शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

अपात्र कर्जमाफीची १८ फेब्रुवारीला अंतिम सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 13:18 IST

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या केंद्र सरकारच्या कर्जमाफीतील अपात्र ११२ कोटींबाबत १८फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे. शुक्रवारी याबाबत सुनावणी झाली. यामध्ये इतर सर्व दाव्यांमध्ये केंद्र सरकारला नोटिसा लागू झाल्याचे मान्य करून मूळ दावा अंतिम सुनावणीसाठी ठेवला.

ठळक मुद्देअपात्र कर्जमाफीची १८ फेबु्रवारी अंतिम सुनावणी‘दौलत’ बाबत शुक्रवारी सुनावणी

कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या केंद्र सरकारच्या कर्जमाफीतील अपात्र ११२ कोटींबाबत १८ फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे. शुक्रवारी याबाबत सुनावणी झाली. यामध्ये इतर सर्व दाव्यांमध्ये केंद्र सरकारला नोटिसा लागू झाल्याचे मान्य करून मूळ दावा अंतिम सुनावणीसाठी ठेवला.केंद्र सरकारने २००७-०८ मध्ये देशातील शेतकऱ्यांची ७२ हजार कोटींची कर्जमाफी केली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुमारे २७० कोटींचा लाभ झाला; पण कर्जमाफीवर तक्रारी झाल्याने ‘नाबार्ड’च्या तपासणीत जिल्हा बॅँकेशी संलग्न ४८ हजार शेतकऱ्यांची ११२ कोटींची कर्जमाफी अपात्र ठरविण्यात आली.

हे पैसे ‘नाबार्ड’ने वसूल केल्याने बॅँकेसह शेतकरी अडचणीत आले. याविरोधात जिल्हा बॅँकेने उच्च न्यायालयापर्यंत लढा दिला. अनेक वर्षांच्या लढाईनंतर उच्च न्यायालयाने ‘नाबार्ड’चे म्हणणे फेटाळून लावत या शेतकऱ्यांना पात्र ठरविले होते; पण उच्च न्यायालयाच्या निर्णयाला ‘नाबार्ड’ने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावर सुनावणीची प्रक्रिया सुरू आहे. याबाबत न्यायालयाने केंद्र सरकारला आपले म्हणणे मांडण्याचे आदेश दिले होते.यावर, शुक्रवारी मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांच्यासमोर सुनावणी झाली. कर्जमाफीला आव्हान देताना ‘नाबार्ड’ने न्यायालयात ७२ दावे दाखल केलेले आहेत. त्यांपैकी एका दाव्यात केंद्र सरकार हजर राहिले आहे. इतर दाव्यांमध्ये सरकारला नोटिसा लागू न झाल्याच्या कारणावरून ही सुनावणी होत नव्हती. मात्र शुक्रवारी न्यायालयाने इतर सर्व दाव्यांत केंद्र सरकारला नोटिसा लागू झाल्या आहेत, हे मान्य करून मूळ दावा अंतिम सुनावणीसाठी ठेवला आहे.

‘दौलत’ बाबत शुक्रवारी सुनावणीदौलत साखर कारखानाच्या ताब्याविरोधात ‘न्यूट्रियंट्स’ कंपनीने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होऊ शकली नाही. जिल्हा बॅँकेने कारखान्याचा बेकायदेशीररीत्या ताबा घेतला असून, या प्रकणाबाबत लवाद नेमण्याची विनंती कंपनीने केली आहे. यावर शुक्रवारी (दि. १५) सुनावणी होणार आहे. 

 

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रkolhapurकोल्हापूर