ येणार असून जामिनासाठी त्यांना फिरावे लागेल, तो दिवस लांब नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.हितचिंतक की विरोधक हे सांगाशरद पवार काट्याने काटा काढतात, ते शेट्टींचाही काटा काढतील, या मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विधानाबद्दल विचारले असता, ते माझे हितचिंतक की विरोधक हे त्यांनी आधी सांगावे. मला पराभूत करण्याचा नरेंद्र मोदी यांचा आदेश आहे. मग पवार जर मला पराभूत करत असतील तर तुम्हाला का वाईट वाटते? असा सवाल शेट्टी यांनी केला.प्रश्न : दूध, ऊस आंदोलनाच्या पलीकडे आपण मतदारसंघात काहीच केलेले नाही?उत्तर : आरोप करणाºयाच्या घरात३५ वर्षे खासदारकी होती, त्यांनी काय दिवे लावले? मी नागपूर-रत्नागिरी मार्गाला राष्टÑीय महामार्गाचा दर्जा मिळवून दिला, कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वेमार्गास मंजुरी, मिरज-पुणे विद्युतीकरण व दुहेरीकरण केले, ८०० गावांत स्वनिधीतून कोट्यवधींची कामे केलीत. हा विकास नव्हे का? संघटनेच्या ऊसदराच्या चळवळीमुळे लोकांची क्रयशक्ती, राहणीमान वाढले, हातात पैसा आल्यामुळे पायाभूत सुविधा वाढल्या, हा विकास नव्हे का..?प्रश्न : पुलवामाचा मुद्दा करून शहीद जवानांच्या नावावर भाजप मते मागत आहे?उत्तर : ‘सीआरपीएफ’, ‘बीएसएफ’चे जवान पुलवामा हल्ल्यात शहीद झाले; पण त्यांना शहिदांचा दर्जा दिला नाही. मग आता त्यांच्या नावावर मते मागताना ५६ इंचांची छाती कुठे जाते? शहिदांचे नाव घेऊन मते मागण्याचा तुम्हाला अधिकार नाही.प्रश्न : आयुष्यभर संघर्ष केलेल्या साखरसम्राटांच्या मांडीला मांडू लावून बसल्याची टीका होते?उत्तर : माझ्यावर हे आरोप करणाऱ्यांच्या कळपात २०० पैकी १२५ साखर कारखानदार आहेत; मग तुमचा कळप कोणता? भले मला कोणी अहंकारी म्हणो; पण शेतकºयांच्या प्रश्नांवर कोणालाही अंगावर घेण्याची माझ्यात धमक आहे. मी ज्यांच्या कळपात गेलो त्यांच्याकडून एफआरपी वसूल केली; पण तुमच्यासोबत असलेल्या कारखानदारांनी किती एफआरपी व बॅँका बुडविल्या, याचे उत्तर चंद्रकांत पाटील यांनी द्यावे. बोगस कर्जे काढणाºया सहकारमंत्र्यांवर कारवाईची हिंमत दोन नंबरच्या मंत्र्यांनी दाखवावी.प्रश्न : प्रतिस्पर्धी उमेदवाराचे आव्हान कितपत वाटते?उत्तर : ज्यांना स्वत:चे कर्ज फेडता आले नाही, कंपनी नीट चालविता आली नाही. त्यांच्या विकासाची दृष्टी आलास, पट्टणकोडोली परिसरातील जनतेने बघितली आहे. भाषणाने क्रांती झाली असती तर नाना पाटेकर, अमिताभ बच्चन हे नेते झाले असते.प्रश्न : सदाभाऊ खोत तुमच्यावर वैयक्तिक टीका करीत आहेत?उत्तर : ही व्यक्ती गांभीर्याने घ्यावी, या पात्रतेची राहिलेली नाही. तिला जनताच उत्तर देईल.प्रश्न : या निवडणुकीत तुम्ही कोणता अजेंडा घेऊन जाता?उत्तर : शेतकºयांना दीडपट हमीभाव, कर्जमाफी, गरीब कुटुंबांना वर्षाला ७२ हजार रुपये देणार, हा आमचा जाहीरनामा आहे. विरोधक पुलवामासारख्या घटनेतून डोके भडकावून मते मागत आहेत; पण या सर्वांपेक्षा भुकेची आग मोठी असते, ती स्वस्थ बसू देत नसते, याचा विसर भाजपला पडला आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक