शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

हुपरीत १० वर्षे काम करूनही पाईप लाईन पाण्याच्या प्रतिक्षेत; ठेकेदारावर काय कारवाई करणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 00:37 IST

जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांचा वेळकाढूपणा ठेकेदाराची निष्क्रियता व निष्काळजीपणा तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आदी कारणामुळे हाच खर्च आत्ता दुप्पट होण्याच्या मार्गांवर आहे.

ठळक मुद्दे११ कोटी ४० लाखांचा निधी : ठेकेदाराबद्दल तक्रारी

तानाजी घोरपडे ।हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) शहरासाठी राबविण्यात येत असलेल्या नळपाणीपुरवठा योजनेचे काम अत्यंत संथ गतीने तब्बल दहा वर्षे सुरू आहे. योजनेचा मूळ खर्च ११ कोटी ४० लाख रुपये होता. जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांचा वेळकाढूपणा ठेकेदाराची निष्क्रियता व निष्काळजीपणा तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आदी कारणामुळे हाच खर्च आत्ता दुप्पट होण्याच्या मार्गांवर आहे.

याबाबतचे सोयरसुतक ना जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांना आहे ना ठेकेदाराला. योजनेच्या दुसºया टप्प्यातील जलकुंभ उभारणी व शहरांतर्गत जलवाहिनी टाकणे आदी कामाबाबत मोठ्या प्रमाणात गंभीर तक्रारी असतानासुद्धा याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन याच ठेकेदाराला तब्बल सहावेळा नियमबाह्य मुदतवाढ दिली आहे.एक महिन्याच्या आत पाणीपुरवठा योजनेचे काम गतिमान झाले न्हाई तर संबंधित ठेकेदारावर व जीवन प्राधिकरणाच्या अधिकाºयांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल. तसेच या ठेकेदाराचे नाव काळ्या यादीत टाकण्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करू, असा इशारा उपनगराध्यक्ष भरत लठ्ठे व नगरसेवक दौलतराव पाटील यांनी पाणीपुरवठा समितीच्या बैठकीतच दिला आहे.

योजनेच्या कामातील अडथळे दूर करुन गती प्राप्त व्हावी यांसाठी कुणीही प्रयत्नशील असल्याचे दिसून येत नाही. गेली दहा वर्षे पाणीपुरवठा योजनेचे काम रखडले असून ठेकेदार इकडे फिरकतही नाही. त्याच्यावर काय कारवाई केली, असा जाब विचारत नगरसेवकानी आता आक्रमक पवित्रा घेतला असल्याचे समोर येत आहे. योजनेचे दोन जलकुंभ मुख्य जलवाहिनीला जोडणे तसेच शहारांतर्गत पाईपलाईन टाकण्याचे काम तातडीने पूर्ण करणे.आदी कामे युद्धपातळीवर करावीत ही कामे वेळेत नाही झाल्यास संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कारवाई दंड आणि त्याचे नाव काळ्या यादीत टाकणे यांसाठी आत्ता पर्यंत स्थानिक लोकप्रतिनिधी व जीवन प्राधिकरण अधिकारी यांनी प्रयत्नच केले नाहीत.त्यामुळे योजनेचे काम रखडले आहे. योजनेचा खर्चही दुप्पट होऊ शकतो, याला जबाबदार कोण; असा प्रश्न शहरवासीय सध्या उपस्थित करू लागले आहेत.हुपरी शहरासाठी दूधगंगा नदीवरून राबविण्यात येत असलेल्या नळपाणीपुरवठा योजनेच्या दुसºया टप्प्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. शहराच्या विविध भागांत जलकुंभ उभारणी करणे व शहरांतर्गत जलवाहिनी टाकणे हिकामे अत्यंत संथगतीने सुरू आहेत.शहरांत सुलभ पाणी वितरण व्हावे यांसाठी सुमारे ४४ किलोमीटर जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. मात्र गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत केवळ ९ किलोमीटरच जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. या कामाबाबत शहरवासीयांतून मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. काहींनी काम थांबविले तर काहींंनी कामात सुधारणा व्हावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

 

 

टॅग्स :Waterपाणीkolhapurकोल्हापूर