शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मुख्यमंत्री रोजगारातून १७९२ जणांची ‘उद्योगभरारी’; कोल्हापूर राज्यात अव्वल

By पोपट केशव पवार | Updated: December 17, 2024 12:00 IST

पोपट पवार कोल्हापूर : तरुण-तरुणींना आत्मनिर्भर बनवण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (सीएमईजीपी) ही ...

पोपट पवारकोल्हापूर : तरुण-तरुणींना आत्मनिर्भर बनवण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (सीएमईजीपी) ही योजना कोल्हापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरली असून, या योजनेमुळे दोन वर्षांत जिल्ह्यात १७९२ जणांनी स्वत:चे उद्योग-व्यवसाय उभारून रोजगार निर्मितीला चालना दिली आहे. विशेष म्हणजे या योजनेत सर्वाधिक लाभार्थी, सर्वाधिक अनुदान व दिलेले उद्दिष्ट्य पूर्ण करण्यात कोल्हापूर जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे.राज्यातील युवक-युवतींना स्वयंपूर्ण आत्मनिर्भर बनविण्यासाठी राज्य सरकारने २०१९ मध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेची सुरुवात केली. प्रक्रिया व निर्मिती उत्पादन प्रकल्पासाठी ५० लाख रुपयांपर्यंत, तर सेवा उद्योगसाठी २० ला रुपयांपर्यंतच्या प्रकल्पावर राज्य सरकारकडून अनुदान दिले जाते. यामध्ये ७६ उद्योगांचा व सेवांचा समावेश आहे. यामध्ये वैयक्तिक व बचत गटाच्या माध्यमातून उभा केलेल्या उद्योगांनाही अर्ज करता येतो.या योजनेंतर्गत लाभ मिळण्याकरिता १८ ते ४५ वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती अर्ज करू शकते. या योजनेसाठी शहरी व ग्रामीण असे दोन प्रवर्ग तयार केले असून, त्यासाठी १५ ते ३५ टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते. २०२३-२४ या वर्षात कोल्हापूर जिल्ह्यात ११११ तरुण-तरुणींना या योजनेच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज मिळाले आहे, तर २०२४-२५ या वर्षात आतापर्यंत ६८१ जणांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या दोन्ही वर्षांत मिळून या लाभार्थ्यांना ८२ कोटी रुपयांहून अधिक अनुदान मंजूर झाले आहे.

दृष्टीक्षेपात सीएमईजीपी योजनेची आकडेवारीवर्षे - अर्ज - उद्दिष्ट्य - लाभ - अनुदान मंजूर२०२३-२४ - ३२७८ - १११० - ११११ - ४० कोटी२०२४-२५ - १९८२ - १२०० - ६८१ - ४२ कोटी

दहा टक्के भागभांडवलावर सुरू करता येतो उद्योगया योजनेत एकूण गुंतवणुकीत उद्योजकाचा वाटा हा ५ ते १० टक्के, सरकारचे अनुदान १५ ते ३५ टक्क्यांपर्यंत आणि बँकेकडून ६० ते ७५ टक्क्यांपर्यंत कर्ज उपलब्ध केले जाते. सुरुवातीला अर्ज केल्यानंतर जिल्हा कार्यबल समितीकडून मंजुरी दिली जाते. त्यानंतर अर्ज सरकारी बँक, खासगी बँक व सहकारी बँकेकडे पाठवला जातो. अर्ज मंजूर झाल्यानंतर उद्योजकाला कर्जाची रक्कम उपलब्ध होते. मात्र, तीन वर्षांपर्यंत उद्योग सुरू राहिला, तरच सरकारच्या वतीने दिले जाणारे अनुदान लाभार्थ्याला मिळू शकते.

कोणत्या उद्योग-व्यवसायासाठी मिळते कर्ज

  • उत्पादन
  • सेवा उद्योग
  • कृषी पूरक व्यवसाय
  • कृषीवर आधारित उद्योग
  • ई-वाहतूक व त्यावर आधारित व्यवसाय
  • फिरते विक्री केंद्र- खाद्यान्न केंद्र

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत तरुण-तरुणींना उद्योग व्यवसायासाठी अनुदान दिले जाते. या योजनेचे उद्दिष्ट्य, लाभार्थी व अनुदान देण्यामध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात अव्वल आहे. - अजयकुमार पाटील, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर